tag:blogger.com,1999:blog-1098825709805713412024-03-14T20:40:21.023+05:30मला वाटलं ते...!mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.comBlogger75125tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-40235495965377496082012-07-17T14:39:00.000+05:302012-07-17T14:40:21.042+05:30वयम् पंचाधिकम् शतम्...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAKf6Io78B8SftAlOXo8Z6ft7RNLAgC6xacGuzWmb6H0UCpP7hwj4Nt2tlJ_SncFNDwT2TlfEtKhnqV31QS6uIg8aIIw_JTjHNmAlZoTvZyVrUAc4cTOvGKCziQPKN4MkjHEVehkFZPeg/s1600/Maha1.gif" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="262" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAKf6Io78B8SftAlOXo8Z6ft7RNLAgC6xacGuzWmb6H0UCpP7hwj4Nt2tlJ_SncFNDwT2TlfEtKhnqV31QS6uIg8aIIw_JTjHNmAlZoTvZyVrUAc4cTOvGKCziQPKN4MkjHEVehkFZPeg/s320/Maha1.gif" width="320" /></a><b><i>"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." </i></b></div>
<div>
<b><i>सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, <span style="background-color: white;">द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...</span></i></b></div>
<div>
<b style="background-color: white;"><i>अर्जुनासह पांडवांना १४ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास भोगायला लागला. ही १५ वर्षं संपल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं... अखेरीस श्रीकृष्णानं अर्जुनाचं सारथ्य केलं आणि अर्जुनासह पांडवांना मौलिक उपदेश करून एकेक करून कौरवांचे धनुर्धर पाडले आणि युद्धाची समाप्ती झाली...</i></b></div>
<div>
<span style="color: blue;"><br /></span></div>
<div>
<span style="color: blue;"><b>हे झालं ओरिजनल महाभारत... कलियुगात अशी अनेक महाभारतं घडत असतात. मात्र त्यात दरवेळी असंच होतं, असं नाही... इथं काय झालं ते ऐका!</b></span></div>
<div>
<br /></div>
<div>
<b><i>"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." </i></b><br />
<div>
<b><i>सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...</i></b></div>
</div>
<div>
<b><i><br /></i></b></div>
<div>
<b><i>दोन्ही बाजुंनी युद्धाची संपूर्ण सिद्धता झाली... ध्रुतराष्ट्रांनी जरी सुयोधनाची बाजू घेतली असली, तरी सुयोधन आणि अर्जुनादी पांडव एकत्र यावे असंच त्यांनाही वाटत होतं. किंबहुना अर्जून उघड-उघड ध्रुतराष्ट्र हेच आपला आदर्श असल्याचं सांगायचा आणि सुयोधनाच्या राजकारणाला कंटाळून आपण हस्तीनापूर सोडल्याचं म्हणायचा... अर्जुनाचं बोलणं-चालणं-वागणंही थेट ध्रुतराष्ट्रांच्या प्रमाणेच... त्यामुळे अनेकांना अर्जून हाच हस्तीनापूरचा उत्तराधिकारी आहे, असं वाटायचं. मात्र सुयोधनानं केलेली प्रतिज्ञा आणि ध्रुतराष्ट्रांचं पुत्रप्रेम यामुळे गोची झाली होती... </i></b></div>
<div>
<b><i><br /></i></b></div>
<div>
<b><i>दोन्ही बाजू दोन वर्षांनी होऊ घातलेल्या युद्धाच्या सिद्धतेला लागल्या होत्या... तत्पु्र्वी छोट्या-मोठ्या लढायांमध्ये दोघंही आपापलं बळ आजमावत होते. कधी अर्जुनाची सरशी व्हायची तर कधी सुयोधनाची... त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्धात काय होईल, हे कोणालाच सांगता येणं कठीण होतं... ध्रुतराष्ट्रांना वेळोवेळी युद्धाचं वृत्त आणि सल्ले देणारा 'संजय'ही गोंधळात पडल्याचं दिसत होतं. (महायुद्ध झालं, तरच आपल्याला आपली अंतर्ज्ञान विद्या वापरता येणार, असं वाटत होतं आणि युद्ध व्हावं, असंच त्याला वाटत होतं, हा तपशिलाचा भाग झाला...) </i></b></div>
<div>
<b><i><br /></i></b></div>
<div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjImfL3i_eVGn8IsZBDRhMfbA2g5r48_aUAVoDzzO0lCzjRXpc87fjNza1nVv5cVq-9vB5lozCIHHa865FLQi62RP5gOvCHF0qFkIGHq4eXuEHGasIHT2RiJhgOstFOfH7E_5UK5vIOUyI/s1600/maha2.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="151" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjImfL3i_eVGn8IsZBDRhMfbA2g5r48_aUAVoDzzO0lCzjRXpc87fjNza1nVv5cVq-9vB5lozCIHHa865FLQi62RP5gOvCHF0qFkIGHq4eXuEHGasIHT2RiJhgOstFOfH7E_5UK5vIOUyI/s200/maha2.jpg" width="200" /></a><b><i>एकदा अशीच युद्धाची तयारी सुरू असताना सुयोधनाच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या... त्याला तातडीनं राजवैद्यांकडे नेलं गेलं. राजवैद्यांनी त्यावर उपाय सांगितले आणि आराम करण्याचा सल्ला दिला... सुयोधनाच्या या स्थितीचं वर्तमान दुतांकरवी अर्जुनाकडे पोहोचलं आणि तो गहिवरलाच... द्रोणाचार्यांच्या आश्रमात एकत्र घालवलेले क्षण, हस्तीनापूरात ध्रुतराष्ट्रांच्या मांडीवर एकत्र खेळलेले खेळ, असं सगळं त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं आणि स्वतः युद्धाची तयारी सोडून अर्जुन थेट राजवैद्यांच्या आश्रमात दाखल झाला आणि अर्जुन-सुयोधनाची गळाभेट झाली... इतक्यावरच अर्जुन थांबला नाही, तर रस्त्यांवरच्या खड्यांचा सुयोधनाला त्रास होऊ नये, म्हणून त्याच्या परदेशातून आलेल्या रथाचा चाप अर्जुनानं स्वतःच्या हातात घेतला आणि त्याला सुखरूप हस्तीनापूरात पोहोचवला... खरंतर वनवासाची सात वर्षंच लोटली असताना अर्जुनानं हस्तीनापुरात येण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं... हे हस्तीनापुरातल्या संजयादी काही राजकारणी मंडळींना पसंत पडलं नसलं, तरी कौरव-पांडवांच्या सैन्यांमध्ये मात्र यामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय..</i></b>.</div>
<div>
<br /></div>
<div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh30iCTRPJAiJkhoZZrdFK33CJyvf7J-brnqOFBZTb9YrAv8xkg4XWw8sPmoFXW8SLNM_XA9TKIwRuUGvPdRMVaf3wxadczGfv3f58wBQ7UK5j98BNYyItwFp-bIdyPfnB-VB-38mBNkbI/s1600/maha3.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="232" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh30iCTRPJAiJkhoZZrdFK33CJyvf7J-brnqOFBZTb9YrAv8xkg4XWw8sPmoFXW8SLNM_XA9TKIwRuUGvPdRMVaf3wxadczGfv3f58wBQ7UK5j98BNYyItwFp-bIdyPfnB-VB-38mBNkbI/s320/maha3.jpg" width="320" /></a></div>
<div>
<span style="color: blue;"><b>एकमेकांसोबत युद्ध करण्यापेक्षा "वयम् पंचाधिकम् शतम्" असं म्हणत सुयोधन आणि अर्जुन हस्तीनापुराच्या अन्य मोठ्या शत्रुंशी लढण्यासाठी खांद्याला-खांदा लावून उभे राहोत, अशी प्रार्थना हे सैनिक आता करू लागले आहेत म्हणे! अर्थात, रणवाद्यं छेडली जात नाहीत... रणभेरी निनादत नाहीत... पाञ्चजन्य-देवदत्त फुंकले जात नाहीत... तोपर्यंत अर्जुन-सुयोधनाचं हे प्रेम कायम टिकतं की त्यांच्यात पुन्हा कटुता येते, यावरच युद्धाचं स्वरूप अवलंबून राहणार आहे... </b></span></div>
</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-80585148360286161872012-07-04T00:42:00.001+05:302012-07-04T00:42:59.674+05:30पुन्हा ये... रे... ये.... रे...२००९ साली पावसानं आता मारलीये तशीच दडी मारली होती. नंतर पडला चांगला. पण तेव्हाही जुलै उजाडला तरी त्याचा पत्ता नव्हता. त्यावेळी १ जुलै रोजी लिहिलेल्या पोस्टची लिंक खाली दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता ३ वर्षांनंतरही परिस्थितीत काडीचा फरक पडलेला नाही. विधानसभा निवडणुका वैगरे तात्कालिन प्रसंग वगळता आताही परिस्थिती तशीच आहे. ही खरंच गमत्तशीर गोष्ट आहे आणि आपले राज्यकर्ते आणि आपणही, किती निर्ढावले आहोत, त्याचंच हे प्रतिक आहे.<br />
आपण जुन्या गोष्टी पटकन विसरतो. पब्लिकची मेमरी शॉर्ट-टर्म असते, असं एक खास मराठी वाक्य आपल्याला माहिती असतं... त्यातंच हे प्रतिक म्हणता येईल का?<br />
<br />
<br />
<a href="http://mala-watala-te.blogspot.in/2009/07/blog-post.html">पाऊस आलाच नाही तर?</a>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-41377165016975511102012-06-28T18:08:00.000+05:302012-06-28T18:08:05.521+05:30पंतप्रधानाचा धर्म...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<i><span style="color: #674ea7;">हा ब्लॉग लिहायला थोडा उशीर झालेला वाटू शकतो... कारण तसा गेल्या एक-दोन आठवड्यांत चर्चिला गेलेला हा विषय आहे. मात्र काल एका मित्राशी बोलत असताना हा विषय निघाला आणि आज सुदैवानं थोडा वेळ होता... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान हवा की नको, या विषयावर लिहावं असं वाटलं...</span></i><br />
<br />
<div style="text-align: center;">
-------------------</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCXuOtyCVumwrj-RA73EnW6d8hyctSubXL-K8NRGLTzN7noToqEYdnSyUCGCCOXHRsuE_-yDo_Y_v86q-FgSVrUursIoBeDyyQeBgSzyMVPGu0IuXiATi9LWCe1xjJMB7DWS6WbWzpFIo/s1600/nitish-narendramodi.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="301" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiCXuOtyCVumwrj-RA73EnW6d8hyctSubXL-K8NRGLTzN7noToqEYdnSyUCGCCOXHRsuE_-yDo_Y_v86q-FgSVrUursIoBeDyyQeBgSzyMVPGu0IuXiATi9LWCe1xjJMB7DWS6WbWzpFIo/s400/nitish-narendramodi.jpg" width="400" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
मुळात हा मुद्दा <b>पंतप्रधानाच्या धर्माचा</b> नाही, तर पंतप्रधान होण्यास इच्छुक असलेल्या दोन नेत्यांमधल्या स्पर्धेचा आहे. यातले एक आहेत गुजरातचे मुख्यमंत्री <b>नरेंद्र मोदी </b>आणि दुसरे आहेत बिहारचे मुख्यमंत्री <b>नितीश कुमार</b>. हा वाद हिंदुत्वाच्या रिंगणात जाण्याचं मुख्य कारण म्हणजे या दोघांनीही आपण पंतप्रधान होण्यास लायक असल्याचं सिद्ध केलंय. दोघांचीही प्रतिमा विकासाभिमुख, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अशी आहे. नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीला असलेली काळी किनार म्हणजे गुजरात दंगली... या दंगलींमध्ये केलेली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पापं मोदींना आमरण भोवणार आहेत. नितीश कुमारांचा मुद्दा हा याचाच पहिला अध्याय म्हटला पाहिजे. कारण दोन वर्षांनी (कदाचित आधीही) होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची दाट शक्यता सर्वांनाच दिसते आहे. अशा वेळी पंतप्रधान कोण असणार, हा प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहे आणि कुमारांनी निर्माण केलेला हा वाद या प्रश्नाला पार्श्वभूमी देणारा आहे...<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjH-9z9hMm_tEyBgRUekyuVOaSrcvmARdmrmAx4XOY5zb5G7cePdhqfNlEu7ljr-iyLodbKStOzoDqedMs_vOKtz29IhjkQ7cPclH4LQb8MPkVC2lhyUzphpySslni8mD0qK-N3fgUkHSE/s1600/bjp_leaders.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="212" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjH-9z9hMm_tEyBgRUekyuVOaSrcvmARdmrmAx4XOY5zb5G7cePdhqfNlEu7ljr-iyLodbKStOzoDqedMs_vOKtz29IhjkQ7cPclH4LQb8MPkVC2lhyUzphpySslni8mD0qK-N3fgUkHSE/s320/bjp_leaders.jpg" style="cursor: move;" width="320" /></a>उद्या एनडीएची सत्ता आलीच, तर मोदींचा अडसर दूर करण्याची तयारी आतापासून केलेली बरी, असं त्यांना वाटत असण्याची शक्यता आहे. खरंतर नितीश कुमारांनी घाई केली, असं मला वाटतं... कारण मोदी पंतप्रधान झालेले त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना नको आहेत... उद्या एनडीएची सत्ता आली, तर त्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असणार हे उघड आहे. अशा वेळी भाजपामध्ये अनेक नेते गुढग्याला बाशिंग बांधून सजले असल्यास नवल नाही... <b>मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, व्यंकय्या नायडू, आता नितीन गडकरी आणि 'आजन्म भावी पंतप्रधान' लालकृष्ण आडवाणी</b> या सगळ्यांना पार करून मोदींना जावं लागणार आहे आणि हे नेते त्यांच्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालण्याची शक्यता अजिबात नाही... पण धर्मनिरपेक्ष चाळणी लावली, तर हे सगळेच नेते बाद होऊ शकतात, कारण बाबरी मशिदीचे दगड यांच्याही भिंतींसाठी वापरलेले आहेतच... त्यामुळे एनडीएमध्ये नितीशबाबू किंवा शरदबाबू यादव हे आपण एकमेव धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करू शकतात... त्यामुळे हिंदुत्ववादी पंतप्रधान नको, असं कुमारांना वाटू लागल्यास नवल नाही...<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVCYuJ7O2c0RcLXie2eidvCOdfN3Krd51f1oJU0hOoRza5uL_rcZH2O5k6XC1_N2G5D1opisnfljkq8ze47T3nSneT5P1E5jmZ9lp5cX2NHTylWcHM45BQ3gL6oWJ_faLKHZV2lo2GJSs/s1600/Atal-Bihari-Vajpayee.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="155" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVCYuJ7O2c0RcLXie2eidvCOdfN3Krd51f1oJU0hOoRza5uL_rcZH2O5k6XC1_N2G5D1opisnfljkq8ze47T3nSneT5P1E5jmZ9lp5cX2NHTylWcHM45BQ3gL6oWJ_faLKHZV2lo2GJSs/s200/Atal-Bihari-Vajpayee.jpg" width="200" /></a></div>
<i><span style="color: #444444;">मात्र इथं नितीश कुमार एक महत्त्वाचा इतिहास विसरलेले दिसतात. 'हिंदू तन मन.. हिंदू जीवन... रग रग हिंदू मेरा परिचय...' असं म्हणणा-या अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात शरदबाबू आणि नितीशबाबू हे दोघंही मंत्री राहिलेले आहेत... अटलबिहारी वाजपेयी हे केवळ कवितेतून हिंदू नव्हेत, तर संपूर्ण हिंदुत्त्ववादी नेता आहेत, हे या दोघांना माहिती नसेल, असं कसं म्हणणार... </span></i><br />
<div style="text-align: center;">
<i><span style="color: #444444;"><br /></span></i></div>
<div style="text-align: center;">
<i><span style="color: #444444;">-------------------</span></i></div>
<i><span style="color: #444444;"><br /></span></i><br />
पंतप्रधान होण्यासाठी नितीशकुमार एकटेच मोर्चेबांधणी करतायत, असं मानायचं कारण नाही... मोदींनाही आपल्याला भविष्यात मिळू शकणा-या या संधीची कल्पना निश्चितच आलेली आहे आणि त्यांची पावलं नेमकी त्याच दिशेनं पडत आहेत. संजय जोशींना इतका टोकाचा विरोध करण्याचं तेच कारण आहे... याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती मोदी पहिल्यांदा मु्ख्यमंत्री होण्यापूर्वीची... प्रचारक असलेल्या माणसानं मुख्यमंत्री होऊ नये, असं म्हणून जोशींनी त्यावेळी आपला जुना मित्र नरेनभाईच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. तेव्हापासून मोदींचा संजय जोशींवर रोष आहे. नंतर बनावट असल्याचं सिद्ध झालेली जोशींच्सेया सेक्सस्कॅंडलची सीडी ही गुजरातमध्येच जन्माला आल्याचं बोललं जातं. (अर्थात ही वदंता आहे, पण आग असल्याशिवाय धूर निघत नाही म्हणतात...) बिहार निवडणुकांची जबाबदारी संजय जोशींवर दिल्यानंतर मोदी तिथं प्रचाराला गेले नाहीत, संजय जोशी भाजपात राहिले असते तर त्यांनी थेट मुंबईत झालेल्या कार्यकारिणीला टांग देण्याची तयारी केली होती... अखेरीस त्यांनी जोशींची सरचिटणीस पदावरून उचलबांगडी करायलाच लावली... इतक्या वर्षांनीही मोदींनी खुन्नस कायम ठेवल्याचं कारण काय असू शकतं? ही जुनी खुन्नस नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदींनी लावलेली फिल्डिंग आहे, असं मला वाटतं. कदाचित २०१४ साली भाजपाची सत्ता आलीच, तर मोदींच्या नावाला पहिला विरोध हा संजय जोशींचा असू शकतो आणि ते पक्षाचे सरचिटणीस असतील, तर त्यांच्या विरोधाला ब-यापैकी वजन प्राप्त होणार, हे उघड आहे. जोशींची ढाल करून आडवाणी ते गडकरी असे सर्व स्वपक्षीय इच्छुक मोदींवर वार करू शकतात. त्यामुळे मोदींनी या ढालीला भोक पाडण्यासाठी आपलं सगळं वजन वापरलं... इतकं, की दस्तुरखुद्द सरसंघचालक <span style="background-color: white;">मोहन भागवत यांनाही त्यांनी या अकाली वादात ओढलं... भागवतांनी हिंदुत्त्ववादी पंतप्रधान का नको, असा सवाल करत नितिश कुमारांना आव्हान देऊन टाकलं... खरंतर भागवतांच्या या अस्थानी विधानाची खरोखरच काही गरज नव्हती. हिंदुत्व आणि हिंदुत्त्ववाद याबाबत संघाची मतं काय आहेत, हे जगजाहीर आहे. पण भागवतांच्या या विधानानं पटावरला मोदींचा वजीर पुढे सरकवलाय. हे मात्र निश्चित... </span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpTln1p0JkVzfb_p8cMQfG-iXokllDTkBIJJ9C2ZZYI6aQc-GL6HWcMiszzqlEmCFxXWg6AYCggKinXn-Ywb6oNDMupo75fOWFgiQm-M-nqqI8KnOWx7hB7OaiXiZhaisv55PI350Mos0/s1600/RSS_CHIEF.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="209" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpTln1p0JkVzfb_p8cMQfG-iXokllDTkBIJJ9C2ZZYI6aQc-GL6HWcMiszzqlEmCFxXWg6AYCggKinXn-Ywb6oNDMupo75fOWFgiQm-M-nqqI8KnOWx7hB7OaiXiZhaisv55PI350Mos0/s320/RSS_CHIEF.jpg" width="320" /></a></div>
<span style="background-color: white;"><br /></span><br />
<span style="background-color: white;">खरंतर 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' यातला हा प्रकार आहे... निवडणुका अद्याप लांब आहेत. त्यातही भारतीय घटनेनुसार पंतप्रधान कोण होणार, हे आधी जाहीर करण्याची सक्ती कोणत्याच पक्षावर नाही. निवडणुका झाल्यानंतर बहुमतात निवडून आलेला पक्ष आपला संसदीय नेता कोण असणार, ते निवडतो व तो पंतप्रधान असतो. विरोधी पक्षांमधल्या सर्वात मोठ्या पक्षाचे खासदार आपला संसदीय नेता निवडतात व तो विरोधी पक्षनेता होतो... मात्र नितीश कुमारांनी उगीचच नेता जाहीर करा, असा सूर लावला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पक्षीय बलाबलाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच याचा निवाडा होऊ शकेल. कारण अनेक शक्यता आहेत. त्या अशा...</span><br />
<b>१. भाजपा संपू्र्ण बहुमतात </b>- एकट्या भाजपाला (किंवा भाजपा आणि त्याच्या हिंदुत्त्ववादी सहका-यांना मिळून) अर्ध्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर नितिश कुमारांचा मुद्दा आपोआपच बाद होईल आणि पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय एकटा भाजपा घेऊ शकेल. अर्थात, या पक्षातच अनेक इच्छुक असल्यामुळे ते काम सोपं होणार नसलं, तरी किमान नितिश कुमारांचा संयुक्त जनता दलाला त्यात मोजण्याचं कारण राहणार नाही...<br />
<b>२. एनडीए बहुमतात, भाजपा सर्वात मोठा पक्ष </b>- ही नितिश कुमारांसाठी मोठी संधी असेल. सत्ता काँग्रेसकडे जाऊ नये, असं भाजपाला वाटत असेल तर त्यांना एखाद्या छोट्या पक्षाचा पंतप्रधान करावा लागेल आणि नितिश कुमार या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर असतील. या स्थितीत त्यांना मुख्य आव्हान असेल ते शिरोमणी अकाली दलाचं... पण विकासाच्या मुद्द्यावर कुमारांचं पारडं जड ठरू शकतं.<br />
