

ही आग एकदा विझली की मग नेमकं नुकसान किती... मृत्यू किती... याची चर्चा सुरू होईल. राज्य सरकारच्या 'डिझास्टर मॅनेजमेंट'चा पंचनामा करणारी जनहित याचिका दाखल झालीपण आहे. त्याचंही काय होईल ते होवो... प्रश्न वेगळाच आहे... थोडा घाबरवणाराही.... भारतातल्या तेल कंपन्यांचे असे अनेक डेपो ठिकठिकाणी आहेत. शिवाय ट्रॉम्बेसह अनेक ठिकाणी अणूभट्ट्याही आहेत. जयपूरची पुनरावृती अशी कुठे झाली, तर परिस्थिती आहे.
आधी या दुर्घटनेला 'अतिरेकी कारवाई' असं नाव दिलं गेलं. मात्र आता एका कर्मचाऱ्यानं चुकीच्या क्रमानं वॉल्व सोडल्यामुळे प्रेशर बिघडलं आणि आग लागल्याचं कारण आता पुढे येतंय. हे जास्त भयानक आहे... अतिरेकी कारवाईपेक्षा भयानक आहे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगली तर अतिरेकी कारवाई थांबवता येते... मानवी चूक नाही...
आणखी एक धो

जयपूरच्या आगीत सुमारे ५०० कोटींची मालमत्ता... अनेक बॅरल इंधन... किमान १०-१२ जीव जळून खाक झाल्येत... याच आगीत आपला निष्काळजीपणाही जळून खाक झाला तर बरं... नाहीतर काही खरं नाही...! खरंच खरं नाही...!!
1 comment:
इथे इतकी लहानशी चुक झाल्याने आग लागणे शक्य नाही. कांही तरी लपवले जात आहे. एकदा सगळं बेचिराख झाल्यावर मग काय सापडणार आहे? तेंव्हा मेंटेनन्स फ्लॉज लपवुन कुठल्यातरी त्या ऍक्सिडेंट मधे वारलेल्या एखाद्या कर्मचाऱ्यावर जवाबदारी थोपायची जुनी टॅक्ट आहे ही सरकारी कंपन्यांची, कारण तो काही येणार नाही एक्स्प्लेनेशन द्यायला.. तुम्ही पत्रकारांनी प्रॉपरली कव्हरेज केलं , आणि थोडं इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम केलं तर खरं काय ते बाहेर येणं सहज शक्य आहे.. मला पण बऱ्याच गोष्टी ठाउक आहेत, पण बोलता येत नाहीत. असो..
Post a Comment