Thursday, 31 December 2009
नववर्षाच्या शुभेच्छा...
Happy New Year....
Tuesday, 22 December 2009
तूलना करायचीच झाली तर...
हिलंच पाहिजे... नाहीतर मी पत्रकार कसला! नाही का? पण मला उटीतला निसर्ग... तिथले चहाचे मळे... खालपर्यंत येणारे ढग... (खरंतर ढग तिथेच असतात, आपण वर गेलेलो असतो!!!) तिथे मिळणारी ती 'होम मेड चॉकलेट्स...' इत्यादी इत्यादी असं बरंच लिहिलं जाऊ शकतं... पण मला सांगायचंय ते तिथल्या गावांबद्दल... स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची तामिळनाडूमधल्या निलगिरी जिल्ह्याशी तूलना करण्याचा मोह आवरत नाहीये...
राज्यातल्या हिल स्टेशन्सची अवस्था आठवते... माथेरानचा मार्ग असलेलं नेरळ... महाबळेश्वरच्या आसपासची गावं... जव्हार... या ठिकाणी असलेल्या आदिवासींना या नैसर्गिक संपत्तीचा वापरच करू दिला जात नाही... तामिळनाडू सरकार प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रत्येकी ५ एकर जमीन कसायला देतं... (आपल्याकडे आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी कशा बळकावता येतील, याची चिंता वाहिली जाते...) तिथल्या सरकारच्या धोरणांमुळे निसर्गानं दोन्ही हातांनी उधळलेली संपत्ती तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचते, असंच दिसतंय... तामिळनाडूच्या अन्य भागांमध्ये स्थिती कशी आहे, माहित नाही... तिथं फिरायची संधी मिळाली की पाहता येईल. पण जो भाग पाहिला, त्यात मात्र निसर्ग आणि सरकार या दोघांमुळे तिथल्या आदिवासींच्या दारात विकासाची गंगा पोहोचलीय... अर्थात उटीतल्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचाही याला हातभार लागला असण्याची शक्यताही आहे. पण काहीही झालं तरी राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हे होणं नाही... Tuesday, 1 December 2009
बादशहाचं 'कॉस्ट कटिंग...'
णि बेगमनं मागे-पुढे न पाहता बिरबलासाठी तिजोरी मोकळी करण्याची तयारी दाखवली... त्यावर बिरबल म्हणाला, 'आपल्यावर चालून येत असलेल्या आपल्याच सैनिकांना दुप्पट पगारावर परत घेतलं जात असल्याची घोषणा तातडीनं करा... म्हणजे सगळं नीट होईल...' बादशहाला ही आयडिया एका क्षणात आवडली... त्यानं तातडीनं खलिता घेतला आणि आदेश काढला... तो घेऊन निरोप घेऊन आलेले दोन्ही सैनिक निघून गेले.... राज्यावरचं संकट टळल्यामुळे बादशहा आणि बेगमनं सुटकेचा निश्वास टाकला....Saturday, 28 November 2009
भरत्या-पक्या-अम्या-चिनूची गोष्ट...
अम्या... आमच्या सोसायटीतल्या पोरांचा दादा. त्याला सगळे टरकून असतात. वयानं मोठा आणि श्रीमंत बापाचा पोरगा असल्यानं सगळ्या सोसायटीत त्याचा वचक आहे. त्याचं घरही इतरांपेक्षा मोठं...
चिनू... हा चिनू म्हणजे त्यातल्या त्यात अम्याशी पंगा घेणारा... त्याचं घरही मोठं पण घरात त्याच्या बाबांची सत्ता चालते... एका अर्थी घरात हुकूमशाहीच आहे म्हणा ना! सोसायटीत घर असून घराभोवती मोठ्ठी भिंत, असा त्यांचा घरचा थाट... याचं आणि भरत्याचं पटत नाही... पक्याची आणि चिनूची मात्र घट्ट मैत्री.
पक्या सोसायटीतलं सगळ्यात लहान कार्टं... पण अतिशय वाह्यात... भरत्याच्या खोड्या काढण्यात त्याला सगळ्यात जास्त इंटरेस्ट... त्याला चिनूची जोरदार फूस... घरची गरिबी असूनही चिनूच्या पैशांवर माज करण्यात पक्याचा हातखंडाच...