<b>३. काँग्रेस किंवा भाजपाच्या पाठिंब्यावर तिसरी आघाडी -</b> हीदेखील नितिश कुमार पंतप्रधान होऊ शकण्यासाठी आदर्श स्थिती असेल. उलट ते शरद पवार, चंद्राबाबू नायडू, जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी अशा अनेक छोट्या पक्षांची धर्मनिरपेक्ष मोट बांधू शकतील. नितिश कुमारांच्या पक्षानं प्रणवदांना पाठिंबा दिल्यामुळे ते काँग्रेसच्या नको तितके जवळ आल्याचं दिसतंय आणि ही भाजपासाठी धोक्याची सूचना असू शकते. अर्थात, या कथित धर्मनिरपेक्ष तिस-या आघाडीला भाजपाही पाठिंबा देऊ शकेल...<br />
<b>४. पुन्हा काँग्रेस - </b>पुन्हा काँग्रेस किंवा युपीए बहुमतात आल्यास पंतप्रधान कोण, हा प्रश्न फक्त १० जनपथपुरता मर्यादित होईल. अगदी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान करण्याची वेळ काँग्रेसजनांवर आलीच, तरीही नितिश कुमारांना ही संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या ते काँग्रेसजवळ सरकले असले, तरी गेली अनेक वर्षं ते भाजपासोबत आहेत आणि बिहारमध्ये युतीत सत्तेत आहेत. त्यामुळे झालं गेलं विसरून काँग्रेस त्यांना राजमुकुट देईल, अशी अजिबात शक्यता नाही.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTP20uTARYraJp0hs2_1GwLcV1xUhMWsZBks5IHVAuLGUYlftcu9PDGXpXw77xoZPZdizr_kViNWzGvl8u0BPlgOAFHerN_FUwNZ1Bo4f3-xDkI0OPkMThpsAe5TqVViXAHB6h60LcIpI/s1600/Nitish_Kumar_Narendra_Modi.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="152" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTP20uTARYraJp0hs2_1GwLcV1xUhMWsZBks5IHVAuLGUYlftcu9PDGXpXw77xoZPZdizr_kViNWzGvl8u0BPlgOAFHerN_FUwNZ1Bo4f3-xDkI0OPkMThpsAe5TqVViXAHB6h60LcIpI/s200/Nitish_Kumar_Narendra_Modi.jpg" width="200" /></a></div>
<span style="background-color: white;">पंतप्रधानपद ही 'बाजारातली तुरी' आहे. मात्र असं असताना नितिश कुमार आणि नरेंद्र मोदी (व्हाया सरसंघचालक) यांनी हा अकारण वाद घालून स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे, असं मला वाटतं. मतदार शाहणा असतो... जो खुर्चीसाठी टपून बसलेला असतो, त्याच्या गळ्यात विजयाची माळ कधीच घालायची नाही, असं गेल्या काही वर्षांत सिद्ध झालंय. (आठवा... वाजपेयींनी ६ महिने आधीच घेतलेल्या इंडिया शायनिंग निवडणुका, आडवाणींच्या स्वप्नरंजनात सरलेल्या २००९च्या निवडणुका इत्यादी) त्यामुळे बोलघेवडेपणा आणि अंतर्गत राजकारण न खेळता या दोघा विकासाभिमुख मुख्यमंत्र्यांनी आपलं काम करावं आणि नियतीला आपलं करू द्यावं, हेच इष्ट नाही का?</span></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-43316193518002933552012-06-14T03:29:00.003+05:302012-06-14T03:29:45.741+05:30जुनी पोस्ट नव्याने...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आज असंच टाईमपास म्हणून माझाच ब्लॉग वाचत बसलेलो... (हल्ली ब-याच दिवसांत लिहिलेलं नाही... लिहिण्यासाठी काही इन्पिरेशन मिळतंय का, हे बघावं, म्हणून जुन्या पोस्ट बघत होतो.) वाचताना ही पोस्ट नजरेसमोर आली आणि लक्षात आलं की अरे... १५ जून म्हणजे उद्याच की... म्हणजे या पोस्टला जवळजवळ ३ वर्ष झालीयेत आता... पण मध्य रेल्वेच्या कारभारात (नव्या गाड्या आल्यानंतरही) काडीचाही फरक पडलेला नाही... गेल्या तीन वर्षांत बहुदा एकदाही मध्य रेल्वे १०० टक्के वेळेवर धावलेली नसणार... त्यामुळेच मग त्यावेळी लोकसत्ता आणि मटा या दोन वर्तमानपत्रांनी दिलेल्या या बातम्यांचं महत्त्व किती आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे... असो! सहज गम्मत म्हणून ही जुनी पोस्ट कॉपी-पेस्ट करून टाकत आहे...<br />
<br />
<br />
<br />
<h2 class="date-header" style="background-color: #010101; border-bottom-color: rgb(219, 219, 219); border-bottom-style: solid; border-bottom-width: 1px; color: #666666; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 12px; margin: 0px; min-height: 0px; padding: 0.6em 0px 0.5em; position: relative; text-align: -webkit-auto;">
Wednesday, 17 June 2009</h2>
<div class="date-posts" style="background-color: #010101; clear: both; color: #666666; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 16px; line-height: 22px; padding-top: 15px; text-align: -webkit-auto;">
<div class="post-outer" style="border-bottom-style: none; border-top-style: none; padding: 0px 0px 10px;">
<div class="post hentry uncustomized-post-template" itemscope="itemscope" itemtype="http://schema.org/BlogPosting" style="min-height: 0px; position: relative;">
<a href="" name="3137637234538324134"></a><h3 class="post-title entry-title" itemprop="name" style="color: #2198a6; font-family: Times, 'Times New Roman', serif; font-size: 24px; font-weight: normal; line-height: normal; margin: 0px; position: relative;">
मध्य रेल्वेची "शंभरी...!"</h3>
<div class="post-header" style="line-height: 1.6; margin: 0px 0px 1.5em;">
<div class="post-header-line-1">
</div>
</div>
<div class="post-body entry-content" id="post-body-3137637234538324134" itemprop="articleBody" style="line-height: 1.4; width: 530px;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1JTOpxeC51-LPS4LWqiBWQouK-R2in5HguP5oRt8mf4-XUMMdWd4Dpk67_YVLsZwTS4yku1cGgKEfd7df0Wwf6PEHnsFpP6ysV6h1WkF9cAw-M11gzoLLPI_l6_7PDHipuUgJAEDfAgk/s1600-h/local.jpg" style="color: #4d469c; text-decoration: none;"><img alt="" border="0" id="BLOGGER_PHOTO_ID_5348322291087371490" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1JTOpxeC51-LPS4LWqiBWQouK-R2in5HguP5oRt8mf4-XUMMdWd4Dpk67_YVLsZwTS4yku1cGgKEfd7df0Wwf6PEHnsFpP6ysV6h1WkF9cAw-M11gzoLLPI_l6_7PDHipuUgJAEDfAgk/s200/local.jpg" style="border: none; float: right; height: 156px; margin: 0px 0px 10px 10px; padding: 8px; position: relative; width: 200px;" /></a><br /><div>
आज सकाळी पेपरच्या आतल्या पानावर एक बातमी वाचली. मध्य रेल्वेनं म्हणे काल १०० टक्के वेळेवर येऊन दाखवलं... <a href="http://www.loksatta.com/daily/20090617/mum01.htm" style="color: #4d469c; text-decoration: none;">(बातमी पहा)</a> खरोखर या पेपरवाल्यांना काहीच कळत नाही. इतकी महत्त्वाची बातमी आतल्या पानावर कुठेतरी फेकून द्यायची, म्हणजे काय? एकीकडे म्हणायचं, 'माणूस कुत्र्याला चावला' तरच ती बातमी... आणि दुसरीकडे मध्य रेल्वे वेळेवर धावली, तर त्याला आतल्या पानात कुठेतरी जागा द्यायची... याला काय अर्थ आहे. मराठीत आता एक नवी म्हण रूढ झाल्ये. "रोज म.रे. (म्हणजे आपली मध्य रेल्वे) त्याला कोण रडे..." अशी ख्याती असलेल्या या सगळ्यात मोठ्या सार्वजनिक वाहतुक यंत्रणेचा हा विक्रमच आहे.<br />म्हणजे कल्पना करा की हा शंभर नंबरी विक्रम मध्य रेल्वेनं रोज-रोज (अगदी १ इंच पाऊस झाल्यावरही...) केला तर काय होईल? अनर्थ ओढवेल अनर्थ.... म्हणजे बॉसला "गाडी लेट झाली" असं सांगून मैत्रिणीबरोबर चौपाटीवर फिरायला जाणं मुश्किल.... बायकोला "ओव्हरहेड वायर तुटली" असं सांगून बारमध्ये बियरच्या बाटल्या रिचवणं महाकठीण.... सासूबाई येणार असतील तर "मोटरमनचा संप आहे, येऊ नका..." असं सांगायची चोरी... "रुळांवर पाणी साचलंय... काल चालत घरी गेलो..." असं सांगून दुस-या दिवशी दांडी मारणं अशक्यच... अराजक माजेल. मग ही बातमी महत्त्वाची नाही का, तुम्हीच सांगा??<br />पण हे लिहिता-लिहिता वाटलं की आतलं पान-तर-आतलं पान.... बातमी तर छापली... म्हणजे मध्य रेल्वे वेळेवर धावली एखाद् दिवस तरी, म्हणजे ही "माणूस कुत्र्याला चावला..." या कॅटेगरीतलीच बातमी वाटली असणार छापणा-या प्रतिष्ठित वर्तमानपत्राला, नाही का? आणि पुन्हा ही बातमी छापताना त्यात मध्य रेल्वे लेट येते (म्हणजे काल सोडून....!) त्याची शंभर कारणं दिली आहेत. म्हणजे लोकं चेन (गाडीतली... गैरसमज नको!) ओढतात... (उगीचच), ओव्हरहेड वायर तुटते (उगीचच), सिग्नल बंद पडतात (उगीचच), लोक रेल-रोको करतात (उगीचच) त्याला मध्य रेल्वे काय करणार? रुळांवर पाणी साचतं, मालगाडी घसरते, इंजिनं फेल होतात त्याला मध्य रेल्वे काय करणार? असा एकूण या बातमीचा सूर आहे. ((दुस-या एका प्रतिष्ठित दैनिकानं ही बातमी फारसा मुलामा न देता दिल्ये. <a href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4664758.cms" style="color: #4d469c; text-decoration: none;">(बातमी पहा)</a> या दैनिकानं मध्य रेल्वेवर किती अन्याय केलाय, याची कल्पनाच नाही करवत...))</div>
<br /><div>
तात्पर्य काय? तर रोज "म.रे." असं नाहीये... आता उद्या-परवा केव्हाही बदलापूर-टिटवाळा-कल्याण-डोंबिवली-कळव्यात गाडीत चढता नाही आलं... गाडी लेट झाली आणि लेटमार्क लागला... किंवा आता पावसाळा आलाच आहे... तेव्हा.... (सूज्ञ मुंबईकरांना अधिक सांगणे न लगे...!) असं काहीही झालं तरी सोमवार, दि. १५ जून २००९ हा सुवर्णदिन लक्षात ठेवायचा... "हाच तो दिवस ज्या दिवशी मध्य रेल्वे १०० % वेळेवर धावली होती..." असा जप १०० वेळा 'मनातल्या मनात' करायचा (मोठ्यानं केलात तर मार खाल कोणाचातरी...) आणि मुकाट्यानं दरवाजात... माफ करा, डोअरला लटकून मुसळधार पावसात भिजत ऑफीस गाठायचं... जय महाराष्ट्र... जय मुंबई... जय म.रे...</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-76491865335842477612012-04-04T17:10:00.000+05:302012-04-04T17:10:24.505+05:30पंचाला हात..!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">ब्लॉगची सलग दुसरी पोस्ट लष्कराबाबत येतेय, हा निव्वळ योगायोग आहे... झालं असं, की 'लिहावं' असं वाटण्याजोग्या घटना नेमक्या लष्कराशीच संबंधित आहेत, त्यामुळे इलाज नाही...<br />
-------------------------<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3PUHjJ5vtrQgoD1gqVgoqY1meyvipWE0SX0gAMGB2vu0yEX14fqAlLb9NwuSYWTOaziG-8r4yM1saxanlsQqLVxFD6F3qGPVXCf0Pgnu038cZIlAXN7b1GUX9An9fA9otwZxpiOnZKXg/s1600/express+news.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="330" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3PUHjJ5vtrQgoD1gqVgoqY1meyvipWE0SX0gAMGB2vu0yEX14fqAlLb9NwuSYWTOaziG-8r4yM1saxanlsQqLVxFD6F3qGPVXCf0Pgnu038cZIlAXN7b1GUX9An9fA9otwZxpiOnZKXg/s400/express+news.jpg" width="400" /></a></div><br />
आजच्या पहिल्या पानभर बातमीत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं थेट केंद्र सरकारच्या पंचाला हात घातला आहे. <a href="http://www.indianexpress.com/news/the-january-night-raisina-hill-was-spooked-two-key-army-units-moved-towards-delhi-without-notifying-govt/932328/">ही बातमी </a> अर्थातच सर्वांनी वाचली असणार. दिवसभर सगळ्या चॅनल्सवर सुरू असलेल्या चर्चा काही जणांनी ऐकल्या असणार.. या चर्चांत प्रश्न समोर येतात ते, घडलेली घटना खरंच घडली का? घडलीच असेल, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो?<br />
इंडियन एक्सप्रेसनं केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी दिली, ही एक बाजू तर लष्कराच्या दोन तुकड्यांची मुव्हमेंट झाली होती आणि त्यामुळे केंद्र सरकारची झोप उडाली होती ही दुसरी बाजू... यामध्ये सुवर्णमध्य मांडणारेही काही जण आहेत. मुव्हमेंट झाली, मात्र तो रुटीनचा भाग होता असं ते म्हणतायत. यातलं सत्य-असत्य काय, यापेक्षा खरोखर हा बंडाचा प्रयत्न असेल, तर तो गैर आहे का असा प्रश्न माझ्या मनात येतो...<br />
लष्कराला होली काऊ मानणारे हा उठावाचा प्रयत्न नव्हता, असं ठामपणे सांगत आहेत. अर्थात लष्कराची प्रतिमा जपण्यासाठी ते असं म्हणत असतील... पण माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो की खरंच असं एखादं बंड झालं असतं आणि आपल्या लष्करानं सध्याचं निष्क्रीय आणि भ्रष्ट सरकार उलथून टाकलं असतं, तर ते चांगलं झालं असतं की वाईट? कोणी म्हणेल की असलं निकम्मं सरकार लष्करानं उठाव करून बडतर्फ केलं असतं, तरी चाललं असतं... माझंही मत तसंच आहे. पण सध्याच्या स्थितीत नाही. कारण एकतर हे सरकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं आहे आणि अजूनतरी त्यांनी लोकशाहीला धक्का लागेल असं काहीही केलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे ती सध्याच्या लष्करप्रमुखांच्या विश्वासार्हतेची... लष्करातली सगळी कारकीर्द एका जन्मतारखेवर काढल्यानंतर (कदाचित लष्करप्रमुखपदी बढतीही याच तारखेमुळे मिळालेली असताना) अचानक निवृत्त होताना त्यांना तारीख बदलावीशी वाटते... पूर्वी कधीतरी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचं ते आता निवृत्त होताना सांगतात... यामागे लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांची महत्त्वाकांक्षा आणि सरकारवर असलेली उघड नाराजीच ध्वनित होते. बंड करून अशा माणसाच्या हातात सत्ता जाण्यापेक्षा ती सध्याच्या सरकारकडे काय वाईट आहे... किमान आणखी दोन वर्षांनी त्यांना फेकून देण्याचा अधिकार तरी आपल्याकडे आहे. व्ही.के. सिंगसारख्या महत्त्वाकांक्षी लष्करी अधिका-यानं लोकशाहीच्या भल्यासाठी हे घडवलं असं मानणं खुळचटपणाचं ठरेल...<br />
आपले काही लष्करी अधिकारी कितीही भ्रष्ट असले, तरी आपली सेना ही जनसामान्यांना अतिशय प्रिय आहे. असेच पॉप्युलर आर्म फोर्सेस असलेल्या इजिप्तचं उदाहरण आपल्याकडे ताजं आहे. तिथंही लष्करानं सत्ता हाती घेतल्यानंतर लोकांनी जल्लोष केला होता. आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे आणि त्यांनी लष्करी शासनाविरुद्धही आंदोलनं करायला सुरूवात केली आहे. आपल्याकडे याचीच पुनरावृत्ती झाली नसती कशावरून?<br />
लष्कराच्या केवळ दोन तुकड्यांनी बंड करून भागलं नसतं, हेदेखील तितकंच खरं आहे... लष्कराव्यतिरिक्त आपल्या देशात वायुदल, नौदल, निमलष्करी दल अशी अनेक सैन्यदलं आहेत... त्यांना एकत्र केल्याशिवाय किंवा किमान शांत बसण्यासाठी प्रवृत्त केल्याशिवाय असं बंड होऊ शकत नाही. दिल्लीकडे कथितरित्या निघालेल्या दोन तुकड्यांच्या कमांडरना हे माहिती नसेल, असं भाभडेपणानं मानण्याचं काहीच कारण नाही...त्यामुळे या घटनेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघायची गरज आहे...<br />
कदाचित हा रुटीनचा भाग असेलही... पण तो नसेल, तर ही सिंग यांची आणखी एक खेळी असू शकते. निवृ्त्त होण्यापूर्वी त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतल्या एक-दोन अधिका-यांना हातीशी धरून सरकारवर केवळ दबाव आणायचा आणि 'असंही होऊ शकतं' याची जाणीव करून द्यायची, असा त्यांचा हेतू असू शकतो... अर्थात हा जर-तरचा विषय झाला. पण अशा पद्धतीनं बातमी आल्यामुळे जगात आपली प्रतिमा डागाळली गेली आहे, हे मात्र निश्चित...<br />
प्रतिमा लष्कराची डागाळली गेली तर आहेच, पण सरकारची, लोकशाहीची आणि भारतीय नागरिकांचीही...लष्कर आणि सरकार यांच्यात आलबेल असावं, असं कोणीच म्हणत नाही. पण किमान ही पेल्यातली वादळं पेल्यातच राहिलेली चांगली... या वादळाचा साद जगभर पसरणं देशासाठी हितावह नाही... प्रसारमाध्यमं, लष्करप्रमुख, सरकारी अधिकारी आणि मुख्य म्हणजे ही बातमी फोडणा-यांनी याचं भान ठेवणं आवश्यक आहे... </div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-84893295246655754212012-03-28T00:51:00.000+05:302012-03-28T00:51:03.605+05:30होली काऊ... होली शिट्...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">आपल्याकडे लष्कराला होली काऊ म्हटलं जातं... म्हणजे पवित्र गाय. त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, ऐकायचं नाही आणि बघायचं नाही... पण आपलं लष्कर खरोखर तितकं होली आहे का? गेल्या काही वर्षांमध्ये अशी अनेक प्रकरणं बाहेर आली. त्यावर दबक्या आवाजात चर्चाही झाली... पण आता खुद्द लष्करप्रमुखांनीच आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न झाला आणि तो बाहेरच्यानं नव्हे, तर एका निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिका-यानंच केला, असं जाहीर केलंय...<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh20qrt5L2g3pvdTBu5B-PVWOZ5w7iyh-F8irbaOsn31uTXEEBtaYUrpxbKDKdRwtXz-as_xcCE1AM8SM4b8B3LpXjRkBg3zBfOSh1InkqT7Pl3R1VSzGZub92oMtF3h1ftcH5S4d6pAxg/s1600/Army+chief.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh20qrt5L2g3pvdTBu5B-PVWOZ5w7iyh-F8irbaOsn31uTXEEBtaYUrpxbKDKdRwtXz-as_xcCE1AM8SM4b8B3LpXjRkBg3zBfOSh1InkqT7Pl3R1VSzGZub92oMtF3h1ftcH5S4d6pAxg/s200/Army+chief.jpg" width="147" /></a>लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांचा सरकारवर विशेष राग आहे. त्यांना १ वर्ष आधी घरी पाठवण्याची घाई सरकारला का झाली आहे, हे स्पष्ट नाही आणि ते कधी होणारही नाही... पण मुद्दाम त्यांची जन्मतारीख बदलून देण्यामागे काहीतरी राजकीय स्वार्थ दडलाच नसेल, असं कसं म्हणणार! त्यामुळे मग सिंग यांनी जाता-जाता सरकारला जोर का झटका देण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्यातूनच हे १४ कोटींचं प्रकरण त्यांनी पुढे रेटलंय... पण यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरं स्वतः सिंग यांनाही द्यावी लागतील.<br />
पहिली गोष्ट म्हणजे ही लाच देण्याचा प्रयत्न झाला, त्याच वेळी त्यांनी निवृ्त्त लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंग यांच्या हातात बेड्या का ठोकल्या नाहीत... उलट अँटोनींनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार जनरल सिंग यांनी हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नसल्याचं त्यांना सांगितलं होतं. हे खरं असेल, तर नेमका आत्ताच हा विषय छेडायचं कारण काय? यामुळे त्यांना सरकारची बदनामी करायची आहे की लष्कराची...<br />
