२००९ साली पावसानं आता मारलीये तशीच दडी मारली होती. नंतर पडला चांगला. पण तेव्हाही जुलै उजाडला तरी त्याचा पत्ता नव्हता. त्यावेळी १ जुलै रोजी लिहिलेल्या पोस्टची लिंक खाली दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता ३ वर्षांनंतरही परिस्थितीत काडीचा फरक पडलेला नाही. विधानसभा निवडणुका वैगरे तात्कालिन प्रसंग वगळता आताही परिस्थिती तशीच आहे. ही खरंच गमत्तशीर गोष्ट आहे आणि आपले राज्यकर्ते आणि आपणही, किती निर्ढावले आहोत, त्याचंच हे प्रतिक आहे.
आपण जुन्या गोष्टी पटकन विसरतो. पब्लिकची मेमरी शॉर्ट-टर्म असते, असं एक खास मराठी वाक्य आपल्याला माहिती असतं... त्यातंच हे प्रतिक म्हणता येईल का?
पाऊस आलाच नाही तर?
No comments:
Post a Comment