आपल्या गोष्टीतलं शेवटचं पात्र म्हणजे भरत्या... याचं घर पण मोठ... पैसाही बऱ्यापैकी, म्हणजे मध्यमवर्गातलं कुटुंब आहे म्हणा! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुसंस्कृत घरातला असल्यानं सगळ्यांशी जमवून घेण्याचा याचा स्वभाव... आता याच्या या स्वभावाचा पक्या आणि चिनू गैरफायदा घेतात... पण हा आपला शांत असतो... पक्या तर याच्या घरात आपटीबार फोडतो दिवाळी-बिवाळी नसताना... तरीही भरत्या फक्त त्याला दम देतो, आणि सोडून देतो... भरत्याचं चिन्याशी एकदा आणि पक्याशी तीन वेळा जोरदार भांडण पण झालं होतं... अगदी मारामारीही झाली होती... पण शेवटी घरचे मधे पडल्यावर ते मिटलं... पुन्हा सगळ्यांशी मैत्री करायला भरत्या तयार... असा हा साधा-भोळा!
तशा या चौघांच्या किंवा यातल्या दोघा-तिघांचे किस्से खूप आहेत सोसायटीतले.. पण मी गेल्या दोन-तिन दिवसांत झालेल्याच गोष्टी सांगणार आहे...
Wednesday, 4 November 2009
'वन्दे मातरम्'चं राजकारण!
द' या मुस्लिम उलेमांच्या संघटनेनं देवबंदच्या परिषदेत फतवा काढला की म्हणे मुस्लिमांनी 'वन्दे मातरम्' म्हणू नये... काचं कारण देण्यात आलंय की मातृभूमीला वन्दन केल्यानं मुस्लिमांचा एकेश्वरवाद शिल्लक रहात नाही... कारण अल्लाशिवाय कोणासमोरही नतमस्तक व्हायचं नाही, असं या फतव्यात म्हंटलंय. दुसरीकडे वन्दे मातरम् न म्हंटल्यामुळे मुस्लिमांना देशाबद्दल प्रेम नाही, असं मानण्याचं कारण नसल्याचंही उलेमा ए हिंदनं स्पष्ट केलंय. मुळात प्रश्न वन्दे मातरम् म्हंटल्यामुळे कोणी देशभक्त ठरतो, असं मानणंच मूर्खपणाचं आहे. देशभक्ती ही एखादं गीत म्हणणं-न म्हणण्यावर ठरवणं हे मूर्खपणाचंच ठरेल... नाहीतर पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्यांनी कधीतरी पंजाब-काश्मीरातल्या शाळेत वन्दे मातरम्, जण गण मन... म्हंटलं असेलच की...! त्यामुळे जामियत उलेमा ए हिंदनं हे कोणाला बजावलंय माहित नाही... ते असो...
ठरलं... देशात स्वातंत्र्यासाठी झालेला हा पहिला-वहिला नियोजित उठाव... हा उठाव फसला असता तरी त्यानंतर थेट १९४७ला देश स्वतंत्र होईपर्यंत हजारो क्रांतीकारकांना वन्दे मातरम् या गीतानं तेज दिलंय... १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात देशभरातले अनेक संस्थानिक-राजे आणि अन्य स्वातंत्र्यसैनिक सहभागी होते... मात्र या सगळ्यांनी या उठावाचं नेतृत्व दिलं होतं दिल्लीचे ज्येष्ठ राज्यकर्ते बहाद्दुरशहा जफर यांच्याकडे... याचा अर्थच असा की 'वन्दे मातरम्' या गीतानं भारलेले लढवय्ये एका मुस्लिम राजाच्या नेतृत्वात लढले होते... मग आता दारूल उलूम किंवा मुस्लिम उलेमांचा अचानक विरोध असायचं कारण काय? 
Monday, 2 November 2009
कहीं आग लगे....