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSUyj44UrEuj12TKn-R6CJc_qS_3AG7qF8la0U8fyzwzZjD4hWQSUwIKe5Vr99eDkSBv_X8ly22wvQlaFwaCIVet7XhhnJZvBvuYTXWjjv96QFacQbDDT4iSB5x5LMjyG0e-APlcZaE9U/s1600/Army.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="241" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSUyj44UrEuj12TKn-R6CJc_qS_3AG7qF8la0U8fyzwzZjD4hWQSUwIKe5Vr99eDkSBv_X8ly22wvQlaFwaCIVet7XhhnJZvBvuYTXWjjv96QFacQbDDT4iSB5x5LMjyG0e-APlcZaE9U/s320/Army.jpg" width="320" /></a>सिंग आणि अँटोनी यांच्या विधानांमध्ये सत्यता असेल, तर आपल्या लष्कराला भ्रष्टाचाराची कीड किती प्रमाणात पोखरते आहे, हे स्पष्ट होतं. पण सर्वाधिक दुःखाची बाब अशी, की ज्यांच्या हातात देशाच्या रक्षणाची खरी जबाबदारी असते, त्या सर्वसामान्य जवानांना यातून काहीच मिळत नसणार. सगळा मलिदा लाटला जात असणार तो वरच्या पदांवर... पोलिस खातं भ्रष्ट आहे, असं हे ओपन सिक्रेट आहे... पण त्यात निदान ताळातल्या हवालदारापासून ते कमिशनर, गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच काही ना काही मिळतं. (आता पोस्टनुसार त्यात फरक असेल, पण मोजके प्रामाणिक अधिकारी-जवान सोडले, तर सगळे या वाहत्या गंगेत हात धुतातच). म्हणजे मला भ्रष्टाचाराचं समर्थन करायचं नाही, पण निदान पोलिस खातं लष्कराच्या मानानं या बाबतीत सुदैवीच म्हणावं लागेल... लष्करात मात्र तसं नाही. या सात पुज्य असलेल्या आकड्यांच्या मलईमध्ये सीमेवर बर्फात किंवा वाळवंटात किंवा खोल समुद्रातल्या एखाद्या बोटीत डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करणा-या जवानांच्या नशिबी मात्र घरच्यांचा विरह, मिळेल ते कच्चं खाणं आणि आपलं नाव लिहिलेल्या गोळीची वाट बघणं यापलिकडे काहीच नसतं... बरं. लष्करात कडक शिस्त असते (म्हणे) त्यामुळे आपल्या वरच्या अधिका-यांनी किती खाल्लं, काय खाल्लं, का खाल्लं याचं उत्तर मागायचं नसतं. मागितलं आणि आपलंच कोर्ट मार्शल झालं तर काय घ्या?<br />
सिंग यांच्या आरोपाची आता म्हणे सीबीआय चौकशी होणार आहे. म्हणजे आणखी किमान ५-१० वर्षं (सहा महिन्यातून एका बातमीचा अपवाद वगळता) हा विषय फाईलबंद झाल्यात जमा आहे. जेव्हा केव्हा सीबीआयचा अहवाल येईल आणि याचा निकाल लागेल, तोपर्यंत देशात एक पिढी पुढे गेली असेल. त्यामुळे त्यात कोणाला रस असणार नाही... आता बोफोर्स तोफा खरेदी प्रकरण, क्वात्रोचीची सुटका यात कोणाला इंटरेस्ट आहे सांगा... ही नावं आता केवळ राजकीय फायदा उचलण्यासाठी काही राजकीय पक्ष अधेमधे उच्चारत असतात इतकंच... आणखी १०-१२ वर्षांनी या प्रकरणाचं महत्त्वही तितकंच उरणार आहे. आपल्या 'होली काऊ' ची ही 'होली शिट्' आहे, इतकंच...<br />
<br />
*****************<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg46ry4DGJ92cRrtse4ecXrRm4xLy9MAuB2n9YcpYzFlz4NJ2jrUIuhvT1YmRQ2tgvPotfRMTPBvUntspgQjIeXggBQGHD3_Cm_QoVzMQ_VmJ3NcglEvncQG5mQJbzDp038sT4-fJmiPMc/s1600/amar+jawan.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg46ry4DGJ92cRrtse4ecXrRm4xLy9MAuB2n9YcpYzFlz4NJ2jrUIuhvT1YmRQ2tgvPotfRMTPBvUntspgQjIeXggBQGHD3_Cm_QoVzMQ_VmJ3NcglEvncQG5mQJbzDp038sT4-fJmiPMc/s320/amar+jawan.jpg" width="240" /></a></div><i><u><span style="font-size: large;">ताजा कलम : विचारार्थ एक चौकट...</span></u></i><br />
<i><span style="font-size: large;"><br />
</span></i><br />
<i><span style="font-size: large;">टू-जी स्कॅम </span></i><br />
<i><span style="color: #660000; font-size: large;">१.७६ लाख कोटी </span></i><br />
<i><span style="font-size: large;">राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा </span></i><br />
<i><span style="color: #660000; font-size: large;">७० हजार कोटी </span></i><br />
<i><span style="font-size: large;">सत्यम घोटाळा</span></i><br />
<i><span style="color: #660000; font-size: large;">१४ हजार कोटी </span></i><br />
<i><span style="font-size: large;">चारा घोटाळा </span></i><br />
<i><span style="color: #660000; font-size: large;">९०० कोटी </span></i><br />
<i><span style="font-size: large;">आयपीएल घोटाळा </span></i><br />
<i><span style="color: #660000; font-size: large;">काही शे कोटी...</span></i><br />
<i><span style="font-size: large;"><br />
</span></i><br />
<b><i><span style="font-size: large;">सिंग यांना देऊ केलेली कथित लाच - (फक्त) १४ कोटी ? पटतंय का?</span></i></b><br />
<br />
</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-16253991974608797572011-11-29T17:53:00.000+05:302011-11-29T17:53:24.010+05:30R2020... क्रांती!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoWONblo9pojS0SVbfKjs6YOmKLURQmys-HUi-RCkHlKE1WK6zgxjCHG-A9RKPMmUgw9iTjigQhY4ZUzzPL2rXjDJ-P40V-B2yKoZspgz7JTsaRUqoqtboFfx6HJgcYyMebtT01B8UUzU/s1600/Chetan+Bhagat.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhoWONblo9pojS0SVbfKjs6YOmKLURQmys-HUi-RCkHlKE1WK6zgxjCHG-A9RKPMmUgw9iTjigQhY4ZUzzPL2rXjDJ-P40V-B2yKoZspgz7JTsaRUqoqtboFfx6HJgcYyMebtT01B8UUzU/s320/Chetan+Bhagat.jpg" width="212" /></a></div>चेतन भगत हा माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक... किंबहुना भारतीय इंग्रजी लेखकांमध्ये सर्वात आवडता. काल दुपारी चेतनचं रिव्हॉल्यूशन २०२० हे नवं पुस्तक पोष्टानं हाती पडलं आणि आजची दुपार येईस्तोवर त्याचा फडशा पाडला. चेतनच्या पुस्तकांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रोलॉग वाचल्यावर एपिलॉग वाचेस्तोवर ते खाली ठेवावंसंच वाटत नाही. २४ तासांत पुस्तक संपवलं खरं, पण डोक्यात त्याचं कथानक रेंगाळतचं आहे. पण बाकीची कामंही आहेत, त्यामुळे विचारांना वाट मोकळी करून देणं खूपच आवश्यक आहे. म्हणून तातडीनं ब्लॉग लिहायला घेतला. त्या निमित्तानं गेल्या अनेक महिन्यांचा ब्लॉगसन्यास संपला, तर सोने पे सुहागा...<br />
<br />
<div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="color: #660000;">*****************************************************</span></div><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhygCjUhhYXmM4W50ouSPwbJvhmMbFdBK4q9AFtWKt_sB2DD9jcMZuOaWPa_QLefSNWFoKbjYYoOdA8VtUvfSPQaob-MR_g78ab2kb_hawfR3RV7ullMqu5Az2DUsMPCWeQN0e2VyTV9Iw/s1600/revolution_2020.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhygCjUhhYXmM4W50ouSPwbJvhmMbFdBK4q9AFtWKt_sB2DD9jcMZuOaWPa_QLefSNWFoKbjYYoOdA8VtUvfSPQaob-MR_g78ab2kb_hawfR3RV7ullMqu5Az2DUsMPCWeQN0e2VyTV9Iw/s400/revolution_2020.jpg" width="257" /></a></div>रिव्हॉल्यूशन २०२०... खरंतर ही एक त्रिकोणी प्रेमकथा आहे. पण त्याला अनेक सामाजिक-आर्थिक-मानसशास्त्रीय पैलू आहेत. चेतनच्या आधीच्या चारही कादंब-यांमध्ये ते थोडेफार आहेतच, पण आर२०२० (आरतीनं केलेला शॉर्टफॉर्म) या पुस्तकाइतकं कधीच नाहीत.<br />
गोपाळ हा चेनतच्या अन्य हिरोंसारखाच 'लूजर..' त्याचा शाळेपासूनचा मित्र, राघव हुश्शार आणि मैत्रीण आरती दिसायला सुंदर... स्टोरी तशी टिपिकल. गोपाळचं आरतीवर जीवापाड प्रेम... आरती त्याला आपला सगळ्यात जवळचा मित्र मानते (ते शाळेत असतानापासून सोबत असतात.) पण इंजिनियरिंग एन्टरन्समध्ये नापास झाल्यानंतर गोपाळ दुस-या गावी पुन्हा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातो आणि नेमके त्याच वेळी राघव आणि आरती जवळ येतात. ती तसं गोपाळला सांगतेही... गोपाळ परत आल्यानंतर त्याच्या मनात सुरू झालेलं द्वंद्व... तो आणि आरती पुन्हा आणि जास्त जवळ येणं.... राघवपासून वाढत असलेलं अंतर आणि असं बरंच काही...<br />
पण या सगळ्या गोष्टीचा कणा आहे, राघवला हवी असलेली क्रांती... क्रांतीसाठी झपाटलेला राघव. त्याचा राजकारण्यांशी संघर्ष... त्याच वेळी त्याच राजकारण्यांच्या मदतीनं मोठा होत असलेला गोपाळ... त्यामुळे त्या दोघांमध्ये असलेला संघर्ष... अर्थात रावघच्या दृष्टीनं हा संघर्ष व्यावसायिक असला, तरी गोपाळसाठी तो आरतीचा प्रश्न असतो. त्याला कोणत्याही स्थितीत आरती हवी असते. तशी ती त्याच्याजवळ येतेदेखील... पण!<br />
कादंबरीच्या शेवटची प्रकरणं चेतननं जबरदस्त घेतली आहेत. एका लहानशा प्रसंगामुळे सगळंच चित्र बदलतं आणि आपल्याला लूजर-पैशांच्या मागे लागलेला-लाचखोरी करणारा गोपाळ आपलंसं करून घेतो... अर्थात इथं शेवट सांगून कादंबरी वाचण्यातली मजा हिरावून घ्यायची नाही, त्यामुळे हे वर्णन इथंच थांबवतो.<br />
<br />
<div style="text-align: center;"><span class="Apple-style-span" style="color: #660000;">*****************************************************</span></div><br />
कादंबरीला चेतन भगतनं दिलेला सामाजिक आशय मात्र जबरदस्त आहे. त्याची थ्री मिस्टेक्स वगळता अन्य कादंब-यांमध्ये तसा तो तितका दिसत नाही. शिक्षणाचं बाजारीकरण, भ्रष्टाचार, हे प्रकार संपवण्याची गरज, त्यासाठी झपाटलेला राघव हे सामाजिक तसंच राघव आणि गोपाळच्या द्वंद्वात अडकलेली आरती, आपल्या झपाटलेपणामुळे तिच्यापासून दूर गेलेला राघव, वाराणसीच्या आमदाराची मनस्थिती आणि मुख्य म्हणजे गोपाळ... अशा अनेक मानसिक बाबी या कादंबरीत अतिशय योग्य पद्धतीनं हाताळल्या आहेत. एकूण काय, तर ही कादंबरी (नेहमीप्रमाणे) अतिशय वाचनीय आणि चिंतनीयही झाली आहे. इंग्रजी पुस्तक वाचण्याची आवड असलेल्यांनी ती वाचली पाहिजेच.. पण तशी सवय नसलेल्यांनीही वाचायला हरकत नाही. (अन्य भारतीय लेखकांप्रमाणे) कोणतीही क्लिष्ट भाषा न वापरताही कादंबरी रंजक होऊ शकते, हे वाचल्यावर लक्षात येईलच... So... Read R2020 for sure... Happy Reading....</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-39030895338781430702011-08-20T01:40:00.000+05:302011-08-20T01:40:50.933+05:30अण्णा एके अण्णा...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQ1Ys2e-fjQ2DnAsvU_vrY4S9jDLxLZwv80JEf1S52z-WcS837-CSkOAYhbCrqDl0Oi12ahCnbEBa2bB4opPTeKYb58kB8W85f64dEO-q6-IHuABhDb4dt4YZWdoMMYdh9R41p7FZK7UA/s1600/Anna_Hazare.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgQ1Ys2e-fjQ2DnAsvU_vrY4S9jDLxLZwv80JEf1S52z-WcS837-CSkOAYhbCrqDl0Oi12ahCnbEBa2bB4opPTeKYb58kB8W85f64dEO-q6-IHuABhDb4dt4YZWdoMMYdh9R41p7FZK7UA/s200/Anna_Hazare.jpg" width="189" /></a></div>आज घरी पुजा होती. त्यानिमित्त गावातले आणि जवळचे नातलग घरी आले होते. सध्या घरी-दारी एकाच विषयाची चर्चा आहे.. अण्णा हजारे. देशभरात अण्णा-लाट पसरलेली असताना आमचं घरही त्याला अपवाद कसं असणार? माझा वैयक्तिकरित्या आताच्या अण्णांच्या उपोषणाला विरोध आहे. त्यामुळे सहाजिकच मी अल्पमतातला... माझी मावसबहीण मधुरा एकदम अण्णामय झालीय. त्यामुळे अर्थातच मोठा वाद रंगला. त्यावेळी तिनं अनेक दावे केले. वादविवादात ते खोडून काढले असले, तरी मुळात मी पत्रकार असल्यामुळे बोलण्यापेक्षा लिहायची सवय अधिक. त्यामुळे ब-याच दिवसांनी ब्लॉग लिहायला मुहूर्त सापडला. त्या निमित्तानं आपले विचार शब्दांत मांडायची संधीही साधता येतेय, याचंदेखील समाधान....<br />
<div style="text-align: center;">--------------</div>पहिला मुद्दा म्हणजे अर्थातच देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी अण्णांचं उपोषण आहे, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. दुसरा गैरसमज म्हणजे अण्णांचं उपोषण लोकपाल विधेयकासाठी आहे. ही दोन्ही गृहितकं चुकीची आहेत. अण्णांचं सध्याचं उपोषण हे त्यांनी देऊ केलेलं लोकपाल विधेयकच संमत झालं पाहिजे, यासाठी आहे. लोकपाल विधेयकासाठी उपोषण करण्याची गरज नाही. कारण ते संसदेत मांडलं गेलंय आणि स्थायी समितीकडेही पाठवण्यात आलंय. ही प्रशासकीय यंत्रणा आहे. इथं कोणतेही चमत्कार होत नसतात. त्या प्रक्रियेला जितका वेळ दिला गेला पाहिजे, तितका दिला गेलाच पाहिजे... प्रक्रिया सुरू झाली असती आणि मग बासनात बांधली गेली असती, तर मी अण्णांना संपूर्ण पाठिंबा दिला असता... आता पहिला गैरसमज... या उपोषणामुळे देशातला भ्रष्टाचार खरोखर संपणार आहे का? दिल्लीत आणि देशभरात झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारे किती लोक प्रामाणिक आहेत? लायसन्स नसेल, तर किती जण दंड भरतात? पास नसताना पावती फाडण्याची तोषिश किती जण सहन करतात? ते सगळं जाऊदे... यातल्या किती लोकांनी आजवर सिक-लिव्हसाठी डॉक्टरचं खोटं प्रमाणपत्र दिलेलं नाही? आपण सगळेच भ्रष्ट झालेलो असताना एका उपोषणानं आणि नारेबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही, हे समजण्याइतकं आपण सूज्ञ असायलाच हवं. चॅरिटी बिगिन्स ऍट होम, या धर्तीवर नॉन-करप्शन बिगिन्स ऍट होम, असं म्हणायला हवं. (आपण आपल्या मुलांनाही सांगतो, पहिला आलास तर सायकल घेईन. हे काय आहे?) याबाबत जनजागृती करण्यासाठी अण्णा आणि त्यांच्या टीमनं देशभरात दौरा केला असता, तर अधिक बरं झालं असतं...<br />
भ्रष्टाचार कसा सुरू होतो, हे आपल्याला माहितीच आहे... त्याचं उदाहरण बघा...<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/-pZaljDd5PE?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div><br />
<div style="text-align: center;">--------------</div>अण्णांचा आग्रह पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत आणण्याला आहे. याची खरंच काय गरज आहे, हे समजण्या पलिकडचं आहे. पंतप्रधान हा लोकांनी निवडून दिलेल्या संसदेला उत्तरदायी असतो आणि आपल्या लोकशाहीत संसद ही सर्वश्रेष्ठ आहे. पंतप्रधानाला हटविण्याचा अधिकार संसदेला आहे... आणि जर योग्य प्रतिनिधी निवडून गेले, तर त्या संसदेची पंतप्रधानालाही जरब वाटेल. मग माझ्या मनात प्रश्न येतो की, योग्य लोकं निवडून का जात नाहीत? याचं उत्तर शोधताना पुन्हा दुर्दैवानं स्वतःकडेच बोट जातं. अण्णांना पाठिंबा देणारे किती जण नियमित मतदान करतात? लागून सुट्ट्या आल्या, की पिकनिकचे प्लॅन आखले जातात. अगदी गावात असलोच, तर टाकून येऊ मत... तेवढंच लोकशाही जपल्याचं पुण्य! पण मतदान हे आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये सर्वात तळाला असतं. मग चांगले लोकं संसदेत जाणार कसे आणि पंतप्रधानाला त्यांची भीती वाटणार कशी? मनमोहन सिंगांसारखा दुबळा पंतप्रधान असणं, हेदेखील आपल्याच मतदान नाकर्तेपणाचं फलित आहे, असं वाटत नाही का? कलमाडींना कोणी निवडून दिलं? राजांना कोणी निवडून दिलं? त्यांना मतं दिलेल्यांनी त्यांना निवडलं आहे, असं आपल्याला वाटत असेल, तर तो मोठ्ठा गैरसमज आहे. मतदान न केलेल्यांनी त्यांना लोकसभेवर पाठवलंय. केलेल्यांनी नव्हे!!!<br />
<div style="text-align: center;">--------------</div>आणखी एक प्रश्न... अण्णांना ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्यापैकी, ती जणांनी जन लोकपाल विधेयकाचा मसुदा आणि लोकपाल विधेयकाचा मसुदा यांचा अभ्यास केला आहे? अभ्यास जाऊ दे, ती फार लांबची गोष्ट आहे. किती जणांनी या मसुद्यांचं फ्रंट कव्हर प्रत्यक्ष हातात घेऊन पाहिलंय? घरी राहून पाठिंबा देणारेही राहू द्या... रस्त्यावर उतरलेल्यांपैकी किती जणांनी ते पाहिलंय?<br />
इथं एक स्पष्टिकरण केलं पाहिजे. मी कोणताही मसुदा पाहिलेला नाही. त्याचा अभ्यास ही तर डोक्यावरून जाणारी गोष्ट झाली... पण मला तशी गरज वाटत नाही. कारण मी अण्णांचं अंधानुकरण करत नाहीये. पण जे अण्णा-अनुयायी आहेत, त्यांनी तरी ते पाहिलेलं असावं, अशी अपेक्षा आहे... मला खात्री आहे, की यातल्या फार थोड्या लोकांनी हे पाहिलं असणार... पण मग रस्त्यांवर इतकी गर्दी का? रामलीला मैदान पॅक का झालंय? <br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div>माझ्या मते, देशभरातल्या रस्त्या-रस्त्यांवर व्यक्त होतोय, तो बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविषयीचा संताप... या संतापाचं प्रकटीकरण आपण अण्णांना असलेला पाठिंबा मानतो आहोत... पण अण्णांच्या निमित्तानं का होईना, देशात एक मंथन होतंय, ही चांगली बाब आहे. अण्णांच्या (आरटीआय वगळता) भूतकाळातील आंदोलनांसारखी याची गत होऊ नये, ही प्रामाणिक इच्छा आहे. या निमित्तानं अर्धा भारत जरी जागृत झाला, तरी आपल्याला महासत्ता होण्यापासून कोणी अडवूच शकणार नाही... या आंदोलनाची परिणती काही का असेना, ते कोणत्याही भल्या-बु-या कारणानं अर्धवट राहू नये, ही माझ्यासह सर्वांना शुभेच्छा...<br />
<br />
<div style="text-align: center;">--------------</div><div><br />
</div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-25728404460057197332011-05-15T02:06:00.000+05:302011-05-15T02:06:38.716+05:30सेंट पर्सेंट बालगंधर्व...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9TDaMVZ0tbT_haeF6Aymz6OwyitNsc2okMybDzX7HkEpXDAOf8ldM9VPd-fFKUprmcHShCgBf99PDf0LiWVLjeLjULLbL6dsNgnjMvvf-xPFVhjKf4_ASw_O6jxVHQBG6P9naHWWQFLI/s1600/balgandharva.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="168" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9TDaMVZ0tbT_haeF6Aymz6OwyitNsc2okMybDzX7HkEpXDAOf8ldM9VPd-fFKUprmcHShCgBf99PDf0LiWVLjeLjULLbL6dsNgnjMvvf-xPFVhjKf4_ASw_O6jxVHQBG6P9naHWWQFLI/s400/balgandharva.jpg" width="400" /></a></div>सर्वप्रथम नितीन देसाई आणि त्यांच्या टीमचे आभार... बालगंधर्व केवळ पुण्यातल्या रंगमंदिरातील चित्रात पाहिलेल्यांना त्यांचं दर्शन घडवून आणल्याबद्दल...<br />
<br />
आज बालगंधर्व हा चित्रपट पाहिला आणि पाहिला नसता तर आपण काय गमावलं असतं, याची सर्वप्रथम जाणीव झाली. एकतर बालगंधर्वांसारख्या ज्येष्ठतम रंगकर्मीच्या आयुष्याची ही कथा. त्यामुळे त्यात 'नाट्य' असणार, यात नवल ते काय? पण हे नाट्य ज्या खुबीनं पडद्यावर आलंय, त्याला तोड नाही. स्वतः चित्रपटांचे क्षेत्र न पटलेल्या बालगंधर्वांना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली असूच शकत नाही. दैवाने (सु की दुर् हे पाहणा-याच्या दृष्टीकोनावर आहे... माझ्या दृष्टीने सु) मी टीव्ही माध्यमात काम केलं असल्यामुळे कोणत्याही हालत्या चित्रांकडे पाहण्याचा अँगल आपोआप वेगळा झाला आहे. कॅमेरा, एडिटिंग, लाईट यासारख्या गोष्टींकडे अन्यथा लक्ष जाण्याचं फारसं कारण नाही. त्यामुळेच अनेक चित्रपट त्यांच्यातल्या तांत्रिक दोशांमुळे आवडत नाहीत. बालगंधर्व मात्र याला सन्मान्य अपवाद ठरला याचा खूप आनंद वाटला...<br />
<div style="text-align: center;">००००००००००००००००००००० </div>मला भावलेला बालगंधर्व माझ्या ब्लॉग वाचकांसाठी थोडक्यात... अर्थात सर्वाधिक भावलेल्या पैलूंच्या चढत्या क्रमाने...<br />
१. कथा - कथा आवडणारच होती, कारण ती बालगंधर्वांची होती.<br />
२. पटकथा - बालगंधर्वांच्या आयुष्यातले चढ-उतार आणि त्यातलं नाट्य अत्यंत प्रभावीपणे मांडलं गेलं आहे. कोणताही संवाद किंवा एखादा शॉट हा ऊगीचच आहे, हा सीन नसता तर चाललं असतं, असं एकदाही वाटलं नाही. त्यामुळेच कथेपेक्षा जास्त पटकथा भावली.<br />
