Tuesday 17 July 2012

वयम् पंचाधिकम् शतम्...

"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." 
सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...
अर्जुनासह पांडवांना १४ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास भोगायला लागला. ही १५ वर्षं संपल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं... अखेरीस श्रीकृष्णानं अर्जुनाचं सारथ्य केलं आणि अर्जुनासह पांडवांना मौलिक उपदेश करून एकेक करून कौरवांचे धनुर्धर पाडले आणि युद्धाची समाप्ती झाली...

हे झालं ओरिजनल महाभारत... कलियुगात अशी अनेक महाभारतं घडत असतात. मात्र त्यात दरवेळी असंच होतं, असं नाही... इथं काय झालं ते ऐका!

"सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनही पांडवांना देणार नाही..." 
सुयोधनाची ही प्रतिज्ञा भावी महायुद्धाची नांदी ठरली... ध्रृतराष्ट्रांनी त्याचं हे वाक्य प्रमाण मानलं... भीष्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदी मात्तब्बर राजकारण्यांनीही सुयोधनालाच पाठिंबा देऊ केला...

दोन्ही बाजुंनी युद्धाची संपूर्ण सिद्धता झाली... ध्रुतराष्ट्रांनी जरी सुयोधनाची बाजू घेतली असली, तरी सुयोधन आणि अर्जुनादी पांडव एकत्र यावे असंच त्यांनाही वाटत होतं. किंबहुना अर्जून उघड-उघड ध्रुतराष्ट्र हेच आपला आदर्श असल्याचं सांगायचा आणि सुयोधनाच्या राजकारणाला कंटाळून आपण हस्तीनापूर सोडल्याचं म्हणायचा... अर्जुनाचं बोलणं-चालणं-वागणंही थेट ध्रुतराष्ट्रांच्या प्रमाणेच... त्यामुळे अनेकांना अर्जून हाच हस्तीनापूरचा उत्तराधिकारी आहे, असं वाटायचं. मात्र सुयोधनानं केलेली प्रतिज्ञा आणि ध्रुतराष्ट्रांचं पुत्रप्रेम यामुळे गोची झाली होती... 

दोन्ही बाजू दोन वर्षांनी होऊ घातलेल्या युद्धाच्या सिद्धतेला लागल्या होत्या... तत्पु्र्वी छोट्या-मोठ्या लढायांमध्ये दोघंही आपापलं बळ आजमावत होते. कधी अर्जुनाची सरशी व्हायची तर कधी सुयोधनाची... त्यामुळे प्रत्यक्ष महायुद्धात काय होईल, हे कोणालाच सांगता येणं कठीण होतं... ध्रुतराष्ट्रांना वेळोवेळी युद्धाचं वृत्त आणि सल्ले देणारा 'संजय'ही गोंधळात पडल्याचं दिसत होतं. (महायुद्ध झालं, तरच आपल्याला आपली अंतर्ज्ञान विद्या  वापरता येणार, असं वाटत होतं आणि युद्ध व्हावं, असंच त्याला वाटत होतं, हा तपशिलाचा भाग झाला...) 

एकदा अशीच युद्धाची तयारी सुरू असताना सुयोधनाच्या छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या... त्याला तातडीनं राजवैद्यांकडे नेलं गेलं. राजवैद्यांनी त्यावर उपाय सांगितले आणि आराम करण्याचा सल्ला दिला... सुयोधनाच्या या स्थितीचं वर्तमान दुतांकरवी अर्जुनाकडे पोहोचलं आणि तो गहिवरलाच... द्रोणाचार्यांच्या आश्रमात एकत्र घालवलेले क्षण, हस्तीनापूरात ध्रुतराष्ट्रांच्या मांडीवर एकत्र खेळलेले खेळ, असं सगळं त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं आणि स्वतः युद्धाची तयारी सोडून अर्जुन थेट राजवैद्यांच्या आश्रमात दाखल झाला आणि अर्जुन-सुयोधनाची गळाभेट झाली... इतक्यावरच अर्जुन थांबला नाही, तर रस्त्यांवरच्या खड्यांचा सुयोधनाला त्रास होऊ नये, म्हणून त्याच्या परदेशातून आलेल्या रथाचा चाप अर्जुनानं स्वतःच्या हातात घेतला आणि त्याला सुखरूप हस्तीनापूरात पोहोचवला... खरंतर वनवासाची सात वर्षंच लोटली असताना अर्जुनानं हस्तीनापुरात येण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं... हे हस्तीनापुरातल्या संजयादी काही राजकारणी मंडळींना पसंत पडलं नसलं, तरी कौरव-पांडवांच्या सैन्यांमध्ये मात्र यामुळे जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय...

एकमेकांसोबत युद्ध करण्यापेक्षा "वयम् पंचाधिकम् शतम्" असं म्हणत सुयोधन आणि अर्जुन हस्तीनापुराच्या अन्य मोठ्या शत्रुंशी लढण्यासाठी खांद्याला-खांदा लावून उभे राहोत, अशी प्रार्थना हे सैनिक आता करू लागले आहेत म्हणे! अर्थात, रणवाद्यं छेडली जात नाहीत... रणभेरी निनादत नाहीत... पाञ्चजन्य-देवदत्त फुंकले जात नाहीत... तोपर्यंत अर्जुन-सुयोधनाचं हे प्रेम कायम टिकतं की त्यांच्यात पुन्हा कटुता येते, यावरच युद्धाचं स्वरूप अवलंबून राहणार आहे... 

Wednesday 4 July 2012

पुन्हा ये... रे... ये.... रे...

२००९ साली पावसानं आता मारलीये तशीच दडी मारली होती. नंतर पडला चांगला. पण तेव्हाही जुलै उजाडला तरी त्याचा पत्ता नव्हता. त्यावेळी १ जुलै रोजी लिहिलेल्या पोस्टची लिंक खाली दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता ३ वर्षांनंतरही परिस्थितीत काडीचा फरक पडलेला नाही. विधानसभा निवडणुका वैगरे तात्कालिन प्रसंग वगळता आताही परिस्थिती तशीच आहे. ही खरंच गमत्तशीर गोष्ट आहे आणि आपले राज्यकर्ते आणि आपणही, किती निर्ढावले आहोत, त्याचंच हे प्रतिक आहे.
आपण जुन्या गोष्टी पटकन विसरतो. पब्लिकची मेमरी शॉर्ट-टर्म असते, असं एक खास मराठी वाक्य आपल्याला माहिती असतं... त्यातंच हे प्रतिक म्हणता येईल का?


पाऊस आलाच नाही तर?