घटना तशी आपल्यापासून दूर घडलेली... आपल्यापासून म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्यांपासून. जयपूरच्या आयओसीच्या डेपोला लागलेली आग पाचव्या दिवशीही धुमसतेच आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, ही तेलाला लागलेली आग असल्यामुळे आपल्याला करण्यासारखं काहीच नाही... ती आग तिला वाटेल तेव्हा विझेल... मग आपण कोण-कोण आत होरपळलंय, त्याचा पंचनामा करायला मोकळे होऊ.. ज्यांनी या आगीची दृष्यं पाहिली असतील, त्यांना अधिकाऱ्यांच्या या असहाय्यतेचं कारण समजेल. हजारो मीटर उंचावर उसळणाऱ्या धडकी भरवतील अशा ज्वाळा आजही या अग्नीकांडात दिसतायत. आणखी १२-१५ ता
सांनी एकदा सगळं तेल संपलं की आग शमेल, असं सांगितलं जातंय.ही आग एकदा विझली की मग नेमकं नुकसान किती... मृत्यू किती... याची चर्चा सुरू होईल. राज्य सरकारच्या 'डिझास्टर मॅनेजमेंट'चा पंचनामा करणारी जनहित याचिका दाखल झालीपण आहे. त्याचंही काय होईल ते होवो... प्रश्न वेगळाच आहे... थोडा घाबरवणाराही.... भारतातल्या तेल कंपन्यांचे असे अनेक डेपो ठिकठिकाणी आहेत. शिवाय ट्रॉम्बेसह अनेक ठिकाणी अणूभट्ट्याही आहेत. जयपूरची पुनरावृती अशी कुठे झाली, तर परिस्थिती आहे.
आधी या दुर्घटनेला 'अतिरेकी कारवाई' असं नाव दिलं गेलं. मात्र आता एका कर्मचाऱ्यानं चुकीच्या क्रमानं वॉल्व सोडल्यामुळे प्रेशर बिघडलं आणि आग लागल्याचं कारण आता पुढे येतंय. हे जास्त भयानक आहे... अतिरेकी कारवाईपेक्षा भयानक आहे. कारण थोडीशी सावधगिरी बाळगली तर अतिरेकी कारवाई थांबवता येते... मानवी चूक नाही...
आणखी एक धो
का म्हणजे शहरांच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोलपंपांचा... जयपूरइतका नसेल, तरी मोठं नुकसान करण्याइतका इंधनसाठा यात असतोच असतो... मग असल्या मानवी चुका तिथं झाल्या तर आसपासच्या वस्तीचं काय? हा विचारच भयानक आहे. घटना आणखी भयानक असतील.जयपूरच्या आगीत सुमारे ५०० कोटींची मालमत्ता... अनेक बॅरल इंधन... किमान १०-१२ जीव जळून खाक झाल्येत... याच आगीत आपला निष्काळजीपणाही जळून खाक झाला तर बरं... नाहीतर काही खरं नाही...! खरंच खरं नाही...!!
Saturday, 24 October 2009
Dan Brown turned phylosopher...
at all those novels also have many factual things. CERN, The Vatican in 'Engels and Demons' or NSA in 'Digital Fortress' etc. But his new book 'The Lost Symbol' is more than just a novel. It is more philosophical than his previous novels...The Lost Symbol is also a mistery but it has a golden edge of good thoughts, faith in our ancient books. As the story and the author are American, obviously the book Dan referred is The Bible... But the message is clear... Any ancient book has some (or same?) hidden meaning and that is faith in god. Dan even mentioned 'Geeta' and 'Vedaas' in his book while mentioning the ancient literature. As a Hindu by birth, I replaced Bible' by 'Geeta...' and to my surprise, it made perfe
ct scenes. Even our forefathers said the same thing, even they didn't heard of Meson's at all...So I think religion is irrelevant if you mentioning God. Even the Atheists also believe that 'God is not exists...' and still mentioning about him... So Dan became more philosopher in this book... But altogether, The Lost Symbol is again Good attempt by him, as usual...
Dan, WE ARE WAITING FOR YOUR NEW NOVEL NOW... MAY BE SOMETHING ON EGYPT....!
हेच होणार होतं...
त्यांच्यावर काय विश्वास दाखवायचा? हे लोक सत्तेत आले तर आपलं भलं करतील, असे लोकांना वाटावं, असं यांनी काय केलंय...?Tuesday, 15 September 2009
ब्रेकिंग न्यूज?
इको.क्लासमध्ये आले. आणि शप्पथही घेतली म्हणे की या पुढे फक्त इको.क्लासनंच प्रवास करणार... व्वा... टावरे जी... आमच्या मतांचं सोनं केलंत हो!!!) हां.. तर मुळ मुद्दा म्हणजे सोनियाबाई काल इको.क्लासनं मुंबईत आल्या. मग 'माँ से बेटा सवाई...' हे सिद्ध करण्यासाठी राहूलजींनी थेट शताब्दीचं रिझर्वेशन करून टाकलं. तेही एसी चेअर कारचं...