३.छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) - मराठी चित्रपटांमध्ये आभावानं आढळणारा हा गुण बालगंधर्वमध्ये दिसतो. अगदी पहिल्या शॉटपासून ते शेवटी मावळत्या सूर्याला सामोरे जाणा-या बालगंधर्वांपर्यंत... प्रत्येक ठिकाणी कॅमे-याचा अँगल, त्याचं फ्रेमिंग अतिशय अचुक झालं आहे. मराठी चित्रपटातही हे होऊ शकतं, याचं उदाहरण बालगंधर्वनं घालून दिलं आहे. ५. संकलन (एडिटिंग) - चांगल्या कॅमेरावर्कला चांगल्या एडिटिंगची साथ मिळाली, तर काय होऊ शकतं याचा पाठ बालगंधर्वमध्ये दिसतो. इफेक्ट्सचा भडीमार न करता केलेलं एडिटिंगही चांगलंच असतं, हे या चित्रपटानं दाखवून दिलं आहे. मध्यंतर होतानाचा शॉट हा एडिटिंगचा परमोच्च बिंदू ठरावा. बालगंधर्व पावसात भिजत जात आहेत... रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब त्यांच्या पायानं मोडतं... पाणी परत स्थिरावत असताना मध्यंतर ही अक्षरं येतात आणि त्यातील ध्य वर असलेला अनुस्वार हा सूर्याचं प्रतिबिंब असतं... क्लासिक. जस्ट क्लासिक. (शब्दांत वर्णन करता येणं अशक्य आहे... बघायलाच हवा असा हा शॉट आहे.)<br />
५. संगीत - कौशल इनामदार यांनी केलेला शास्त्रीय संगीताचा वापर हे एक कारण आहेच... शिवाय चित्रपटात जागोजागी पेरलेली बालगंधर्वांच्या नाटकातली पदंही गोड वाटतात. आर्या आंबेकरच्या पहिल्या बंदिशीसह सगळीच पदं-गाणी मस्त जमली आहेत. ऐकायला जाम मजा आली. राहुल देशपांडे केशवराव भोळेंच्या भूमिकेत भाव खाऊन गेले आहेत...<br />
६. कलाकार - विभावरी देशपांडे यांनी लक्ष्मीबाई मस्त केली आहे. डाऊन टू अर्थ, सोशिक आणि तरीही कणखर... लहानशा भूमिकांमध्येही आपल्याला प्राण ओतलेला दिसतो. अथर्व कर्वेच्या बाल नारायणापासून निर्माते नितीन देसाई यांच्या लोकमान्य टिळकांपर्यंत... प्रत्येकाचं काम मस्त आहे. सर्वांनी आपापला 'रोल' सॉलिड ताकदीनं केला आहे. कलाकारांच्या सहज अभिनयामुळे वरच्या सर्व गोष्टींना महत्त्व आहे.... मुळात ऐतिहासिक कथानक असल्यामुळे पाहुण्या कलाकारांचा प्रचंड राबता असतानाही प्रत्येक भूमिकेवर बारीक काम आणि प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसतं. म्हणूनच चित्रपटाच्या श्रेय्यनामांची चढती भाजणी लावताना दुस-या क्रमांकाचा मान हा चित्रपटातल्या कलाकारांकडे जातो.<br />
आणि<br />
७. सुबोध भावे - काय दिसतो सुबोध या सिनेमात... भन्नाट! चित्रपटातला सुबोधनं साकारलेला बालगंधर्व बघत असताना मला पुलंच्या हंड्रेड पर्टेंट पेस्तनकाकांची आठवण आली... 'विष्णुपंत पागनीस म्हणजे सेंट पर्सेंट तुकाराम... खरा तुकाराम बी असा नाय....' हे पेस्तनकाकांचं वाक्य 'सुबोध भावे म्हणजे सेंट पर्सेंट बांलगंधर्व... खरा बालगंधर्व बी असा नाय...' असं नावं बदलून टाकलं, तरी चालेल. कारण पेस्तनकाकांनी खरा तुकाराम आणि आम्ही खरा बालगंधर्व पाहिलेलाच नाही! त्यामुळे यापुढे बालगंधर्वांबाबत काही वाचण्या-ऐकण्यात आलं, तर डोळ्यासमोर सुबोध दिसणार! सेंट पर्सेंट बालगंधर्व...<br />
सुबोधनं अतिशय साध्या पद्धतीनं बालगंधर्वांचं बेअरिंग घेतलं आहे. धोतर-सदरा घातलेला सुबोध आणि भरजारी शालू नेसलेला सुबोध, या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत... त्याच्या अभिनयात कुठेही भडकपणा नाही. (तसा मला तो धोबीपछाड वगळता अन्यत्र कुठेही दिसलेला नाही म्हणा.) लुगडं नेसल्यानंतर थेट बालगंधर्वांच्या शैलीत खांदा किंचित खाली पाडून उभं राहणा-या सुबोधच्या अभिनयातले बारकावे मनाला भावले. सुबोध... चित्रपटाच्या यशाचे मानकरी ठरवताना पहिल्या क्रमांकाचा मान तुलाच द्यायला हवा... तो तुझाच अधिकार आहे...<br />
<div style="text-align: center;">०००००००००००००००००० </div>हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग आणि आता बालगंधर्व... मनोरंजनाच्या तीन भिन्न क्षेत्रांशी जुळलेले हे तीन छान चित्रपट. नंदू माधव यांचा फाळके, अतुल कुलकर्णीचा गुणा आणि सुबोधचा बालगंधर्व... तुलना होऊच शकत नाही. तीन्ही भूमिका वेगळ्या धाटणीच्या आणि तितक्यात ताकदीने पेललेल्या. आता आपल्या मालकीचा ब्लॉग असल्यामुळे जाता-जाता एक इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. ही बायोग्राफीची मालिका खंडित होऊ नये, असं वाटतंय... आणि पुढला नंबर दादा कोंडकेंचा लागला, तर फारच मजा येईल. एकाद्या निर्मात्या-दिग्दर्शकाच्या मनातही माझ्यासारखीच ही कल्पना घोळत असेल का? असावी, असं मनापासून वाटतंय....</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-76281535345163602842011-05-04T11:00:00.000+05:302011-05-04T11:00:42.517+05:30कोणी बनवेल का हा कीबोर्ड?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">बराक ओबामा यांच्या आदेशावरून अमेरिकन सैनिकांनी पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. याची ब्रेकिंग न्यूज देण्याच्या भानगडीत अनेक चॅनल्स आणि खूप देण्याच्या भानगडीत वर्तमानपत्रांचा थोडा गोंधळच झाला. ओबामा आणि ओसामा यांच्या नावातील साधर्म्यामुळे काहींनी ओबामांचाच 'एन्काऊंटर' केला. एव्हाना फेसबुकवर त्याच्या अनेक क्लिप्स आणि फोटो पडले आहेत... त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी खास पत्रकारांकरता एखाद्या कंपनीनं कीबोर्ड तयार करावा, असं वाटतंय. डिझाईनिंगमध्ये कंपनीचा वेळ जाऊ नये, यासाठी मी फोटोशॉपवर डिझाईन तयार केलंय... इच्छुक कंपन्यांनी कॉपिराईट मिळवण्यासाठी संपर्क साधावा...<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpDRrrcip637A4Stdpz36GuaJO4bWiaoQ6DlJ7sbAopshSB-EQ32BzkkTiUUeRnS4lJmNFCgnAEnqoyBfJQ16c016f1xcGPdGwLxxae8GhY4M9WVa-zZ2_1sn4miosDSQCK3lXNlgJTiQ/s1600/keyboard-new.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="295" j8="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpDRrrcip637A4Stdpz36GuaJO4bWiaoQ6DlJ7sbAopshSB-EQ32BzkkTiUUeRnS4lJmNFCgnAEnqoyBfJQ16c016f1xcGPdGwLxxae8GhY4M9WVa-zZ2_1sn4miosDSQCK3lXNlgJTiQ/s400/keyboard-new.jpg" width="400" /></a></div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-75530100938325810842011-04-27T02:05:00.000+05:302011-04-27T02:05:10.984+05:30एक नल्ला प्रेस कॉन्फरन्स...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">पत्रकार परिषद म्हणजे जिथं पत्रकारांचा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी किंवा महत्त्वाच्या घटनेबाबत कोणाशीतरी सार्वजनिक संवाद होतो तो कार्यक्रम अशी माझी आजवरची समजूत होती. मात्र आज ही समजूत खोटी असल्याचं माझ्या लक्षात आलंय... <br />
मी आज एका 'पत्रकार परिषदे'ला गेलो होतो. रीबॉक या जोडे बनवणा-या कंपनीनं आपले ब्रॅण्ड ऍम्बेसिडर असलेल्या क्रिकेटपटूंचा सत्कार आयोजित केला होता. त्या निमित्त ही तथाकथित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. खेळाडूही कोणी छोटे नव्हते. कर्णधार धोनी, युवराज, भज्जी, युसूफभाई आणि पियुष चावला या विश्वविजेत्या संघातल्या खेळाडूंचा हा सत्कार होता... पण म्हणजे इव्हेंट तसा मोठाच होता... त्यात वाद नाही. पण त्याला पत्रकार परिषद म्हणून आयोजकांचं जरा चुक्याच... ही निमंत्रणपत्रिका बघा... त्यात चक्क लिहिलंय प्रेस कॉन्फरन्स आहे असं...<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEih4eEKL-f1c1xMJzPh1fwHBFINDGPidV_2O7KXgyBnbG9iGVguZForSGtC8TeX6-mBZGGT-0SzOv-XpjWMLkh_yyGA3n9W34qyaGdEIxMnb1IOsNTwZP-db9NKOyHPZ7LN0R1UFCjwEXg/s1600/Invite+copy.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="400" i8="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEih4eEKL-f1c1xMJzPh1fwHBFINDGPidV_2O7KXgyBnbG9iGVguZForSGtC8TeX6-mBZGGT-0SzOv-XpjWMLkh_yyGA3n9W34qyaGdEIxMnb1IOsNTwZP-db9NKOyHPZ7LN0R1UFCjwEXg/s400/Invite+copy.jpg" width="372" /></a></div><br />
आता त्या 'प्रेस कॉन्फरन्स'चं थोडक्यात वर्णन - <br />
साडेचारची पी.सी. आहे, असं निमंत्रणपत्रिकेत आहे ना... तर भारतीय प्रमाणवेळेनुसार बरोब्बर ४.५० वाजता कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाचा अँकर स्टेजवर आला (हो... पत्रकार परिषदेसाठी सजवलेलं स्टेज होतं...) आणि त्यानं कार्यक्रमाचा उद्देश-बिद्देश सांगणारं प्रास्ताविक केलं. त्यानंतर एकेक करून पियुष चावलापासून ते धोनीपर्यंत सगळ्यांना बोलावलं. रीबॉकच्या भारतातल्या एमडीला पण बोलावलं (हा एमडी सगळ्यात उंच बार चेअरवर बसला होता... धोनी आणि युवी त्याच्या बाजुला. मधला स्टंप तेवढा उंच होता.) त्यानंतर या अँकरनं त्या एमडीला दोन-तीन प्रश्न विचारले. त्यानंतर धोनीला, मग युवीला, मग भज्जीला, मग युसूफ पठाणला (कार्यक्रमातला एकमेव हिंदी संवाद) आणि शेवटी पियुषला.... यातला दुसरा प्रश्न कायम होता... 'संघाच्या फिटनेसमुळे हा विजय मिळवणं शक्य झालं आहे... या फिटनेसचा राज (हिंदीतला) काय?' त्याला या पाचही जणांनी उत्तर दिलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....'<br />
<span style="color: #990000;"><strong><em><span style="font-size: large;">होय....</span> दचकू नका... खरंच त्यांनी सांगितलं 'रीबॉकच्या नव्या अमक्या-अमक्या ब्रॅण्डमुळे आमचा फिटनेस टिकून राहिला....' </em></strong></span><br />
आता मला सांगा बुटाचा आणि फिटनेसचा काही संबंध आहे का? रीबॉकचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर झालात म्हणजे काय वाट्टेल ते सांगाल काय... पण असो. मी म्हटलं असे ना का... आपलं काय जातंय... त्यांना पैसे मिळतात हे बोलायचे, म्हणून बोलले असतील. <br />
ही लुटूपुटूची प्रश्नोत्तरं झाल्यावर मग त्या एमडी साहेबांनी सगळ्यांना सोन्याचा मुलामा दिलेल्या बॅट वाटल्या... हे चालू असताना फोटोग्राफर आणि कॅमेरामेनची नैमित्तिक धक्काबुक्की झालीच. त्यात विशेष काही नाही... मग एक अनंत काळ चालणारं फोटोसेशन झालं या पाच जणांचं सोनेरी बॅटी हातात पकडून... एकदाचं ते फोटो सेशन संपल्यावर तो अँकर म्हणाला आल्याबद्दल धन्यवाद आता नाश्ता करा आणि घरी जा.... ते सहा जण (म्हणजे पाच क्रिकेटर आणि सहावा एमडी) मागल्या बाजूनं कुठेतरी अदृष्य झाले.... झाली प्रेस कॉन्फरन्स.... <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxYr2e6xy29Wzw7qQEGFt-xXIyuqxt7rb6vJl4w6MlR4lvfzGwaQ5bWxJg4h6Taw5zrPDMlYBhHbMTp-mCmN-nc7tlfNuaVM9vwtHTG_NuVxGC0tLZ570n7MKfeFNPV0o6qe6faN5FzLI/s1600/pen.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="33" i8="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxYr2e6xy29Wzw7qQEGFt-xXIyuqxt7rb6vJl4w6MlR4lvfzGwaQ5bWxJg4h6Taw5zrPDMlYBhHbMTp-mCmN-nc7tlfNuaVM9vwtHTG_NuVxGC0tLZ570n7MKfeFNPV0o6qe6faN5FzLI/s400/pen.jpg" width="400" /></a></div>आता शब्दशः विचार करायचा म्हटला तर त्यांनी बॅटी दिलेल्या विटनेस करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे, असं निमंत्रण पत्रिकेत म्हटलंय. त्यामुळे शाब्दिक च्छल करायचा तर हे तांत्रिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे. पण मग मुंबईभरच्या स्पोर्ट्स रिपोर्टर्सना तिथं जायची काय गरज होती? (मी स्पोर्ट्स रिपोर्टर नसलो तरी क्रिकेटमध्ये आवड असलेला पत्रकार असल्यानं वैयक्तिक खाज म्हणून तिथं गेलो होतो.) माझ्या मनात काही प्रश्न होते. ते विचारायचे होते. तिथं अनेक पेपर आणि चॅनल्सचे क्रीडा प्रतिनिधी आले होते. ते हा सोहळा पाहण्यासाठी निश्चित आले नसणार. त्यांच्या मनातही माझ्यासारखेच अनेक प्रश्न असणार. वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीची पत्रकार परिषद झाली होती की नाही ठाऊक नाही... पण त्यानंतर आणि आयपीएल सुरू असताना मिळालेली ही चांगली संधी होती. पण आयोजनातील त्रुटीमुळे ती संधी मिळूच शकली नाही... आता ही नल्ला पत्रकार परिषद आयोजित करणा-या परफेक्ट रिलेशन्सचं पाच स्टार्सच्या वेळीची बचत करून रीबॉकशी रिलेशन परफेक्ट झालं असलं, तरी माझ्यासारख्याच्या मनात मात्र हे रिलेशन गढूळ झालं आहे. असा पीआर काय कामाचा? पण कदाचित हाच सध्याचा ट्रेण्ड असावा... माझी अवस्था मात्र कानाखाली 'बुट' मारल्यासारखी झाली, हे सांगायला नको... <br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBZFiFZRID8563s9MHY1_yWVpvDWUL-M6VYs_4t683mAYhykKACCra10SRIx9VbklH4iSPcJDF0-LR3zG1t_9-IPnUnILgwVPE8JEt0Slc-gWupMtw7qBS3tHAReDppfuPE_989cimg_4/s1600/pen1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="33" i8="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBZFiFZRID8563s9MHY1_yWVpvDWUL-M6VYs_4t683mAYhykKACCra10SRIx9VbklH4iSPcJDF0-LR3zG1t_9-IPnUnILgwVPE8JEt0Slc-gWupMtw7qBS3tHAReDppfuPE_989cimg_4/s400/pen1.jpg" width="400" /></a></div><span style="color: #0c343d;">ता.क. : मुंबईतल्या पत्रकारांना रीबॉक आणि परफेक्ट रिलेशन्सवाल्यांनी बॅटी देताना टाळ्या वाजवण्यासाठी बोलावलं असेल, तर ती सगळ्यात मोठी चूक म्हणावी लागेल... कारण पत्रकारांइतकं टाळ्या वाजवण्यात कंजुषी करणारं दुसरं कोणीही माझ्या पाहण्यात नाही... </span><br />
<div style="text-align: center;"></div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-35998297974617730322011-04-05T01:31:00.000+05:302011-04-05T01:31:46.841+05:30नाही विसरू शकत हा दिवस...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"><span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="color: #cc0000;">२५ जून ८३ </span></span><span style="mso-bidi-font-family: Mangal;"><span style="color: #cc0000;">:</span> </span><span lang="MR" style="font-family: Mangal;">आमच्या कल्याणच्या दोन खोल्यांच्या चाळीतील बाहेरची खोली (त्याला तेव्हा हॉलच म्हणायचो, पण तीच गेस्ट रूम, तीच बेडरूम होती.) चाळीत २-३ टीव्ही होते. त्यातला एक चक्क आमच्याकडे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट. माझं वय तेव्हा फक्त ८-९ वर्षं... क्रिकेट समजणं तर दूरच पण क्रिकेट म्हणताही यायचं नाही धड, इतकं कमी. पण आमच्या घरात चाळीतले बरेच जण आणि ठरवून मॅच बघण्यासाठी आलेले माझ्या बाबांचे मित्र अशी तोबा गर्दी अजून आठवते आहे... शेवटी एका राक्षसासारख्या दिसणा-या माणसाला कोणीतरी आऊट (</span><span style="mso-bidi-font-family: Mangal;">?</span><span lang="MR" style="font-family: Mangal;">) केलं आणि आमच्या घरात एकच गोंधळ माजला, तो आठवतोय... चाळीतल्या जिन्यात वात सोलून फोडलेली लालमहाल डामरी आठवतेय... या आठवणी धूसर आहेत</span><span style="mso-bidi-font-family: Mangal;">,</span><span lang="MR" style="font-family: Mangal;"> पण त्या शेवटपर्यंत कायम राहणार आहेत...</span></div><div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"><span lang="MR" style="font-family: Mangal;">--------------</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtK3dx4ePGNHSFGSu6ldm-hetCeJG_Y0DnpMgkqOMJz4lZ13siGJMO97SnrRgz2_pWHw5gX_KCYU6xkKk0uk8GbC5PiGPhpZkRebcx3X6mGv0rfQ4cInyBKtBHWhyKYvKBkbGqG7w3gHE/s1600/wc2.png" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" r6="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtK3dx4ePGNHSFGSu6ldm-hetCeJG_Y0DnpMgkqOMJz4lZ13siGJMO97SnrRgz2_pWHw5gX_KCYU6xkKk0uk8GbC5PiGPhpZkRebcx3X6mGv0rfQ4cInyBKtBHWhyKYvKBkbGqG7w3gHE/s320/wc2.png" width="182" /></a></div><div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"><br />
</div><div class="MsoNormal" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; margin: 0cm 0cm 0pt;"><span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="color: #990000;"><span style="color: #cc0000;">२ एप्रिल २०११ :</span> </span>वानखेडे स्टेडियम... या ठिकाणी एक इतिहास रचला गेला. माझ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनसाठी, पूर्ण न झालेलं त्याचं एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या भारतीय संघानं प्राण पणाला लावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वविजेता झाला... या इतिहासाचा जवळून साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली... जवळून म्हणजे... थेट वानखेडे स्टेडियममधून... आणि गमतीची गोष्ट म्हणजे मी स्टेडियममध्ये बसून पहिल्यांदाच मॅच बघत होतो... </span> </div><br />
<br />
खरं तर फायनलचं तिकिट मिळवण्यासाठी अनेक जण (अगदी आमदार, मंत्र्यांपासून अनेक जण) जीवाचा आटापिटा करत असताना माझ्या झोळीत मात्र या तिकीटाचं दान आपसूक येऊन पडलं. त्याचं झालं असं, की मला मोहालीच्या इंडो-पाक सेमिफायनलला सुटी हवी होती. आमचे बॉस चंद्रशेखर (चंदू) कुलकर्णी ऊर्फ सीके यांनाही हवी होती... ते क्रिकेटचे माझ्याइतकेच, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त, चाहते. त्यांनी मला माझी सुटी रद्द करण्याची ‘विनंती’ (हो विनंतीच... असा बॉस सगळ्यांना मिळावा, ही ईश्वराचरणी प्रार्थना) केली आणि त्याची भरपाई म्हणून मला चक्क फायनलचा एक पास मिळवून दिला... मोहालीत पाकिस्तानला हरवून भारत फायनलला आल्यावर तर या पासचं महत्त्व किती पटींनी वाढलं, ते सांगायला नको... <br />
माझ्या बाजूची सीट जय सावंत या सीकेंच्या मित्राची असल्याचं समजल्यावर त्यांना फोन केला आणि सीएसटीला भेटायचं ठरलं... २ तारखेला ११ वाजता सीएसटीला पोहोचलो... पाचच मिनिटांत जय सावंतही तिथं आले. त्यानंतर चालतच वानखेडे स्टेडियम गाठलं. सुदैवानं आमच्या ५ क्रमांकाच्या गेटवर गर्दी नव्हती. त्यामुळे ५ मिनिटांत रांगेतून पुढे सरकत पहिल्या सिक्युरिटी चेकपाशी आलो. त्यानंतर पाच-सहा ठिकाणी संपूर्ण तपासणी केली गेली. (त्यात काहीही वावगं वाटलं नाही... सुरक्षेच्या दृष्टीनं जे योग्य आहे, तेच केलं गेलं, अशी भावना होती... त्यामुळे दर वेळी सगळे खिसे रिकामे करून दाखवताना, मोबाईल अनलॉक करून दाखवताना, पाकिट उघडून दाखवताना अजिबात त्रास वाटला नाही...) अखेरीस शेवटचा सिक्युरिटी पोस्ट पार केल्यानंतर स्टेडियमवर पोहोचलो. तिथंच या मॅचचं स्मृतीचिन्हं म्हणून एका ऑफिशियल शॉपमधून तब्बल ४०० रुपयांची निळी कॅप खरेदी केली. (खेळाडू वापरतात ती ऑफीशियल कॅप... यापुढे ही कॅप डोक्याला लावायची हिम्मत होणे नाही... या मॅचची आठवण म्हणून ती कायम जवळ असेल...) सीट शोधून जागेवर पोहोचलो, तेव्हा फक्त साडेअकरा झाले होते. टॉस व्हायला अडीच तास आणि मॅच सुरू व्हायला तीन तास होते... मधल्या काळात फोनवर गप्पा, थोडंफार चॅटिंग (नेटवर्क जाम होतं... त्यामुळे खरंतर थोडंच चॅटिंग, फार नव्हे!) असं करत वेळ काढला. आम्ही गेलो तेव्हा जवळजवळ रिकामं असलेलं स्टेडियम अवघ्या दीड तासात संपूर्ण पॅक... डोळ्यासमोर चित्र बदललं. सगळीकडे निळे टीशर्ट, अनेकांच्या हातात किंवा खांद्यावर पांघरलेला तिरंगा, चित्रविचित्र टोप्या यामुळे माहोल तयार होत होता... साधारण दीडच्या सुमारास दोन्ही संघ वॉर्मअपसाठी मैदानात आले आणि एकच गोंधळ सुरू झाला... त्यात मग एखादा कॉमेंटटेटर किंवा जुना खेळाडू मैदानात आला तर हा गोंधळ वाढायचा... फिल्डिंगची प्रॅक्टिस करताना सेहवाग किंवा रैना बाऊंड्री लाईनजवळ आले, की तिथं बसलेल्या प्रेक्षकांमधून जोरदार जल्लोष व्हायचा... <br />
अखेरीस कधी कंटाळवाणी-कधी धमाल करणारी ही प्रतिक्षा संपली आणि टॉससाठी धोनी आणि संगकारा मैदानात आले. स्टेडियम अचानक शांत झालं... पण टॉस होत असल्याची घोषणा होताच इतका जल्लोष सुरू झाला की धोनीनं नाणं हवेत फेकल्यानंतर संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे कोणालाच ऐकू गेलं नाही. अखेरीस टॉस पुन्हा करावा लागला. यावेळी संगकारा गर्दीच्या वर आवाज चढवून ओरडला आणि टॉस जिंकला... त्यानं बॅटिंग घेतल्यावर स्टेडियममध्ये थोडं नैराश्य पसरलं... कारण आपल्या लाडक्या सचिनची बॅटिंग बघण्यासाठी आता मुंबईकरांना ५० षटकांची किंवा ४ तासांची प्रतीक्षा करावी लागणार होती. पुढला अर्धा तास कधी गेला समजलंच नाही... त्यानंतर श्रीलंकेच्या संथ फलंदाजीनं बोअर केलं... विकेट गेल्यावर तेवढ्यापुरता जल्लोष व्हायचा, पुन्हा शांतता... असं सुरू होतं. शेवटच्या सात ओव्हर्समध्ये लंकन फलंदाजांनी केलेली फटकवा-फटकवी तेवढी नयनरम्य होती. मुंबईच्या क्रिकेटवेड्या गर्दीचं क्रिकेट-ज्ञान आणि त्याची जाणही तितकीच चांगली आहे, याचा प्रत्यय यावेळी आला. जयवर्धनेच्या शतकानंतर सगळ्या स्टेडियमनं उभं राहून टाळ्या वाजवल्या... त्याच्या प्रत्येक चांगल्या फटक्याचं यथोचित कौतुक केलं... अखेरीस आधी कंटाळवाणी आणि नंतर धुंवांधार झालेली लंकेची ५० षटकं संपली... <br />
नंतरचे ४ तास खरी धम्माल येणार होती... पण त्याबाबत लिहिण्याआधी थोडं मनातलं... क्रिकेटला भारतात धर्म का म्हणतात, ते यावेळी समजलं... तसा मी ही मॅच बघायला एकटाच गेलो होतो. जय सावंत सोबत होते, पण आमची ओळखच मुळी ३ तासांची... आम्हाला एका बंधनात बांधणारी गोष्ट म्हणजे क्रिकेट आणि सचिन... माझ्या डावीकडच्या सीटवर एक जोडपं होतं... बहुदा पारशी असावं... मला त्यांचं आणि त्यांना माझं नावही ठाऊन नाही... तशी गरजही नव्हती. त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं... माझंही... बस्स. आम्हाला हे पुरेसं होतं. ‘त्या’ दोघांमधल्या ‘तो’ला क्रिकेट नीट समजत होतं. ‘ती’ला मात्र नाही... पण अडत काहीच नव्हतं... समोर जे घडत होतं, घडणार होतं ते विलक्षणच होतं. तिला एखादी गोष्ट समजली नाही, तर तो सांगत होता... क्रिकेटची भाषा समजावून देत होता. दोघंही मस्त एन्जॉय करत होते. नुकतीच ओळख झालेले जय सावंत, ‘तो’ आणि ‘ती’ आणि सगळ्या स्टेडियममधले ३१ हजार क्रिकेटवेडे... आमची शरीरं वेगवेगळी असली, तरी मनं मात्र एकच होती... आपल्या शरीरातले जसे सगळे अवयव समन्वयानं काम करतात, तसंच हेदेखील होतं... म्हणूनच एखाद्या ठिकाणी ‘मॅक्सिकन वेव्ह’ सुरू झाली की ती लाट आपोआप पसरायची... दोन हात, दोन पाय, दोन डोळे यांनी एकत्रितपणे काम करावं तशी... यापूर्वी क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच बघताना प्रश्न पडायचा की ही मॅक्सिकन वेव्ह इतकी अचूक कशी होते... लोकांना समजतं कसं की आपण कधी उभं रहायचंय आणि ओरडायचंय ते... त्या दिवशी समजलं की हे फार कठीण नाही. दोन्ही हातांनी मिळून टाईपिंग करावं, इतकं ते सोपं आहे... असो... आता अविस्मरणीयात अविस्मरणीय शेवटच्या चार तासांविषयी...<br />
सचिन-विरू मैदानावर आले तेव्हा प्रचंड टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत केलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. मलिंगाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग पायचित झाला आणि त्यानं (गरज नसताना) रिव्ह्यू मागितला. स्टेडियमवर लावलेल्या लाऊडस्पिकरमधून ‘धड... धड... धड... धड...’ असा ठोका सुरू झाला होताच... पण हा आवाज दबवून टाकेल, असे ठोके आतमध्ये पडत होते... शेवटी होऊ नये तेच झालं. सेहवाग आऊट झाला. त्यानंतरही सचिननं धावांचा ओघ कायम ठेवला. त्याचा प्रत्येक चौकार आणि त्यानं घेतलेली प्रत्येक एकेरी धावही विजयाच्या उन्मादानं साजरी होत होती... पण थोड्या वेळातच स्टेडियमनं ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ अनुभवला... या खेळपट्टीवर दुर्मिळ असलेला स्विंग मलिंगाच्या चेंडूला मिळाला आणि सचिनच्या बॅटची कड घेऊन चेंडू संगकाराच्या ग्लोव्जमध्ये विसावला... प्रेक्षकांमध्ये स्मशानशांतता... ३-४ ठिकाणी श्रीलंकन फॅन्सची काही पॉकेट्स होती... तिथूनच काय आवाज येत असेल तो! <br />
हा आणि यानंतरचा सर्व घटनाक्रम इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त झाला आहे... भारतीय फलंदाजांनी काढलेली प्रत्येक धाव आम्ही सेलिब्रेट करत होतो... अगदी लंकेच्या गोलंदाजांनी टाकलेले वाईड बॉलही... प्रत्येक धावेचं स्वागत जोरदारा टाळ्या, शिट्या, पिपाण्या फुंकून केलं जात होतं... धोनी-गंभीरची चांगली भागिदारी झाल्यानंतर सामना आपल्या हातात आला आहे, असं सगळ्या स्टेडियमला वाटू लागलं होतंच... त्यात ३० बॉलमध्ये ३० धावा हव्या असताना या ‘वाटण्याचं’ खात्रीत रुपांतर झालं आणि स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोषच सुरू झाला. प्रत्येक धावेगणिक हा जल्लोष कितीतरी पटींनी वाढत होता... सहा धावा हव्या असताना मैदानात ‘वुई वॉंट सिक्सर’चा नाद सुरू झाला... ३१ हजार लोक एकमुखानं ही मागणी करत होते. पण तेव्हा तसं काही झालं नाही... दोन धावा निघाल्या गेल्या... पण मागणी सुरू होतीच... वुई वॉंट सिक्सर... वुई वॉंट सिक्सर... शेवटी ‘प्रेक्षकांसाठी खेळू नका... संघासाठी खेळा...’ असा उचित सल्ला आपल्या संघाला देणा-या माहीला ही मागणी फेटाळणं जड गेलं असावं... ४ धावांची आवश्यकता असताना त्यानं पुढे येऊन एक उत्तुंग फटका मारला... स्टेडियम क्षणाचा १००० भाग स्तब्ध झालं... माही पुढे आलाय... त्याच्या बॅटचा इम्पॅक्ट व्यवस्थित झालाय... ‘टॉक’ असा आवाज स्टेडियमभर घुमलाय... पण चेंडू जातोय कुठे... तिथं फिल्डर तर दिसत नाही... चेंडू फार उंच उडाला असेल, तर.... फिल्डर तिथपर्यंत पोहोचला तर... इतके सगळे विचार ३१ हजार मनांमध्ये सेकंदाच्या १०००व्या भागात येऊन गेले... त्या काळात पसरलेली भयाण शांतता ही वादळापूर्वीची होती... माहीनं मारलेला फटका अचूक आहे, हे या काही क्षणांत लक्षात आलं आणि मग जो जल्लोष झाला तो आयुष्यात विसरता येणं शक्य नाही... विसरूच शकत नाही... विसरायची इच्छाही नाही... <br />
सचिननं बघितलेलं स्वप्न साकार झालं होतं... धोनी-युवराजनं त्याला आणि देशाला दिलेला शब्द पाळला होता... अशा वेळी डोळ्यांवर बांध घालणं अशक्यच... घरी असताना कदाचित डोळे किंचित ओलावले असते पण वाहिले मात्र नसते... प्रत्यक्ष समोर हा सोहळा बघताना आनंदाश्रू थांबवावेत कसे? अशक्यच... मैदानावर असलेल्या स्क्रीनवर ‘वर्ल्ड चॅम्पियन - इंडिया’ हे शब्द उमटले... त्यातला तिरंगा दिसला आणि हा बांध फुटला... यात तिथं हजर असलेल्या कोणालाच काही वावगं वाटायची शक्यता नव्हती... सगळ्यांची अवस्था तीच होती... मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली... पण या आतषबाजीला लाजवतील असे फटाके मनात फुटत होते... अजूनही फुटतायत... आयुष्यभर या फटाक्यांचा प्रतिध्वनी मनात रुंजी घालत राहणार आहे... <br />
ती टीम इंडियाची कॅप आणि ते तिकिट आयुष्यभर जपून ठेवायचंय... आपण या इतिहासाचे साक्षीदार होतो, याचा पुरावा म्हणून नव्हे... ही आठवण कायम ताजी रहावी म्हणूनही नव्हे... हे १२ तास मनावर कायमचे कोरले गेलेच आहेत... या गोष्टी कायम जपून ठेवण्याचं एकच कारण आहे... कदाचित कोणत्याही क्षणी आपल्याला जाग येईल... आपण वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमध्ये बसून धोनीचा विजयी षटकार बघत आहोत, हे रम्य स्वप्न संपेल... त्यावेळी कपाटातून तिकिट बाहेर काढायचं... कॅप डोक्यावर चढवायची... आरशात स्वतःला बघायचं... हे स्वप्न नाही... सत्य आहे, याची खात्री पटली की पुन्हा या (माझ्यासाठी) अनमोल वस्तू जागच्या जागी ठेवायच्या... आणि पुन्हा नव्यानं हेच स्वप्न पाहण्यासाठी निद्रादेवीची आराधना सुरू करायची... <br />
<br />
<br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjaXorQlSY_F_KPgidm9eT8NpkTxaxGgLBWN0wM5t3M_IqZrZF84errT86mxMKK5oynjNDJ5oSKADndPzsvVm7PMlxoh10DScJ5hLUpwdWvDSzDOgV9Bcqt617g6f6-HO74nclJ54GnIro/s1600/wc1.jpg" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" height="305" r6="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjaXorQlSY_F_KPgidm9eT8NpkTxaxGgLBWN0wM5t3M_IqZrZF84errT86mxMKK5oynjNDJ5oSKADndPzsvVm7PMlxoh10DScJ5hLUpwdWvDSzDOgV9Bcqt617g6f6-HO74nclJ54GnIro/s400/wc1.jpg" width="400" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"> </td></tr>
</tbody></table><br />
</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-1274866180488597292011-02-21T12:29:00.000+05:302011-02-21T12:29:44.829+05:30भीऊ नका...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="color: #660000;">स्थळ : मलबार हिल. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान.</span><br />
<span style="color: #660000;">पात्रे : उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि अन्य मंत्री.</span><br />
<span style="color: #660000;">वेळ : अर्थात रात्रीची. निवांत. </span><br />
<br />
<span style="color: black;">उपमुख्यमंत्री (उमं) - काय भिता राव... १५-२० हजार रुपयांची भीक महिन्याच्या महिन्याला घेणारी पोरं ती... त्यांना काय घाबरायचं!</span><br />
<span style="color: black;">बांधकाम मंत्री (बांमं) - मी कुठं घाबरलोय?</span><br />
<span style="color: black;">उमं - मग... काल काय म्हणालात... मला तुमची भीती वाटते म्हणून... </span><br />
<span style="color: black;">बांमं - ते असंच हो... मला कॉमेडी करायची सवय आहे ना... त्याचाच परिणाम. </span><br />
<span style="color: black;">उमं - यांना खरंतर फटके मारले पाहिजेत. मी मागे म्हणालेलो ते उगीच नाही. पण त्यावरून पण गोंधळ घातला. आता तुम्ही भीती वाटते म्हणाल्यावर तुमच्या मागे लागतील बघा हे लोक... </span><br />
<span style="color: black;">बांमं - होय की... ते लक्षात नाही आलं माझ्या... फार गोंधळ झाला तर सांगून टाकीन की मी असं बोललोच नव्हतो...</span><br />
<span style="color: black;">उमं - टीव्हीवर दिसलात तुम्ही तसं बोलताना... आता कसं म्हणणार?</span><br />
<span style="color: black;">बांमं - बस का धाकटे साहेब... तुम्ही नाही का तेच केलंत. आधी फटके मारा म्हणालात... आपल्या कार्यकर्त्यांनी मारलेदेखील... मग म्हणालात मी असं बोललोच नाही... माफी पण नाही मागितलीत. शेवटी थोरल्या साहेबांना सॉरी म्हणावं लागलं त्या भिकारड्यांना... तुमचा संपलाय... ग्लास भरू का? </span><br />
<span style="color: black;">उमं - हो.. मी भरतो... आपण आजपर्यंत कोणाची माफी मागितली नाही.. आणि या दिडदमडीच्या लोकांना सॉरी म्हणू काय मी... काकाच म्हणाले, तू गप्प बस मी काय ते बघतो. त्यांनी मस्त गप्प केलं पण त्यांना. सगळे लाईनीवर आले...</span><br />
<span style="color: black;">बांमं - आता पुन्हा माझ्यामुळे गोंधळ झाला तर बघतील का साहेब?</span><br />
<span style="color: black;">उमं - माहिती नाही बुवा... विचारावं लागेल. बघुयात काय होतंय ते...</span><br />
<span style="color: black;">बांमं - तुम्ही पण कमाल केलीत हां साहेब... सरळ सांगून टाकलंत की आपण टगे आहोत म्हणून...</span><br />
<span style="color: black;">उमं - आहोत तर आहोत...</span><br />
<span style="color: black;">बांमं - पण निवडणुकीत मतं मागायला जाताना आपण हात जोडून जातो. टग्या कधी हात जोडतो का?</span><br />
<span style="color: black;">उमं - अरे ते नाटक असतं हो... तुम्हालाही हे माहित्ये... तुमच्या जुन्या पक्षात सगळे टगेच तर होते... </span><br />
<span style="color: black;">बांमं - हो... पण मतदारांनी सांगितलं की आम्हाला टग्या नको... चांगला नेता पाहिजे. तर?</span><br />
<span style="color: black;">उमं - कोण भिकार** म्हणतोय असं... फटके मारा रे त्याला.... टग्यांना मतं देत नाही म्हणजे काय? मतदार असला तर घरचा... दंडुक्यानं मारलं पाहिजे *डव्यांना... आण रे दंडूका... एकेकाच्या गां*वर हाणतो... मत देत नाही म्हणजे काय... दिलंच पाहिजे...</span><br />
<span style="color: black;">बांमं - (स्वगत) साहेबांना जास्त झाली वाटतं... (प्रकट) ए... जेवण आण रे... जाऊ दे साहेब... निवडणुकीच्या वेळी बघुयात... तोपर्यंत हे मीडियावाले दंडुका, भीती, टग्या हे सगळं विसरून जातील... त्यांना खोडच आहे ती... नवी बातमी हाती येईपर्यंत पहिलीचा पिच्छा पुरवतात... नवं काही मिळालं की पुढलं पाठ मागचं सपाट... आणि लोकांचं काय... ते तर विसरले पण असतील एव्हाना... </span><br />
<span style="color: blue; font-size: large;">दंडुकेशाही जिंदाबाद.... टगेगिरी जिंदाबाद....</span><br />
<br />
<span style="color: #cc0000; font-size: x-small;"><strong><em>(अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही. हा संवाद संपूर्णतः काल्पनिक असू शकतो...) </em></strong></span></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-31287527150214268302011-02-18T13:13:00.000+05:302011-02-18T13:13:44.246+05:30ALL THE BEST....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">उद्यापासून वर्ल्डकप सुरू होतोय... काय होणार याची उत्कंठा आणि धाकधुक आपल्या मनात आहे. काय होईल ते होवो... पुढला दीड महिना धम्माल असणार, हे नक्की...<br />
<br />
<span style="background-color: white; color: #990000; font-family: "Trebuchet MS",sans-serif; font-size: x-large;">BEST OF LUCK TEAM INDIA...</span><br />
<br />
असंच सहज इंटरनेटवर मिळालेलं एक कार्टून आपल्या मनातल्या भावना मांडणारं... <span style="background-color: white; color: #990000; font-family: "Trebuchet MS",sans-serif; font-size: x-large;"> </span><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijwF8I83YQPP8RjYh8IvnmiH6MfxM03fkkaU71kAIpuWSJOcry8r176qExJFE-w3aZOIFkUEnmimVvu_wqg_znAyMQ1AFvVyCDkyUHmg_WXuTOXBGi6Rqf0a0xeBzFnLv6wnpxrQO_XgY/s1600/cricket-world-cup-2011-jersey-india-1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="246" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijwF8I83YQPP8RjYh8IvnmiH6MfxM03fkkaU71kAIpuWSJOcry8r176qExJFE-w3aZOIFkUEnmimVvu_wqg_znAyMQ1AFvVyCDkyUHmg_WXuTOXBGi6Rqf0a0xeBzFnLv6wnpxrQO_XgY/s320/cricket-world-cup-2011-jersey-india-1.jpg" width="320" /></a></div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-9427800324627919982011-02-17T01:34:00.002+05:302011-02-17T02:15:43.410+05:30दोन बातमीदार... टीम एकच की वेगवेगळी?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;">लेट अस भंकस, डोक्याची मंडई, बातमीदार-सहयोगी बातमीदार हे वृत्तपत्रसृष्टीची काही गुपिते जगजाहीर करणारे जाम प्रसिद्ध झालेले ब्लॉग बंद पडले. पडले की कोणी बंद पाडले, या प्रश्नाची चर्चा पत्रकारांच्या वर्तुळात होतच राहील. यातला डोक्याची मंडई तर कोणी आणि का बंद पाडला, हे जगजाहीर आहे. लेट्स भंकस आणि बातमीदारबाबत मात्र ठोस वृत्त नसलं, तरी काहीतरी मालफंक्शन असल्याचं बोललं जातंय. त्याच वेळी आणखी दोन असेच नवे ब्लॉग पुन्हा एकदा सुरू झालेत.</div><div style="text-align: left;"><a href="http://fakingnews-breakingnews.blogspot.com/"><strong>ब्रेकिंग न्यूज</strong></a> आणि <a href="http://batmeedar.blogspot.com/"><strong>बातमीदार The Reporter</strong></a> हे दोन ब्लॉग पुन्हा एकदा वृत्तसृष्टीतील गमतीजमती घेऊन सादर झाले आहेत. </div><div style="text-align: left;">यातला दुसरा ब्लॉग हा अधिक काळजीपूर्वक तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आशिष चांदोरकर या माझ्या मित्रानं या ब्लॉगची सखोल माहिती दिल्यामुळे ते पुन्हा देण्याचं टाळतोय. इच्छुकांनी <a href="http://ashishchandorkar.blogspot.com/2011/02/blog-post_15.html">इथं</a> क्लिक करावं, म्हणजे त्याची माहितीपूर्ण पोस्ट वाचता येईल. </div><div style="text-align: left;">ब्रेकिंग न्यूज हा ब्लॉग मात्र मुंबईतल्याच कोणीतरी, मुंबईतच सुरू केल्याचं त्याच्या रुपावरून दिसतंय. प्रामुख्यानं वाहिन्यांमधील ब्रेकिंगन्यूज इथं असल्यामुळे एखाद्या मराठी वाहिनीत काम करणा-या कोणीतरी हा ब्लॉग सुरू केला असावा, अशीही शक्यता आहे. </div><div style="text-align: left;">माझ्या डोक्यात आलेली आणखी एक शक्यता म्हणजे हे दोन्ही ब्लॉग एकाच व्यक्तीनं (किंवा एकाच गटानं म्हणूयात हवं तर) सुरू केलेले असण्याची शक्यता आहे. एखाद्याबद्दल फारच अवमानकारक लिहायचं असेल आणि कायदेशीर कारवाईचा धोका असेल, तर बातमीदारवर बिनधास्त लिहायचं आणि एखादा हलकाफुलका प्रसंग लिहायचा असेल, तर ब्रेकिंग न्यूजवर जायचं. दोन ब्लॉग एकाच वेळी सुरू असतील, तर बॅकअपही कायम राहातो. काही कारणानं एखादा बंद पडलाच, तर दुसरा आधीपासून अस्तित्वात असलेला आणि वाचला जाणारा ब्लॉग हाती असणं केव्हाही चांगलंय... दोन्ही ब्लॉग बारकाईने पाहिल्यास त्यात काही ठिकाणी साम्य दिसतं तर काही ठिकाणी मुद्दाम घडवून आणलेलं वेगळेपण... मनात शंका येण्याचं हे प्रमुख कारण. आणि दुसरं म्हणजे आजवर एकाच वेळी दोन ब्लॉग्ज सुरू आहेत, असं कधीही घडलेलं नाही. दोन्ही ब्लॉग शैलीदार आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहिले जात आहेत. अशी अनेक कारणं आहेत मनात ही शंका यायला... </div><div style="text-align: left;">ब्लॉग दोन असले तरी टीम एकच आहे की वेगवेगळी?</div><div style="text-align: left;">ते काही असो... दोन्ही ब्लॉग चांगले आहेत आणि बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणा-यांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन्ही ब्लॉग्जनी पुढे सुरू ठेवलं आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच करायला हवं... </div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-70556765770871028432010-09-25T13:09:00.000+05:302010-09-25T13:09:31.069+05:30चक दे...कॉमनवेल्थ गेम्सवरून देशाची पुरती आब्रु गेल्यानंतर एकदाचं घोडं गंगेत न्हालं आहे. स्पर्धा होणार की नाही होणार हा घोळ संपला आहे आणि ३ तारखेला एकेकाळच्या सूर्य न मावळणा-या राष्ट्राचे विभागलेले कुळ आपली मशाल दिल्लीत पेटवणारच, हे निश्चित झालं आहे. <br />