ळ जाल, हे वाटणं एक तर मूर्खपणाचं आहे किंवा हे नेते समोरच्याला (म्हणजे आपल्याला) मूर्ख समजतात... मुळात राहूल गांधी जेव्हा रेल्वेनं गेले त्या डब्यात त्यांच्या आजूबाजूच्या सिट्सवर त्यांचे सुरक्षारक्षक, सेक्रेटरी इत्यादी होते. त्या कम्पार्टमेंटमधल्या उरलेल्या सीट मोकळ्या ठेवल्या होत्या. मग राहूल गांधींनी सामान्य जनतेसारखा प्रवास केला, असा दावा कुठल्या तोंडानं करायचा? या नेत्यांना असलेला धोका बघता अगदी मी बदलापूरहून बेलापूरला येतो तसं त्यांनी येणं अपेक्षितही नाही... पण मग ही 'दिखाऊगिरी' कशासाठी...? Friday, 11 September 2009
आघाडी... बिघाडी....
कुणी बाई काढली कुणाची कळ...?
थोडी न थोडकी... जुंपली फार...
दोघांच्या तलवारीला चमचम धार...
डोक्यावर इलेक्शन बैठक फोल....
बडवून फुटला आघाडीचा ढोल...
युती बाई - अशी काई...
तो-यामध्ये खडी...
हातावर अजूनही सैलच 'घडी...'
तिस-या आघाडीचं उघडून दार...
आठवले काकांनी घातला वार...
ऐक्याच्या नावाखाली
एक झाले सोळा...
आघाडीच्या पोटात मोठ्ठा गोळा...
दिल्लीबाई म्हणते आघाडी करू...
विलासराव म्हणतात एकटे लढू...
आम्हा नको आघाडी...
घोषा सुरू...
एकटे जिंकू किंवा एकटे मरू....
Wednesday, 9 September 2009
इशरतच्या निमित्तानं....
सांनी पहाटेच्या वेळी चार 'अतिरेक्यां'चं एन्काऊंटर केलं. त्यात एक मुलगी होती इशरत जहाँ... मुंबईच्या अगदी जवळ, मुंब्रा या ठाण्याच्या उपनगरातली अवघ्या १९ वर्षांची इशरत लष्कर-ए-तैय्यबाची अतिरेकी आहे, असं सांगण्यात आलं. केंद्रानं नेमलेल्या न्यायालयीन समितीनं हे एन्काऊंटर बनावट असल्याचं म्हंटलंय... त्यावरून पुन्हा एकदा या जुन्या वादाला तोंड फुटलंय.
कांड आणि त्यानंतरच्या दंगली यामुळे अतिशय संवेदनशील बनलेल्या गुजरातेत हे लोक का चालले होते, हे बाहेर आलेलं नाही. त्यांच्या गाडीत शस्त्रास्त्र सापडल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. (पण हादेखील एक बनाव असू शकतो, कारण टाईम्सच्या बातमीनुसार पंचनाम्यात हा उल्लेख नाही.) पण हा एफआयआर खरा मानला तर रायफली घेऊन हे चौघेजण कोणत्या पिकनिकला चालले होते? त्यांचं टार्गेट खरोखर नरेंद्र मोदी तर नव्हते...? यासारखे बरेच प्रश्न उपस्थित होतायत.
शी गुजरात पोलिसांचं वैयक्तिक वैर होतं का? त्यांनी नेमकं या चौघांनाच का मारलं असेल... त्या पहाटे तिथून हजारो वाहनं गेली असतील... मग नेमकी यांचीच गाडी अडवून त्यांना ठार करायचं काय कारण? भले फेक असेल, पण या चौघांचंच एन्काऊंटर करण्याची गुजरात पोलिसांना काय गरज पडली असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. Monday, 31 August 2009
नगारा वाजला...
Sunday, 30 August 2009
भाजप 'दक्ष...' संघ 'आरम...'