सुरूवातीला मणिशंकर अय्यर यांनी या स्पर्धांच्या आयोजनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना देशद्रोही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. मात्र त्यानंतर बाहेर आलेल्या एकेक प्रकरणांमुळे या लोकांचेच दात घशात गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टॉयलेट पेपरपासून ते क्वीन्स बॅटन रिलेच्या लंडनमधील कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्या राष्ट्रीय धर्माला जागून पैसे खाल्ल्याचे आरोप केले जात आहे. इतकंच नाही, तर या स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठीही म्हणे सर्व ७१ देशांना लाच देऊ केली गेली आहे. देशाचं नाक कापलं गेल्यानंतर आता किमान स्पर्धेच्या काळात तरी चांगल्या सोयी ठेवून किमान देशाची मान खाली घातली जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. <br />
आजच कॉमनवेल्थ फेरडेशनचे अध्यक्ष मायकेल फेनेल यांनी आयोजनातील ढिसाळपणाला सगळेच जबाबदार असल्याचं म्हंटलं आहे. या 'सगळे'मध्ये त्यांची समिती आणि ते स्वतःदेखील त्यांना अभिप्रेत आहेत. दोन दिवसांपूर्वीचा त्यांचा सूर अचानक बदलण्यास काही कारणं असू शकतात. एकतर त्यांनी कॅबिनेट सचिव चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रानंतर खरंच सरकार दणकून कामाला लागलं आणि खरोखरच ४८ तासांत अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता क्रीडाग्राम अत्यंत देखणं, स्वच्छ आणि नीटनेटकं झालेलं आहे... असं मानायला जागा आहे. पण त्यासाठी हॅरी पॉटरच प्रत्यक्षात यायला हवा...<br />
यापेक्षा स्पर्धा सुरू होण्याच्या तोंडावर कटुता नको, असा विचार करून फेनेल यांनी हे वक्तव्य करणं पटण्यासारखं आहे. कारण अवघ्या आठवड्यावर स्पर्धा आल्यामुळे आता ऑलिम्पिक समिती, राष्ट्रकुल समिती, आयोजन समिती हे सगळेच 'पॉइंट ऑफ नो रिटर्न'वर आले आहेत. आता स्पर्धा रद्द होऊ शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे स्पर्धेच्या काळात कोणाच्या मनात किल्मिष राहायला नको आणि सर्वांना ही स्पर्धा एन्जॉय करता यावी, या उद्देशाने फेनेल बॅकफूटवर आलेले असू शकतात. (आरोप होतो आहे, त्याप्रमाणे जर खरंच आंतरराष्ट्रीय लाचखोरी करून यजमानपद मिळवलं असेल, तर या ७१ देशांना हे कथित पैसे परत करावे लागणार नाहीत ना, ही भीतीदेखील फेनल यांच्या मनात असावी का?) कारण काहीही असलं, तरी आता राष्ट्रकुलावरचं मळभ दूर झालं आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह सर्व संघ दिल्लीत डेरेदाखल होत असल्याचं आश्वासन फेनेल यांनी देऊ केलंय. <br />
<div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;">तात्पर्य, स्पर्धांचे गेट.... सेट...(?) झाले आहे आणि फक्त बंदुकीचा बार उडण्याची वाट सगळे बघतायत (रेफरीच्या बंदुकीचा बार... अतिरेक्यांच्या नव्हे!!!) त्यामुळे आता पुढले २-३ आठवडे कलमाडी-शीला दीक्षित यांना विसरूयात... सायना, तेजस्वीनी, विजयेंद्र यांच्यासह तिरंगा खांद्यावर लावून खेळणा-या प्रत्येकाला शुभेच्छा देण्यासाठी १०० कोटी कंठांमधून एकच आवाज देऊयात....</div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"><br />
</div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"><span style="font-size: x-large;"><span style="color: #cc0000;">चक दे</span> <span style="color: #274e13;">इंडिया...!!!</span></span></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"><br />
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"></div><div class="separator" style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none; clear: both; text-align: center;"></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-50320947501661304442010-09-24T02:40:00.000+05:302010-09-24T02:40:56.151+05:30तारीख पुढे... टेन्शन वाढणार की घटणार?<div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;">सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या निकालाच्या सुनावणीला स्थगिती दिली. २४ तारखेला निकाल लागेल असं गृहित धरून आधीची पोस्ट लिहिली होती... तारीख पुढे ढकलली तरी निकाल अटळ आहे. </div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxe7_KAIUN2x4dBfCUwAchhyNAc9cVM73MN4Ksb1kS5SE347ps5QPBNCWlTATIEuemMukJCdzIJh2I69yQCy2qbK1tnQxpDKKKgySCFlroGovty8O9K5S-A7MzdjPOqOzq7HcsZyOuzwI/s1600/sc.bmp" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="277" px="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxe7_KAIUN2x4dBfCUwAchhyNAc9cVM73MN4Ksb1kS5SE347ps5QPBNCWlTATIEuemMukJCdzIJh2I69yQCy2qbK1tnQxpDKKKgySCFlroGovty8O9K5S-A7MzdjPOqOzq7HcsZyOuzwI/s320/sc.bmp" width="320" /></a>६० वर्षं भिजत पडलेलं हो घोंगडं 'वॉशिंगमशिन'च्या बाहेर सुकवायचा हा शेवटचाच प्रयत्न ठरावा... पण इतक्या वर्षांत जे घडलं नाही, ते चार दिवसांत घडायची शक्यता कमीच आहे. किंबहुना लखनौ उच्च न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठात दोन्ही बाजूंनी तसं स्पष्ट केल्यानंतरच निकालाची तारीख जाहीर करण्यात आली होती. यामुळे आजचं मरण उद्यावर गेलंय, इतकंच म्हणता येईल...</div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;">मात्र आता तारीख आणखी पुढे ढकलली गेल्याने एक वेगळीच समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ३ तारखेला आहेत. आता हा निकाल या स्पर्धांच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. तसं झालं आणि आपल्या सर्वाच्या दुर्दैवाने आपण या 'वार्षिक परीक्षे'त नापास झालोच, तर आधीच अनेक अपघातांनी जर्जर झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी तो शेवटचा आघात ठरावा... अर्थात तारीख जाहीर करताना मायबाप सुप्रिम कोर्ट या सगळ्याचा विचार नक्की करेल, अशी आशा आहे. </div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;">आता स्पर्धा संपल्यानंतरची तारीख मुक्रर झाली, तर मात्र काही काळ स्पर्धांच्या निमित्ताने आसेतूहिमाचल पसरलेला कृत्रिम तणाव नाहीसा होण्यास मदत होणार आहे... </div><div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;">असो... परीक्षा पुढे ढकलली की हुशार विद्यार्थी ती इष्टापत्ती मानतात आणि नियोजित वेळेत वाचायचे राहून गेलेल्या विषयांची उजळणी करतात... पण एखादा ढ कार्टा असेल, तर परीक्षा पुढे गेल्याच्या आनंदात एकतर सिनेमाला जाऊन बसतो किंवा नाक्यावर टंगळ-मंगळ तरी करतो... आपली कॅटेगरी कोणती ते काळच ठरवेल!!!</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-28380214681479911952010-09-22T08:33:00.012+05:302010-09-22T09:50:56.458+05:30मॅच्युरिटीची लिटमस टेस्ट...परवा, २४ तारखेला दुपारी साडेतीन नंतर आपल्या देशाची वार्षिक परिक्षा आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूबाबत गेली ६० वर्षे सुरू असलेल्या खटल्याचे निकालवाचन सुरू होण्याची ही वेळ असेल. यावेळी आपला देश आणि अर्थातच राजकारण्यांच्या परिपक्वतेची लिटमस चाचणी होणार आहे.<br /><div><div><div>- गेल्या ६० वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. खटला दाखल झाल्यानंतर बाबरी वादावरून अनेक दंगलीही <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpyfpIlhTusJSkO-CTtH5az9gqKQTfZ5bYcbBlminqhcrw1TreXrYjz4RXK8LTVYqChDwj5iObPJG1UgwBJ3FR1K3wGh0UlSZggOyBSPFBQTVEuG1FgUm2XHy3hBh2c_viZZA7FeFmp2M/s1600/ayodhya.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 291px; FLOAT: left; HEIGHT: 187px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519581819964563410" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpyfpIlhTusJSkO-CTtH5az9gqKQTfZ5bYcbBlminqhcrw1TreXrYjz4RXK8LTVYqChDwj5iObPJG1UgwBJ3FR1K3wGh0UlSZggOyBSPFBQTVEuG1FgUm2XHy3hBh2c_viZZA7FeFmp2M/s400/ayodhya.jpg" /></a>झाल्या. याचा कळस गाठला १९९२ सालाने... कारसेवेच्या नावाखाली बाबरी मशिद (किंवा ढाचा!) उध्वस्त केली गेल्यानंतर देशभरात दंगली झाल्या... त्यात हजारो हिंदू आणि मुस्लिमांचे शिरकाण केले गेले. लोकांना शांत करण्याऐवजी डोकी भडकविण्याची कामं दोन्ही धर्मांच्या धुरिणांनी (आणि काही राजकीय नेत्यांनीही) केली. या दंगलींना 'उत्तर' म्हणून मुंबईत १२ मार्च रोजी दाऊद इब्राहिम पुरस्कृत स्फोटमालिका घडल्याचे मानले जाते. पहिल्या चाचणी परिक्षेत आपण नापास झालो होतो... </div>- २००२ साली अशीच एक कारसेवा अयोध्येत केली गेली. त्यासाठी देशभरातून विहिंपचे शेकडो कार्यकर्ते गेले होते. गुजरातमधील कारसेवकांचा डबा गोध्रा स्थानकात <span>पेट<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6dtMm8uMoDMgPtn_7ZqbDxeA2H0af0uJT10mJbs435VXmsKXyFfVtFoF839PRD71TYnZLNdeNvnBkaYa1dfGMTUj5EtAtSZSvheAPNJEvCjGIQAWsK2eBASOQkMvQRyh5hMCijJO62yU/s1600/godhra.jpg"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 111px; FLOAT: right; HEIGHT: 146px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519582649720707842" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6dtMm8uMoDMgPtn_7ZqbDxeA2H0af0uJT10mJbs435VXmsKXyFfVtFoF839PRD71TYnZLNdeNvnBkaYa1dfGMTUj5EtAtSZSvheAPNJEvCjGIQAWsK2eBASOQkMvQRyh5hMCijJO62yU/s320/godhra.jpg" /></a>वून</span> देण्यात आला. यात सुमारे ६० जण (यातील बहुतांश विहिंपचे कार्यकर्ते होते) मारले गेले. त्यानंतर जातीय दंगलींमध्ये गुजरात भाजून निघाला... १ ते २ हजार लोकांचा बळी या दंगलींनी घेतला. गुजरातच्या मोदी सरकारच्या आशिर्वादानेच या <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrIKA9kDdiQJnUWrePBFpYLhSjnzsWmauBQ76D8SZT6Q-e8Gv-hCPxsCNIP497-pt8aJMA-p9pY0zEYWEFiyI9Wo6-azNOD-8C1GnHzrBDiYlSxt0DgSFO6fE6H1kVRUObbIEGATL1YN8/s1600/riots.jpg"></a>दंगली घडविल्याचा आरोप आजही केला जात असून या प्रकरणातले अनेक खटले प्रलंबित आहेत... ही सहामाही परिक्षा मानली तर त्यातही आपण सपशेल आपटी खाल्ली होती... एकही विषय असा नव्हता की ज्यात आपल्याला ३५ टक्के देता यावेत... <div>- २००५ <span style="font-size:0;">साली<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhR6wsNpjLqIvWmNAbPEy5k1p2wZn3nvs2W-cF69VX91yyYhWxZPn8pOP0AHSZIEIQdmUNQZq1VSn7VCL_WYchQ63t2qdYNorp2tHvBzyq70E5wvbfzsoKlhCLqkVKoV0X1UAUmiAIEeAQ/s1600/attack.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 205px; FLOAT: left; HEIGHT: 151px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519584587024017570" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhR6wsNpjLqIvWmNAbPEy5k1p2wZn3nvs2W-cF69VX91yyYhWxZPn8pOP0AHSZIEIQdmUNQZq1VSn7VCL_WYchQ63t2qdYNorp2tHvBzyq70E5wvbfzsoKlhCLqkVKoV0X1UAUmiAIEeAQ/s320/attack.jpg" /></a></span> अयोध्येतील वादग्रस्त स्थळी अतिरेकी हल्ला झाला. यावेळी सुरक्षा दलांनी पाच इस्लामी दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं... यावेळी देशात कोणतीही भडक प्रतिक्रीया उमटली नाही... दुसरी चाचणी (नऊमही) परिक्षेचा गड यावेळी आपण सर केला. हिंसा भडकविण्यासाठी हा हल्ला केल्याचं मानलं जात असलं तरी अशी कोणतीही प्रतिक्रीया उमटली नाही. </div><div>- २६/११ला झालेल्या प्रिलिम परिक्षेत मात्र आपण उत्तम गुण मिळविले आहेत. मुंबईवर झालेला भयानक हल्ला... यावेळी सगळा देश एकजूट असल्याचे चित्र <span style="font-size:+0;">प<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKg4F9wbJ_f6YBWSwAI7XJwKXc5ITxwdCy60KaFZbsEn5nH2AljUAgIN9ho04LlWVGvqYd3VoXPZ-Atk7qizq55qLaUkYWM0U2-JLaUTvpmE2zGT6ONPHMhpjWHQjQkwJD2edJKic2vM/s1600/mumbai-attack.jpg"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 233px; FLOAT: right; HEIGHT: 156px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5519587149057909746" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKg4F9wbJ_f6YBWSwAI7XJwKXc5ITxwdCy60KaFZbsEn5nH2AljUAgIN9ho04LlWVGvqYd3VoXPZ-Atk7qizq55qLaUkYWM0U2-JLaUTvpmE2zGT6ONPHMhpjWHQjQkwJD2edJKic2vM/s200/mumbai-attack.jpg" /></a>हायला</span> मिळाले. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानने आपल्यावर लादलेले युद्ध आहे, अशी भावना हिंदूंबरोबरच मुस्लिम धर्मियांचीही होती. कसाब वगळता मारल्या गेलेल्या ९ अतिरेक्यांवर अंत्यसंस्कार करण्यास किंवा त्यांना भारताच्या मातीत चिरनिद्रा देण्यास मुस्लिम समुदायाने कडवा विरोध केला. या घटनांमुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर झाल्याची झलक बघायला मिळाली. </div><div>- २४ सप्टेंबर रोजी आपली वार्षिक परिक्षा आहे. आत्तापर्यंत आपण दाखविलेली प्रगती आपण कायम ठेवणार की पुन्हा आपली गुणांची पाटी कोरी होणार, हे या दिवशी ठरेल. वातावरणात तणाव आहे... किंबहुना हा कृत्रिम तणाव उत्पन्न केला गेला आहे. उत्तर प्रदेशात निमलष्करी दले मागविणे, विविध पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंच्या भेटी घेणे, सतत शांतता राखण्याचे आवाहन करणे या गोष्टींमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे. </div><div>निकाल काहीही लागला तरी कोणीतरी आनंदी होणार आणि कोणीतरी संतापणार हे निश्चित आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा निकाल येण्याची शक्यता फारच अंधुक आहे. एकवेळ दोन्ही पक्ष नाराज होतील, अशी स्थिती येऊ शकते. पण win-win situation असणं जवळजवळ अशक्यच... हा निकाल हायकोर्टाचा असल्यामुळे नाराज झालेल्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग निश्चित खुला आहे. दोन्ही बाजूंकडून तसं बोलूनही दाखवलं गेलंय... सर्वांनीच लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय आणि केंद्र व सर्व राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना केल्याचं स्पष्ट केलंय... </div><div>मात्र त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडतं, यावर आपल्या परिपक्वतेची पातळी मापली जाणार आहे. ही अंतिम परिक्षा आपण पास होऊ ही अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या परिक्षेसाठी देशाला आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक नेत्यांना आणि सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांना हार्दिक शुभेच्छा...</div></div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-42921593124514979842010-05-07T01:32:00.005+05:302010-05-07T01:57:35.584+05:30प्राणप्रिय मोटरमन...मी तुला कधीच पाहिलेले नाही. आपली थेट ओळखही नाही. एखादवेळी रागा-लोभाच्या क्षणी आपण भेटलो असू-नसू... पण त्यानं काहीच फरक पडत नाही. ज्याप्रमाणे हवा दिसत नाही पण तिचे अस्तित्व सतत जाणवते. गदिमांच्या भाषेत ‘कधी भक्त का पाहतो ईश्वराला... नदी न्याहळी का कधी सागराला...!’ तसा माझ्यासाठी तू... आपल्या <span style="font-size:+0;">भारती<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjTgPb2tppWQflP1XdgqW9HudPCWtacxptpBzHmmaDPtagbDDCxlvhI5rEbZAEKv-si39fiN4uCbpE1T4VQXD7rKsnVOPATcy1fARGh9MQ_OQ-HEj8TIX_9dCQFu0-hBA5r_DCzzdFczo/s1600/Women_s-train_616354a.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; FLOAT: left; HEIGHT: 191px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5468255356352596946" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjTgPb2tppWQflP1XdgqW9HudPCWtacxptpBzHmmaDPtagbDDCxlvhI5rEbZAEKv-si39fiN4uCbpE1T4VQXD7rKsnVOPATcy1fARGh9MQ_OQ-HEj8TIX_9dCQFu0-hBA5r_DCzzdFczo/s320/Women_s-train_616354a.jpg" /></a>य</span> संस्कृतीत ‘ग्राहको देवो भवः’ असं म्हणतात... पण इथं मी ग्राहक असले तरी माझा देव मात्र तूच आहेस. गेल्या दोन दिवसांत ‘देव कोपल्या’वर काय होतं, त्याचा प्रत्यय मला पुरेपुर आला. अखेरीस तुझा कोप दूर झाला व तू पुन्हा आमची ‘सेवा’ घ्यायला सुरूवात केलीस, हे समजल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला...<br />‘नाक दाबलं की तोंड उघडतं...’ अशी एक म्हण आहे. ही म्हणदेखील तू अपुरी ठरविलीस. ‘एकाचं नाक दाबलं की दुस-याचं तोंड उघडतं...’ अशी नवी म्हण तू जन्माला घातली आहेस. प्राण गुदमरेपर्यंत माझं नाक दाबल्यानंतर अखेर सरकारच्या तिजोरीचं तोंड थोडं का होईना, किलकिलं झालं आहे. त्यामुळे तुझं अभिनंदन केलं पाहिजे... आता मी हे खवचटपणाने बोलतेय, असं वाटत असेल तुला... पण मी खरंच मनापासून म्हणतेय.<br />तू ज्या मागण्यांसाठी माझं नाक दाबलंस, त्या योग्य की अयोग्य हे ठरविण्याची माझी लायकी नाही. ‘कोणीही यावे टपली मारून जावे...’ या आपल्या सांघिक खेळात कायम माझ्यावरच राज्य असतं आणि तूझ्यासारखे अनेक जण टपली मारून जात असतात. एखादी टपली थोडी जोरात बसते (कालच्यासारखी). पण माझी सहन करायची ताकद अमर्याद आहे. अशा पदोपदी टपल्या खाणारीने तू आणि तुझ्या मालकांमध्ये बोलू नये, हे समजतं मला... पण या मागण्यांसाठी तू पत्करलेल्या <span style="font-size:+0;">मार्गा<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjI4EO5Bs6_7PrEiO6CYgSC0zh2cCf3HvwwKNSX9JjH-PzUyt76UjEjqMhy76PSqVmxNBcKhD5IXfdWVlZ8_L7y1Qn65Yk1fytFI5Z_N5GYWWeKA5u88Op0GtONKgHTZGA3_1q8EGN3zvU/s1600/mumbai_train.jpg"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; FLOAT: right; HEIGHT: 219px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5468255601109452946" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjI4EO5Bs6_7PrEiO6CYgSC0zh2cCf3HvwwKNSX9JjH-PzUyt76UjEjqMhy76PSqVmxNBcKhD5IXfdWVlZ8_L7y1Qn65Yk1fytFI5Z_N5GYWWeKA5u88Op0GtONKgHTZGA3_1q8EGN3zvU/s320/mumbai_train.jpg" /></a>चं</span> कौतुक केल्यावाचून रहावत नाहीये.<br />खरंतर सकाळी ६ वाजल्यापासून तू उपोषण करून गांधीगिरी सुरू केली होतीस. हेच जर तू मध्यरात्रीपासून केलं असतंस, तर कदाचित सकाळपासून गाड्यांचा गोंधळ झाला असता आणि मी मुंबईत (ऑफिसला) गेले नसते. घरीच राहिले असते. पण तू सकाळी ६पासून उपास सुरू केलास. त्यामुळे एक मन नको म्हणत असताना गाडी राईट-टाईम असल्याने मी मुंबईत गेलेच. दिवसभर काम करून आणि अनेकांच्या ‘टपल्या’ खाऊन थकल्यावर घरी यायला निघाले आणि अचानक तुला चक्कर आली, हॉस्पि़टलात न्यावं लागलं... ही तुझी आयडिया चांगली होती. तुझा घाव अतिशय योग्य जागी लागला. माझ्या नाकावर तू दाबलेला चिमटा अधिक घट्ट झाला. माझा जीव गुदमरला... पण त्या क्षणी तुला आणि तुझ्या मालकांना माझी चिंता नव्हतीच... (ती तशी कधीच नसते म्हणा!) मी घरी कशी पोचले, कधी पोचले का कुठल्यातरी स्टेशनच्या कोप-यातल्या बाकावर एकटीच बसून रात्र काढली... याच्याशी तुला काही घेणंदेणं असायचं कारण नाही. घरी माझी पिल्लं वाट बघत असतील, माझे म्हातारे आई-बाबा, सासू-सासरे एकटे असतील, याच्याशी तुला काय घेणंदेणं असणार? उलट माझे जितके जास्त हाल होतील, तितकं तुला बरं होतं... नाही! तू मुद्दाम मला त्रास द्यायला हे केलंस, असं मला म्हणायचं नाहिये. किंबहूना आपले संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत, असंच मला वाटतंय. पण मला होणारा त्रास <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgd9j0DOzonQ7d2iV8Q0ypV1hxBYIXBeQKVTIVRVk1zUp7x7l-Kge19hFjue3GwaVvrvunuhDjj4Y5H9eLdw5mE217CW3Sve0hPScBiD8AXoURvNj5rCqADRAKyRlK6Pe8iFef7o0x8huE/s1600/6a02422e4a105301683b1432df6c0250_full.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; FLOAT: left; HEIGHT: 240px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5468255904991508130" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgd9j0DOzonQ7d2iV8Q0ypV1hxBYIXBeQKVTIVRVk1zUp7x7l-Kge19hFjue3GwaVvrvunuhDjj4Y5H9eLdw5mE217CW3Sve0hPScBiD8AXoURvNj5rCqADRAKyRlK6Pe8iFef7o0x8huE/s320/6a02422e4a105301683b1432df6c0250_full.jpg" /></a>तुझ्याच फायद्याचा आहे, हे नाकारण्यातही अर्थ नाही...<br />माझे कसे हाल झाले किंवा तू कसा चुकलास हे सांगण्याची माझी इच्छा नाही आणि त्यानं काही फरक पडेल, असंही नाही. त्यासाठी हे पत्र नाही. तुझ्या मागण्या मान्य होणार आहेत म्हणे. त्याकरिता तुझं अभिनंदन करण्यासाठी हा पत्रप्रपंच... आणि समजा मालकांनी आश्वासन दिलं असलं तरी त्या नाहीच झाल्या मान्य, तरी चिंता करू नकोस... माझं नाक शाबूत आहे. तुला वाटेल तेव्हा त्याला चिमटा लाव... ते कापून टाक... काय हवं ते कर... पण मागण्या सोडू नकोस. त्या तुझ्या आणि तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वासाठी फार गरजेच्या आहेत. माझी चिंता करू नकोस... माझी सहनशक्ती भक्कम होती, आहे आणि राहील...<br /><br />तुझी कायम कृपाभिलाषी,<br />एक अतिसामान्य लोकल प्रवासी<br />ताजा कलम – पुन्हा आबांना भेटलास की हा खालचा भाग फाडून त्यांना दे प्लीज...<br /><br />------------------------------------------------------------<br /><br />प्रिय आबा,<br />तुम्ही मोटरमन आणि त्यांचे मालक यांच्यात शिष्टाई करून अखेरीस हे प्रकरण मिटविल्याचे समजले. हे तुम्ही माझ्यासाठीच केलेत, असे मानले तरी त्याला ३० तास का लागले, हा प्रश्न मला छळतो आहे. आता मी घरी पोचले आहे. जर गाड्या आणखी चार दिवस धावल्या नाहीत तर मी घरीच राहणार... ऑफीसला जाणार नाही... त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान होणार... हा विचार करून तर तुम्ही घाई केली नाहीत ना?<br />असो. नसेल तसं... उगीच विचार आला डोक्यात इतकंच... राग मानू नका!<br /><br />तुमची,<br />ए.अ.लो.प्र.mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-44093055344619614402010-04-14T12:18:00.003+05:302010-04-14T12:45:52.242+05:30एक शोध ‘देवा’चाही...!<strong><span style="font-size:85%;color:#000000;"><span>(दै. लोकमतच्या रविवार दि. ५ एप्रिलच्या 'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी पुन्हा...) </span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#660000;"><span></span></span></span></strong><br /><strong><span style="font-size:130%;"><span style="color:#660000;">विश्वाची निर्मिती कशी झाली.... अनादी काळापासून किंवा असे म्हणुयात की मानवाला ‘समज’ आल्यापासून छळणारा हा प्रश्न... विज्ञान सिद्धांतांच्या आधारे तर धर्ममार्तंड ग्रंथांच्या आधारे त्याची उत्तरे देत असतात. ‘सर्न’मध्ये झालेल्या महाप्रयोगामुळे हे ब्रह्मांड घडविणा-या ‘देवा’चा शोध शास्त्रज्ञांना लागेल का? प्रयोगाच्या इतक्या प्राथमिक अवस्थेत या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे नाही... पण कल्पनेला थोडा ताण दिला आणि आपली ‘देवा’ची व्याख्या व्यापक केली, तर हे उत्तर मिळूही शकते...</span></span></strong><br />-------------------------------<br />‘सर्न’मधील प्रयोगात विश्वाच्या या उत्पत्तीचे रहस्य शास्त्रज्ञांना उलगलेड काय? या आदीम प्रश्नाचे उत्तर या प्रयोगातून मिळू शकेल, असे अनेकांना वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे दोन प्रकार असू शकतात... एक म्हणजे थिअरॉटिकल आणि दुसरा प्रॅक्टिकल... थिअरॉटिकली बिग बँग सिद्ध करण्यासाठी गणिताचा आधार घेतला जाईल आणि तो विषय फारच क्लिष्ट असेल. दुसरा मार्ग असेल तो प्रॅक्टिकल... या प्रयोगातून हाती आलेल्या गोष्टी तपासून... पण आजवर कोणीच “विश्व’ निर्माण केलेले नसल्यामुळे हाती आलेल्या गोष्टी बरोबर आहेत, हे तपासणार तरी कसे...<br /><span style="color:#663333;">प्रयोगातून काय साध्य होऊ शकते?</span><br />अध्यात्मिक किंवा गणिती प्रश्नही बाजुला ठेऊन भौतिक जगाचा विचार केला खरेतर या प्रयोगातून शास्त्रज्ञांच्या हातात मोठा खजिना लागू शकतो. विश्वाची निर्मिती कशी झाली... यापेक्षा एका बिंदुतून निर्माण झालेल्या या विश्वातील सूर्य नावाच्या ता-याचा तिसरा ग्रह वाचविता येईल का, याचे उत्तर मिळू शकते... सध्याचा सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे अर्थातच ‘ग्लोबल वॉर्मिंग...’ या ग्लोबल वॉर्मिंगवर कायमचा इलाज शास्त्रज्ञांना मिळू शकतो... अणुपेक्षाही हजारो पट अधिक उर्जा देणारी... कोणताही कचरा मागे न सोडणारी... कुठल्याही प्रकारचे प्रदुषण न करणारी... अर्थात हे इतक्यात साध्य होणार नाही. त्यासाठी अनेक वर्षेही जावी लागतील कदाचित. पण खरोखर ही वस्तू पुढेमागे तयार करता आली आणि मुख्य म्हणजे ती साठवून ठेवणे शक्य झाले तर संबंध पृथ्वीचा उर्जेचा प्रश्न चुटकीसरशी निकालात निघू शकेल... ती वस्तू म्हणजे अँटीमॅटर...<br /><span style="color:#663333;">अँटीमॅटर काय आहे?</span><br />आपण पाहतो ते विश्व पदार्थाचे किंवा मॅटरचे बनलेले आहे. पदार्थाच्या अणूंमध्ये मध्यभागी असलेला प्रोटॉन हा धन विद्युतभारीत (possitive) असतो तर त्याभोवती ऋण विद्युतभार असलेले इलेक्टॉन्स फिरत असतात... मात्र हेच जर उलट असेल, म्हणजे ऋण विद्युतभार केंद्रस्थानी आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स (शास्त्रीय भाषेत पॉझिट्रॉन्स) धन विद्युतभारीत असतील तर त्याला वैज्ञानिक भाषेत प्रतिपदार्थ किंवा अँटीमॅटर म्हणतात... गणिताचा आधार घेऊन शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWje9Oy80nvTRaXRMwQgppVIPv6arPfE4nbxgLJMFqzhtBZMFA-xkedgKRaAteA_MGw7xDalQ97cQARW4sDV4aQ_b5Ep5jpi2PxaHFohKHP5UOnVx_xa2dcDF2UlvC0A8_8KE-XAsqcRw/s1600/antimater_annihilation_diagram.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 287px; FLOAT: left; HEIGHT: 216px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5459886300586325826" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWje9Oy80nvTRaXRMwQgppVIPv6arPfE4nbxgLJMFqzhtBZMFA-xkedgKRaAteA_MGw7xDalQ97cQARW4sDV4aQ_b5Ep5jpi2PxaHFohKHP5UOnVx_xa2dcDF2UlvC0A8_8KE-XAsqcRw/s200/antimater_annihilation_diagram.jpg" /></a>की मॅटर आणि अँटीमॅटर संपर्कात येताच एकमेकांचा नाश करतील... याला ‘एनिहिलेशन' म्हणतात.<span style="font-size:0;"> हा </span>निव्वळ उर्जेचा उत्तम स्त्रोत... एकवेळ अँटीमॅटर तयार झाला तरी तो साठवून ठेवणे अशक्यच आहे... कारण या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट, अगदी हवादेखील मॅटरची बनलेली आहे. त्यामुळे हा अँटीमॅटर ठेवणार कुठे आणि कशात? या प्रश्वाचे उत्तर संशोधकांवर सोपवणेच योग्य होईल... राहता राहिला प्रश्न ‘सर्न’मधील प्रयोगातून देवाचा शोध लागू शकेल का...? या मुळ प्रश्नाला बगल देऊन अँटीमॅटरचं पुराण लावायचं कारण इतकंच की जरी साठवून ठेवता आला नाही, तरी अँटीमॅटर असतो... तो असू शकतो... ही गोष्टच देवाच्या अस्तित्वाला सप्रमाण सिद्ध करणारी ठरेल... हे विधान बहुदा खुळचटपणाचं किंवा नास्तिकतेचं वाटेल... या विधानाचा तर्कसंगत विचार करायचा तर आधी विश्वाच्या निर्मितीबद्दल धर्म काय सांगतो, ते बघायला हवे...<br /><span style="color:#663333;">ब्रह्मांडाची निर्मिती... धर्मग्रंथ काय सांगतात?</span><br />वैज्ञानिक मानतात की, विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली. हिच ती ‘बिग बँग थिअरी.’ एक बिंदू होता... या बिंदूला ‘हिग्ज बोसन’ किंवा ‘देवाचा कण (God’s Particle)’ असे नाव दिले गेले आहे. त्याचा महास्फोट झाला आणि त्यातून हे ब्रह्मांड घडले, असे विज्ञान मानते... महदाश्चर्याची गोष्ट म्हणजे ही थिअरी सर्वप्रथम मांडली बेल्जियममधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने... फादर जॉर्जेस लेमिटर यांनी... त्यानंतर प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडविन हबल याने गणिताच्या आधारे या बिग बँग थिअरीला बळकटी दिली. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबलमधील विश्वाच्या निर्मितीचे वर्णन आहे... देव म्हणाला प्रकाश होऊ दे... आणि प्रकाश झाला... हिंदू वेद-पुराणे सांगतात की एका बिंदूतुन ब्रह्माने हे विश्व जन्माला घातले... हीदेखील एक प्रकारे ‘बिग बँग थिअरी’च... जगातील सर्व धर्म सांगतात की देवाने जग निर्माण करताना नेहमी ‘समानता’ (symmetry) साधली आहे. प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... चांगल्या शक्ती आणि वाईट शक्ती... देवदूत आणि सैतान... सज्जन आणि दुर्जन... विश्वाच्या निर्मितीतमधील ही सिमेट्री विज्ञानालाही मान्य आहे... प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली हा या सिमेट्री-थिअरीचा सर्वात मोठा भोक्ता होता, यात सर्वकाही आलेच... आता या दृष्टीकोनातून पुन्हा एकदा आपल्या अँटीमॅटरकडे पाहिले तर काय दिसते?<br /><span style="color:#663333;">अँटीमॅटर आणि सिमेट्री...?<br /></span>जर शास्त्रज्ञांना जिनिव्हातील या महाप्रयोगातून अँटीमॅटर तयार झाल्याचे दिसले, तर विश्वाच्या निर्मितीतील ही सिमेट्री आपोआप सिद्ध होणार आहे. अँटीमॅटरचा उर्जेसाठी वापर, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला त्याची होऊ शकणारी मदत... इत्यादी भौतिक गोष्टी बाजुला ठेऊनही विश्वाची निर्मिती करताना निसर्गाने सिमेट्री बिघडविलेली नाही... हे सप्रमाण सिद्ध होऊ शकेल... जसा प्रकाश आणि अंधार... भरती आणि ओहोटी... तसाच हा मॅटर आणि अँटीमॅटर... हे सिमेट्री-बिमेट्री ठिक आहे... पण ‘देवाचा शोध’ कसा लागेल... हाच प्रश्न पडला असेल ना?<br /><span style="color:#663333;">जिनिव्हाच्या ‘हायड्रॉन कोलायडर’मधील ‘देव...?’</span><br />देव म्हणजे दगडाची मूर्ती... देव म्हणजे पंचमहाभूते... देव म्हणजे निसर्ग... देव म्हणजे आपले मन... या सगळ्या रुढ कल्पना बाजूला ठेवल्या आणि देव म्हणजे एक शक्ती आहे, असे मानले तर... विज्ञानाची मोठी झेप घेणा-या माणसाची नजर ‘ब्रह्मांड संपते’ तिथपर्यंत अजूनही पोहोचू शकलेली नाही... ‘असे हे ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे देव...’ अशी जर देवाची व्यापक व्याख्या केली, तर ‘सर्न’ या केवळ विज्ञान आणि विज्ञानालाच वाहिलेल्या... देवाचे नाव जिथे घेतले जात नाही अशा अत्याधुनिक प्रयोगशाळेतील एका २७ किलोमीटर लांब नळीतून शास्त्रज्ञांना या देवाचा ‘साक्षात्कार’ होणे अवघड नाही...!mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-33254289759827586552010-03-28T01:46:00.007+05:302010-03-28T02:41:49.787+05:30वड्डा शाणा छे नरेनभाई...!काल दिवसभर नरेंद्र मोदींची चौकशी सुरू होती... गुजरातमध्ये २००२ <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzD3JJyeSVcbQB5nbGIiVJZp8jFlruiOxhXEaaA9iQT34t2SQCSGDzpWb06GPV9m7rwqHHDc6XjrFyAPzh9kAu2BM0zLBi2811RBrMGpxWqVian3fdVcWhSTJYyxDy0eiYUyBNWmctqWo/s1600/riots31.jpg"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 206px; FLOAT: right; HEIGHT: 320px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453422947713801122" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzD3JJyeSVcbQB5nbGIiVJZp8jFlruiOxhXEaaA9iQT34t2SQCSGDzpWb06GPV9m7rwqHHDc6XjrFyAPzh9kAu2BM0zLBi2811RBrMGpxWqVian3fdVcWhSTJYyxDy0eiYUyBNWmctqWo/s320/riots31.jpg" /></a>साली झालेल्या दंगलींमध्ये गुलबर्ग सोसायटीतील दंगलीत काँग्रेसच्या खासदाराची हत्या <span style="font-size:0;">झाली</span> होती... या प्रकरणी सुप्रिम कोर्टाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने, अर्थात एसआयटीने ही चौकशी केली... इत्यादी... इत्यादी... दिवसभर हेच सगळ्या चॅनलवर सुरू होतं... आज रविवार असल्याने बहुदा हेच दिवसभर चालणार... पेपरमध्ये सकाळी उठल्यावर हेच वाचणार आहोत आपण सगळे, त्यामुळे खोलात जात नाही... <div><div><div>आत्ता रात्रीचे २ वाजतायत. मोदींची चौकशी संपून तासभरच झालाय. पण त्याबद्दल प्रकार्षानं काही गोष्टी वाटल्या, म्हणून लगेच लिहायला बसलो...<br /><div>नरेंद्र मोदींची चौकशी होणार... दंगल प्रकरणी चौकशी होणार... ही बोंबाबोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खरंतर या एसआयटीनं मोदींना २१ तारखेला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यावेळी ते तिथे गेलेच नाहीत. उलट त्यांनी जाहीर पत्र लिहिण्याचा घाट घातला... त्यामुळे मोदी चौकशीला घाबरतात, अशी आरोळी दिली गेली. बरं त्यांनी लिहिलेलं पत्रही खास होतं, वैगरे नाही. साधंच... म्हणजे कायदा सगळ्यांना सारखा आहे... कायद्याचा मी मान राखतो इत्यादी... </div><div>काल मात्र त्यांनी तब्बल नऊ-साडेनऊ तास चौकशीत विचारलेल्या ६०-७० प्रश्नांची उत्तरं अधिका-यांना दिलीच. याचा अर्थ ते चौकशीला घाबरतात ही भिती अनाठायी होती, असा घ्यायचा का? पण या कृतीने त्यांनी एका दगडात <span>अनेक<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_8nsLI31CeSlzlFH2IOT05_yNa0E1IIpd-VsG71OoyIj1WXW51c_2fs77JGXgNknPJ8DnwoFDHU1aGnoiJQFhXxoKvNqQ92D32WtpKDcpTxYQ3guTUc_T0vB-XOo5op96of7bZ3gzqH0/s1600/riots.jpg"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 205px; FLOAT: right; HEIGHT: 167px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453422642544525378" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_8nsLI31CeSlzlFH2IOT05_yNa0E1IIpd-VsG71OoyIj1WXW51c_2fs77JGXgNknPJ8DnwoFDHU1aGnoiJQFhXxoKvNqQ92D32WtpKDcpTxYQ3guTUc_T0vB-XOo5op96of7bZ3gzqH0/s320/riots.jpg" /></a></span> पक्षी मारले आहेत...</div><div>पहिला पक्षी : २१ तारखेची चौकशी टाळून त्यांनी आपणहूनच घाबरत असल्याचा देखावा उभा केला. जेणेकरून जेव्हा चौकशी होईल, त्यावेळी तिला वलय प्राप्त व्हावं आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण व्हावं. </div><div>दुसरा पक्षी : एका मुख्यमंत्र्याला तुम्हाला हवं त्यावेळी चौकशीला बोलावू शकत नाही, हे त्यांनी एसआयटीला दाखवून दिलं. एसआयटी जरी सुप्रिम कोर्टानं नेमली असली तरी तिने दिलेली तारीख पाळायला ते कोर्ट नाही, हे त्यांनी जाताजाता अधोरेखित करून टाकलं. </div><div>पक्षी तिसरा : त्यांना व्हिलन बनवण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांनी तशी पार्श्वभूमी तयार करू दिली. कारण त्यांना त्या काळ्या रंगावर स्वतःचा (म्हणजे त्यांच्या मते.... ते स्वच्छ आहेत, असं मला म्हणायचं नाही.) पांढरा रंग लख्ख उठून दिसावा... <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiew24bUmGwFokqovHfZkVaMMzDyL3pUKYbCqcopFBOXf_EvOvVcFcTkM9KBAb5NlriH5-_zL7SjcuvD5OTGj244X9D0V8aKgz8CsyeWNEy1QtGIzlJpgPjAOy_OnP9P5ou0gtm7Zw7d0Y/s1600/riots1.jpg"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 201px; FLOAT: right; HEIGHT: 150px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453422758823045874" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiew24bUmGwFokqovHfZkVaMMzDyL3pUKYbCqcopFBOXf_EvOvVcFcTkM9KBAb5NlriH5-_zL7SjcuvD5OTGj244X9D0V8aKgz8CsyeWNEy1QtGIzlJpgPjAOy_OnP9P5ou0gtm7Zw7d0Y/s320/riots1.jpg" /></a></div><div>पक्षी चौथा : इतकी मिडीया-हाईप झाल्यावर आजच चौकशी संपवायची आहे, असं सांगून तमाम हिंदी-इंग्रजी चॅनलवाल्यांना रात्री १ वाजताचं बुलेटीन लाईव्ह करायला लावलं... </div><div>स्वतःबद्दल कुतूहल निर्माण केल्यानंतर काल दोन्ही वेळा उत्तरे देऊन बाहेर पडताना ते हसतमुखाने मिडियाला सामोरे गेले... पुन्हा त्यांनी मिडियाला काही माहिती पुरवली का.... तर नाहीच! हे सुप्रिम कोर्टाचं पथक असल्यामुळे ते त्यांची माहिती कोर्टाला देतील, मला ती देण्याचा अधिकार नाही, असं सांगत त्यांनी अन्यच मुद्द्यांवर भाषणबाजी केली. </div><div>गुजरात दंगली सरकार पुरस्कृत आहेत किंवा नाही, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुरस्कृत (किंवा गोघ्राकांडामुळे ते भडकून उठले, असं म्हणा हवं तर) होत्या, हे मानायला जागा आहेच. संघाच्या मुशित तयार झालेले नरेंद्र मोदी प्रत्यक्षात जरी दंगलीत दगड मारत नसतील, तरी त्यांना या काळात काय घडतंय, ते माहितीच नव्हतं, असं म्हणणं भोळसटपणाचंच ठरेल. कारण एकतर मुख्यमंत्री आणि जे दंगली करत होते, त्यांना अधिक <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUJ-iMg473pSnAoCmPmAvQMvCeQCz8aYV76oFFV17wQ4S_t0CXsCx8SbqXm4_w9QCvf4wp7UpLg7KidQDFJ0clyFQkfk807MxJ732YAeSJ7bNrrTkZ4D4qn5ZFAmUBaGPZIFxsiWYw3YQ/s1600/narendra.