संघ म्हणजे 'संघ परिवार' या अध्यरुत संकल्पनेचा कुटुंबप्रमुख... विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम यासारख्या अनेक संघटनांचं जाळं संघाच्या या कुटूंबात आहे. त्यातलाच एक 'कानामागून येऊन तिखट झालेला' सदस्य म्हणजे भारतीय जनता पार्टी... एक तर राजकीय पक्ष असल्यामुळे अनिर्बंध अधिकार... सत्ता गाजवण्याची लागलेली सवय यामुळे भाजपमधले काही नेते हे पक्षाला 'ऑटोनॉमस' किंवा स्वायत्त मानतात... त्यांना मनातून असं वाटत असतं की "कोण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ? त्यांनी आम्हाला शहाणपणा का शिकवावा? आम्ही स्वतंत्र आहोत आमचे निर्णय घ्यायला... इ.इ.इ."
मुळे संघानं टेकू काढून घ्यायचा ठरवला, तर भाजपचा तंबू मातीत मिसळायला वेळ लागणार नाही, हे नेते पक्क जाणून आहेत...
महत्त्वाचं ठरेल... तिथं अरूण जेटली आले तर पक्षातले अनेक जण पुन्हा नाकं मुरडतील, अशी शक्यता आहे. तिथं मोदींना आणलं तर गुजरातेत कोण, हा एक प्रश्न आणि मित्रपक्षांना मोदी पचणार का, हा दुसरा मोठा गहन प्रश्न... त्यामुळे तीही शक्यता नसल्यात जमा आहे.... त्यामुळे नेतृत्वबदल इतक्यात नाही... झाले तरी ते 'संघीय भाजप नेत्यां'मध्येच होतील.... जसवंत-यशवंत-शौरी यांना पदं मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही... Wednesday, 26 August 2009
सरकारी लगीनघाई...!
"तहान लागल्यावर विहीर खणणे" ही म्हण सोदाहरण स्पष्ट करा... असा प्रश्न जर यंदा कोणा विद्यार्थ्याला टाकला, तर 'महाराष्ट्र सरकारनं गेल्या महिन्याभरात घेतलेले निर्णय...' हे छान उदाहरण पूर्ण मार्क मिळवून देईल... काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला आता मतांची तहान लागल्ये...
चे देव पाण्यात आहेत. शिवसेना-भाजप युती जवळजवळ झाल्यात जमा आहे... लोकसभेतल्या पराभवाचं उट्टं काढण्यासाठी रामदास आठवलेंनी आधी सगळ्या रिपब्लिकन पक्षांना आणि नंतर डाव्या पक्षांना एकत्र करून आघाडीच्या पोटात गोळा आणलाय... अशा वेळी जिथून शक्य आहे, तिथून मतं जमवण्याच्या खटपटीत आघाडी असेल, तर नवल नाही... Saturday, 22 August 2009
बाबूगिरीला चाप...
मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्या. धर्माधिकारी यांच्या खंडपीठानं या अहवाल-प्रतिज्ञापत्राचे वाभाडे काढलेत. राज्याच्या गृहसचिव ऍना दाणी यांनी असले अहवाल देण्यापेक्षा स्वतः फिरून परिस्थिती बघावी, असे आदेशच न्यायालयानं दिले. एड्सग्रस्त रुग्णांची सगळ्यात वाईट स्थिती असलेल्या १५ तुरूंगांना स्वतः भेटी द्या... असं न्यायालयानं बजावलंय. त्यात १० तुरुंगांना दाणी यांनी तर ५ तुरूंगांना त्यांच्या खात्याच्या उपसचिवानं भेट दिली पाहिजे, अशी वाटणीही कोर्टानं करून दिलीय. याचा अर्थ दाणींनी सगळी जबाबदारी उपसचिवांवर ढकलू नये, याची खबरदारीही कोर्टानं घेतलीय. कोर्टाची सगळ्यात मोठी पंचलाईन म्हणजे, या भेटी दिल्यावर अहवाल द्यायचा नाही, असं सांगण्यात आलंय. दाणी आणि त्यांचे सहकारी यांनी स्वतः कोर्टात येऊन 'या तुरूंगांमध्ये काय पाहिलं...?, ते पाहून काय वाटलं...? आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करणार आहोत?' हे प्रत्यक्ष सांगायचं आहे... हा आदेश म्हणजे 'आयसिंग ऑन केक...' म्हंटलं पाहिजे.