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 189px; FLOAT: left; HEIGHT: 242px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5453421809121771762" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiUJ-iMg473pSnAoCmPmAvQMvCeQCz8aYV76oFFV17wQ4S_t0CXsCx8SbqXm4_w9QCvf4wp7UpLg7KidQDFJ0clyFQkfk807MxJ732YAeSJ7bNrrTkZ4D4qn5ZFAmUBaGPZIFxsiWYw3YQ/s320/narendra.jpg" /></a>जवळ... त्यामुळे माहितीचे स्त्रोत अधिक असणारच! पण या चौकशीतून काय निष्पन्न होणार? मोदींइतका मुरलेला राजकारणी स्वतःलाच अडचणीत आणणा-या गोष्टी एसआयटीला सांगेलच, याची शाश्वती कोणी द्यायची? त्यामुळे मोदींनी स्वतःहून स्वतःभोवती वलय निर्माण करून कालच्या चौकशीचा आणखी मोठा फार्स घडवून आणला (कर्टसी - मिडिया) हेच यातील सत्य असावं, असं वाटतंय... </div><div>स्वतःविरुद्ध पडलेला एखादा फासा डाव जिंकण्यासाठी कसा वापरावा, याचं उत्तम उदाहरण मोदींनी या निमित्तानं देशातील मी-मी म्हणणा-या तमाम नेत्यांना घालून दिलं आहे, हे मात्र खरं... स्वतःच्या विरोधात मोठ्ठी हवा निर्माण करायची आणि हवा एकदा <span style="font-size:0;">पुरेशी</span> वाहू लागली की त्यात पतंग उडवून मौज लुटायची... ही मोदींची खेळी 'चोक्कस'च म्हणाली लागेल...<br /><span style="font-size:130%;color:#ff0000;">'तमे वड्डा शाणा छे.... नरेनभाई!'</span></div></div></div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-8382904395529669622010-03-20T00:48:00.011+05:302010-03-20T01:56:10.125+05:30माया मेमसाब...!<span style="font-size:100%;"> मायावतींचं एक बरं आहे... स्वतःचे मोठ्ठेच्या मोठ्ठे पुतळे स्वतःच उभारायचे... स्वतःला नोटांचे हार घालून घ्यायचे... आणि त्यावर कोण बोललं की 'दलित की बेटी' मोठी झालेली यांना चालत नाही, असं म्हणत गळा काढायचा...<br /></span><div><div><div><div><div><div><br /><div><div><div><div><span style="font-size:100%;">हे म्हणजे मुंबईत राहणा-या झोपडपट्टीतल्या लोकांसारखंच आहे. रहायचं झोपडीत. आत टीव्ही, डिश टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, फ्रीज, एअर कुलर असं सगळं असतं. मग ती झोपडी पाडायला कोणी गेलं की 'बेघर केलं' असं </span><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguq8lagJTzwHnjUh-7KBlHR34UmNfVvFzXoIl8JbVuaSR-U8AzL25T6BWWLJBm5pdjVYqL_kBs_ROZXvsuPxKkSTMQ0CFfIl106H2jSyYoA3iM3Q2LHoP799pm-jlqOnyY3OG2cBnjqDg/s1600-h/MAYA1.jpg"><span style="font-size:100%;"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 207px; FLOAT: left; HEIGHT: 319px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450439631432977170" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEguq8lagJTzwHnjUh-7KBlHR34UmNfVvFzXoIl8JbVuaSR-U8AzL25T6BWWLJBm5pdjVYqL_kBs_ROZXvsuPxKkSTMQ0CFfIl106H2jSyYoA3iM3Q2LHoP799pm-jlqOnyY3OG2cBnjqDg/s400/MAYA1.jpg" /></span></a><span style="font-size:100%;">म्हणत बोंब ठोकायची...<br /></span><div><span style="font-size:100%;">मायावती यापेक्षाही एक पाऊल पुढे गेल्यात. फक्त बेघर केलं असं म्हणून त्यांचं भागत नाही. बाबासाहेबांचं नाव घेत दलितला बेघर केलं, असं म्हणून सहानुभूती मिळवायची, असला हा त्यांचा उद्योग... त्या दलित घरातल्या आहेत, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आल्या असू शकतात वैगरे... सगळं मान्य.... पण जर तसं असेल तर त्यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं, ते जगासमोर यायला नको का? दलित घरातून येऊन देशात</span><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiP8rLpkSBeItw3es71N5sIqZymZ1aRMxI948RfVTDWhEx9FoiolYIWRpBWVLU1lS3LJg0YLLaLxJbxV7Z8MzOmd2IzE7MbtMpIcZ-e21tpwNJZQGw6BFd1HNxn70R50uLvmkOJJOGFB1g/s1600-h/MAYA2.jpg"></a><span style="font-size:100%;">ल्या सगळ्यात मोठ्ठ्या राज्याचा मुख्यमंत्री झालेली ही बाई... तिनं स्वतःचे पुतळे उभे करण्यापेक्षा उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात खेडोपाडी शाळा काढल्या असत्या तर त्या गावातल्या दलित जनतेनेच त्यांचे पुतळे उभारले असते. </span><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0GzAyzBVfEJuJmM1ggKuQ07iSJihyAhYN1wx56repIy2C4D3vTWF1qjuNZyO5zOLGggLGMCmc4nu3QrpcqhAJpS03guagckxdSdfpF0KTQmpyfXvNLA3eGTkKADAYoo1JjTT7LhnBGiw/s1600-h/MAYA2.jpg"><span style="font-size:100%;"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 260px; FLOAT: right; HEIGHT: 200px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450442639808573586" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi0GzAyzBVfEJuJmM1ggKuQ07iSJihyAhYN1wx56repIy2C4D3vTWF1qjuNZyO5zOLGggLGMCmc4nu3QrpcqhAJpS03guagckxdSdfpF0KTQmpyfXvNLA3eGTkKADAYoo1JjTT7LhnBGiw/s400/MAYA2.jpg" /></span></a><span style="font-size:100%;">त्यासाठी राज्य सरकारच्या किंवा गेलाबाजार पक्षाच्या तिजोरीत हात घालायची गरजच पडली नसती. पण काशिराम (सॉरी... मा. कांशिराम) यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा फूल साईज पुतळे त्यांनी स्वखर्चाने (?) उभारले.... यात जनतेचं त्यांनी काय आणि कसं भलं केलं, हे त्याही सांगू शकणार नाहीत. </span></div><div><span style="font-size:100%;">पुतळ्यांचा प्रश्व अजून मिटलेला नाही. केंद्र सरकारने त्याच्या खर्चाचा तपशील शोधण्याचे <span style="font-size:+0;">आदे<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjk8imz16ckIhqixF-uSCZCkZ2Js6dKOGOtJT7bu0FTGVP_cjxHt_5RIidCVkwFAbQctoETxi2RtfOka4IMgoNDSv1wG0W3m4aba1Fs8wS2GDAjJ6lYpbltjwnT-eCZ4G-Wud_p2kDocj0/s1600-h/MAYA_sta2.jpg"></a>श</span> दिलेत. न्यायसंस्थेनंही या उधळपट्टीवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. हे संपत नाही तोच मायावतींनी <span style="font-size:+0;">बस<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtE4LkhKMlnj1GXcwhESSGolJQPFn1o1csThHnSCxqSj37C9Mj_CXj4fqQW5D-bLOl_GvWL-IWhmU7ig64N5_pCGGVTDFlRofkytNv_8k9GKlZh3ZyXoeHjMe9slNQu51Wb9AtcV-WbyI/s1600-h/MAYA_sta4.jpg"></a>पाच्या</span> <span>मेळा<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkF1Ely55Mh1MoqNiKT3J7J5wYuQsxcjsxjc3IPqcaySm9TLNOt6T8lo7ffMtKIO0LzwMSjWlnS_k8wTfZAtc1ZuI5fFtaytC5gYZIhyphenhyphen16WbXr3opU-S0bbJlexPGtRpK49pbqM4Hyu40/s1600-h/MAYA_sta3.jpg"><img style="MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 202px; FLOAT: left; HEIGHT: 199px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450443474814018466" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjkF1Ely55Mh1MoqNiKT3J7J5wYuQsxcjsxjc3IPqcaySm9TLNOt6T8lo7ffMtKIO0LzwMSjWlnS_k8wTfZAtc1ZuI5fFtaytC5gYZIhyphenhyphen16WbXr3opU-S0bbJlexPGtRpK49pbqM4Hyu40/s320/MAYA_sta3.jpg" /></a>व्यात</span> १००० रुपयांच्या नोटांचा हार स्वतःच्या गळ्यात </span><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3jMxna4K5swx8Nc0aJCntnPzG4hVq1xyMyG3OICwKemhE9aPInNsZ89zHKyvDRMIOH8cxTiLhGCJ-U5xFJc-v_xuy9qWlxVxwG3v0VR9pdLAIB2Lq9YE5rE-Wt1Mrk4e43BBWiVVwGBs/s1600-h/MAYA_sta1.jpg"></a><span style="font-size:100%;">घालून घेतला. कहर म्हणजे त्यावर चहूबाजूनी झोड उठल्यावरही दुस-या दिवशी आणखी एक हार घालून घेतला. आणि या कहराचा कहर म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जाहीरच करून टाकलं, 'बहेनजी जिथे जिथे जेव्हा केव्हा जातील, तिथे त्यांना नोटांचाच हार घालू...!' आता झोपडीत राहणा-या (म्हणजे खरोखरच्या... टीव्ही-फ्रीजवाल्या झोपडीत नव्हे) रंजल्या-गांजलेल्या दलिताचं मायावतींनी नोटांचे हारच हार घालून कसं भलं होणार? येता जाता बाबासाहेब-महात्मा फुल्यांचं नाव घ्यायचं <span style="font-size:+0;">आणि</span> त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्याऐवजी विमानातून शॉर्टकट मारायचा... हे कसलं नेतृत्व.... हे कुठले नेते... यांना कोण </span><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiA2Pt2EJgr47a48_UhqrqRNXQHKCf4ZpJ47zrDG9j_LShT-L8sTr0XeA33TPWPh8OSAvrYYYvpyI3o5c7iYZc1wfX8kGCHAGFM4lhtmpgBF31nyyeOf9hncLJ8haPsdeugfGIj7qyjwbs/s1600-h/MAYA_sta2.jpg"><span style="font-size:100%;"><img style="MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 248px; FLOAT: right; HEIGHT: 175px; CURSOR: hand" id="BLOGGER_PHOTO_ID_5450440739216543250" border="0" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiA2Pt2EJgr47a48_UhqrqRNXQHKCf4ZpJ47zrDG9j_LShT-L8sTr0XeA33TPWPh8OSAvrYYYvpyI3o5c7iYZc1wfX8kGCHAGFM4lhtmpgBF31nyyeOf9hncLJ8haPsdeugfGIj7qyjwbs/s400/MAYA_sta2.jpg" /></span></a><span style="font-size:100%;">निवडून देतं... का निवडून देतं... निवडून दिल्यानंतर 'तुम्ही असं का केलंत' हे विचारण्याचा अधिकार जनतेला नाही का... की तिने मुकाटपणे पुढली पाच वर्षं असली थेरं बघत बसायची... </span></div><div><span style="font-size:100%;">मायावतींचं हार प्रकरण म्हणजे आपल्या देशाचं राजकारण किती हीन दर्जाला जाऊन पोहोचलंय, त्याचं जातिवंत आणि ताजं उदाहरण आहे. </span></div><div><span style="font-size:100%;">मायावतींच्या पक्षाचे नेते सांगतात की हारासाठी लागलेला पैसा जनतेकडून गोळा केलाय... उत्तर प्रदेशातल्या जनतेकडे जर इतका पैसा असेल तर मग महागाईच्या नावाने गळा काढायचा अधिकार कोणाला उरतो... ना जनतेला, ना नेत्यांना... </span></div><div><span style="font-size:100%;">यापेक्षा १० पट मोठी पोस्ट लिहिली तरी कमीच पडेल आणि इतकं लिहून मनातला संताप कमी होईल याची शक्यता नाहीच... किती लिहिणार आणि का लिहायचं, असा विचार करून इथेच थांबावं, हे बरं... </span></div></div></div></div></div></div></div></div></div></div></div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-9760391733078678152010-03-04T01:44:00.002+05:302010-03-04T02:00:53.702+05:30एका सस्पेन्सची अखेर...!<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXHOjhl9a32ej2K6bOyrx7SCIy8Bwq0COWduj6qs36BQtrTwqmkdDrde3UWtP61dQCGTvNdiMbIEu6qeZRV2uESgY5TptqLkIhG-rLnIhAxYcXMa0Vz5wk1reUiZeOnVaxOyyuI8thVwk/s1600-h/pravin-pramod-mahajan.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5444507652545185858" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 359px; CURSOR: hand; HEIGHT: 256px; TEXT-ALIGN: center" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXHOjhl9a32ej2K6bOyrx7SCIy8Bwq0COWduj6qs36BQtrTwqmkdDrde3UWtP61dQCGTvNdiMbIEu6qeZRV2uESgY5TptqLkIhG-rLnIhAxYcXMa0Vz5wk1reUiZeOnVaxOyyuI8thVwk/s400/pravin-pramod-mahajan.jpg" border="0" /></a><br /><div>प्रमोद महाजन यांचा मारेकरी प्रवीण याचा अखेर अंत झाला... काही जण म्हणतात 'पापाचं प्रायश्चित्त मिळालं...,' काही जण म्हणतात 'बरं झालं गेला एकदाचा...,' पण प्रवीणच्या अकाली मृत्यूमुळे एका सस्पेन्सची अखेर झालीय, हे मात्र खरं...</div><div>प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा... त्यानंतर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होणारा... आणि त्यानंतर कोर्टात 'नॉट गिल्टी' असं सांगणारा... खालच्या कोर्टानं जन्मठेप ठोठावल्यावर वरच्या कोर्टात अपिल करणारा... प्रमोद महाजन यांच्यासोबतचे प्रसंग 'माझी डायरी'च्या रुपानं शब्दांत मांडणारा... अशी प्रवीणची अनेक रुपं. त्यानं आपल्या 'डायरी'त प्रमोदला हिरो-टर्न-व्हिलन असं रंगवलंय. प्रमोद महाजनांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि संघटन कौशल्याबद्दल संपूर्ण आदर बाळगूनही 'प्रवीणनं जे लिहिलंय ते धादांत खोटं आहे...' असं म्हणवत नाही. कारण प्रमोद महाजनांचं आयुष्यही तितकंच गूढ होतं. प्रवीणनं प्रमोदजींमध्ये बदल होण्याचं खापर विवेक मैत्रा याच्या माथी फोडलंय... राहूलबद्दल प्रवीणनं प्रमानं लिहिलंय... राहूललाही विवेकनंच बहकवलं, असा काहीसा प्रवीणच्या लेखनाचा सूर आहे. स्वयंसेवक प्रमोद आणि राजकारणी प्रमोद यांच्यातला फरक प्रवीणनं मांडलाय. त्यांची घरात चालणारी दादागिरी काहीशी भडक असली तरी त्यातला १० टक्के अंश खरा मानायला हरकत नाही. </div><div>प्रमोदजींची हत्या झाल्यापासून 'प्रवीणनं हे कृत्य का केलं...?' याची चर्चा होत राहिली. कोर्टात आणि बाहेरही प्रवीण सतत म्हणत आलाय की, त्याचं कारण तुम्हाला कधीही समजणार नाही... म्हणजे दिसतं तितकं साधं कारण नाही, हे प्रवीणनं अप्रत्यक्षपणे सुचित केलंय. या हत्येमागे घरगुती कारण असेल का? की प्रवीण प्रमोदजींचा करत असलेला अत्यंतिक द्वेष, हे कारण असेल...? की यात काही राजकीय धागे गुंतले आहेत? याचं उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकत होत्या. एकतर स्वतः प्रमोदजी किंवा प्रवीण... आता हे दोघंही नाहीत. </div><div>प्रमोदजींच्या अल्प पण दैदिप्यमान आयुष्याची अखेर कशामुळे झाली, या सस्पेन्सचा शेवट झालाय... 'हा सस्पेन्स तुम्हाला कधीच कळणार नाही,' असं म्हणत सस्पेन्स वाढवणारा प्रवीणच आता इतिहासजमा झालाय... </div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-86073142248035384582010-02-24T21:08:00.002+05:302010-02-24T21:15:26.928+05:30जहॉंपना... तुसी ग्रेट हो..!<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_JxabDPIx4bvWr_q-bW40ffoKABTA1WGPxrsYAbRZQnjF-jH5pPE4c4OtArIR0n_sDa_eQwiwIFVoIBE0VZNmY77CTnY-TEdwlrbDpdmwrpl0pkJW71ZlEXwcdbnvf3oSktkTUkzEIIY/s1600-h/sachin_200.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5441836260752358434" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 380px; CURSOR: hand; HEIGHT: 309px; TEXT-ALIGN: center" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_JxabDPIx4bvWr_q-bW40ffoKABTA1WGPxrsYAbRZQnjF-jH5pPE4c4OtArIR0n_sDa_eQwiwIFVoIBE0VZNmY77CTnY-TEdwlrbDpdmwrpl0pkJW71ZlEXwcdbnvf3oSktkTUkzEIIY/s400/sachin_200.jpg" border="0" /></a>एकदिवसीय सामन्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच २०० धावा ठोकण्याचा पराक्रम दुसरं कोण करू शकणार होतं...<br /><div>'मला वाटलं ते...!'कडून आणि या ब्लॉगच्या वाचकांकडून सचिन रमेश तेंडूलकरला शतशः मनःपूर्वक धन्यवाद... </div><div>(attn. ऍनॉनिमस : मला धन्यवादच म्हणायचं आहे... उगाच चुक काढू नये. अभिनंदन करण्याची आपली कोणाचीच योग्यता नाही. आपली एक संध्याकाळ धन्य केल्याबद्दल सचिनचे आभारच मानायला हवेत...)</div>mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-109882570980571341.post-18990878018945669992010-02-22T22:28:00.003+05:302010-02-22T23:10:15.028+05:30ए.सी. संस्कृतीचा बुरूज सर...?किल्ला राखायचा कुणी... किल्ल्याच्या मालकाला प्रश्न. ज्या कष्टानं 'कमळगड' उभारला, जोपासला, तब्बल ६ वर्षं राजधानी म्हणून जो किल्ला देशभर मिरवला... त्याचे बुरूज बेढब झाले होते... त्यांची डागडुजी आवश्यक होती. इतकी वर्षं किल्लेदार असलेल्यांना ते काही जमलं नाही... करायचं काय? मालकाला चिंता... शेवटी पांढ-या मिशीत हसून मालकानं काही निर्णय घेतला आणि तो अमलात आणला... <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNaax_ZCCtgZ1EUF2XGnHVfPKhahO4dttCvudPIekoxvkLrowO4lXcl3Z9YLn7z3YbhGqsxe9dH3NSLreyLVGYH-tis8DG177PeDZaukDaWN6xQN89S2xj2yJtYn8cMg0jED5k1r1UFdo/s1600-h/nitin_gadkari.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5441123850799760034" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 262px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNaax_ZCCtgZ1EUF2XGnHVfPKhahO4dttCvudPIekoxvkLrowO4lXcl3Z9YLn7z3YbhGqsxe9dH3NSLreyLVGYH-tis8DG177PeDZaukDaWN6xQN89S2xj2yJtYn8cMg0jED5k1r1UFdo/s320/nitin_gadkari.jpg" border="0" /></a><br />किल्ल्यात अनेक वर्षं काढलेल्या एका भरभक्कम मानक-याची नेमणूक 'किल्लेदार' म्हणून केली आणि किल्ल्याची डागडुजी करण्याची, त्याला चांगलं रूप देण्याची अशक्यप्राय जबाबदारी सोपवली... या किल्लेदाराला यापुढे आपण सोयीसाठी 'गडकरी' म्हणूयात...<br />तर... या 'गडकरीं'पुढचं आव्हान कठीण... किल्ल्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची हे काम वाचून वाटतं तितकं सोपं नाहीये... कारण या 'गडकरीं'च्या बरोबरचे जे लढवय्ये आहेत, त्यांना ए.सी. छावण्यांमध्ये झोपायची सवय लागलीये... प्रत्येक जण आपला आपापला बुरूज सांभाळण्यात व्यस्त... एकानं आपल्या बुरूजाला भगवा रंग दिलेला... दुस-यानं निळा... तिस-यानं लाल.... त्यामुळे एकूण किल्ल्याचं रुप विदुषकासारखं झालेलं... 'गडकरी'चं पहिलं काम होतं या सगळ्यांची तोंड एकमेकांकडे फिरवण्याचं... मालकांनी दिलेली असाईनमेंटच होती ती... झालं 'गडकरी' कामाला लागले...<br />किल्ल्यावरचे सगळे मानकरी-कामगार-सैनिक वर्षातून एकदा किल्ल्यावरच्या जत्रेसाठी एकत्र येत... 'गडकरी'नं ही संधी साधायचं ठरवलं... जत्रेच्या ठिकाणी त्यांनी सगळे एकाच रंगात रंगवलेले, एकसारखे दिसणारे तंबू उभारले... दरबारातले सगळे मानकरी एकाच पातळीचे आहेत, हे दाखवण्यासाठी... हा पहिला प्रयत्न... पण तो फसला! कारण दिवसभर दुस-या किल्ल्यावर आणि किल्लेदारांवर तोंडसूख घेऊन झालं की आपापल्या ए.सी. छावणीत झोपायला जायचं, हे प्रत्येकानंच ठरवलेलं. (ए.सी.ची सवय झाली होती. काय करणार?)<br />प्रयोग दुसरा. आपल्या भाषणात गडकरीनी सगळ्या मानक-यांना फैलावर घेतलं... बुरूजांच्या वेगवेगळ्या रंगांवर टीका केली... ए.सी.ला चटावलेल्या मानक-यांचे वाभाडे काढले... लोक किल्ल्याबद्दल जे बोलतात, ते मालकाला आवडत नाही, हे सांगितलं... सामान्य सैनिक आणि कर्मचा-यांशी संबंध वाढवायला सांगितलं... कायम घोडागाड्यांमध्ये फिरणा-यांना पायी जायला सांगितलं... एक ना अनेक...<br />'गडकरी'चं भाषण झालं... सगळ्या मानक-यांनी ऐकून घेतलं... सैनिकांनी-कामगारांनी टाळ्या वाजवल्या...<br />एकीच्या आणाभाका झाल्या... दुस-या किल्ल्यातल्या लोकांना नावं ठेऊन झाली... जत्रा संपली... सगळे मानकरी आपल्या ए.सी. बुरूजांकडे परतले... जाताना सगळे जण गालातल्या गालात हसत होते...!!!mala-watala-tehttp://www.blogger.com/profile/03689502567753403751noreply@blogger.com0