कोर्टानं इतकं चिडायचं कारण म्हणजे राज्याचं गृहखातं आणि आरोग्यखात्याला एकूण परिस्थिती बघण्याचे आदेश यापूर्वी कोर्टानं दिले होते. त्यावर नेहमीची बाबूगिरी करत 'आपण एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काय करणार आहोत...' असली बच्चनगिरी अहवालात होती. त्यामुळे कोर्ट संतापलं... ज्यांना आगोदरच एड्सची बाधा झाली आहे, अशा कैद्यांचं काय, असा खडा सवाल न्यायालयानं केला. त्यात कोर्टानं मदतीसाठी नेमलेले ऍमिकस क्युरी युग चौधरी यांच्या अहवालानं भर घातली. कैद्यांमधल्या आजारानं गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय त्यांच्यावर ट्रिटमेंटच दिली जात नाही, असं या धक्कादायक अहवालातून स्पष्ट झालंय.
कोर्टाच्या या आदेशांचं सामान्य माणसानं मोकळ्या मनानं स्वागतच करायला हवं... एक तर हा विषय कैद्यांपुरता मर्यादित असला तरी एकूणच असल्या बाबूगिरीचा फटका आपल्याला कायमच बसत असतो... मग ते मंत्रायलयात आपलं एखादं काम अडलं असेल... किंवा मुंबई हल्ल्यांबाबत पाकिस्तानला पुरावे देणं असेल... किंवा अगदी साधं रेशन कार्डावरचा पत्ता बदलणं असो... हा बाबूगिरीचा व्हायरस आपल्या नसानसांमध्ये भिनलाय... त्याचा उपद्रव एचआयव्हीप्रमाणेच थेट दिसत नाही... पण त्याची लागण झाली की आपली प्रतिकारशक्ती कमी होते... आणि आपल्या बाकीच्या सगळ्या यंत्रणा हळूहळू निकामी होतात... कोर्टानं दिलेले हे आदेश म्हणजे या बाबूगिरीच्या व्हायरसवर जालीम इलाज म्हणायला हवा... हा निकाल एका केसपुरता मर्यादित असला, तरी त्याचा एकूण टोन सगळ्या बाबू लोकांवर आसूड ओढणारा आहे... यावरून नोकरशहांनी धडा घेतला तर बरं... नाहीतर कोर्टाला असेच आदेश देऊन या लोकांना खुर्चीवरून हलवावं लागेल... ते आपल्या व्यवस्थेला फारसं हितावह नाही...
Friday, 21 August 2009
बाप्पाशी गप्पा... इतकंच!
म्हणाला... काय राव? मला विसरूनच गेलास
मी म्हंटलं त्याला, विसरीन कसा बाप्पा...
रोजच्या कामाच्या रगाड्यात थोडा विस्मृतित गेलास... इतकंच!
पण स्फोट-बिट झाले की आठवतोस तू आम्हाला...
आत्ता नुकताच 'ताप' आल्यावरही लागलेलो तुझं नाव घ्यायला...
तसा मी मुळातच भित्रा आहे रे...
चार ओळखीचे भेटले की बरं वाटतं भाव खायला... इतकंच!
तू आलास घरी की मोदक-बिदक करणार आहे मी...
तू खात नाहीस माहित्ये रे मला... तुझ्या नावानं मी तर खातो...
तुझी आरती म्हणीन मी तेव्हा हुरळून जाऊ नकोस,
ज्याचा सण असेल त्या देवाचीच गाणी आम्ही नेहमी गातो... इतकंच!
दिड दिवस रहा... पाच दिवस रहा किंवा आख्खे दहा दिवस रहा...
पूजा-अर्चा-भजनं करण्याचा माझा वस्तुपाठ आहे...
कारण त्याला माझाही इलाज नाहिये रे...
'देखल्या देवा दंडवत' करण्याचा माझा ठरलेला परिपाठ आहे... इतकंच!
लालबागचा राजा... दगडूशेट हलवाई... आणि
कुठकुठल्या मंडळांमध्ये पाहतो मी तुला... आणि तुझ्यासमोरची लांब रांग...
खरंच यातले भक्त किती आणि लड्डूभक्त किती...
हे तुला तरी कळतं का रे...? पण रिद्धि-सिद्धीची शप्पथ घेऊन सांग... इतकंच!
तुला निरोप देत सांगितलं पुढल्या वर्षी लवकर यायला...
की मग कोण-तू आणि कुठला तू, असं म्हणायला मी मोकळा होणार...
नाही... नाही... मी तूला विसरलो असं समजू नकोस रे...
फक्त माझ्यावर संकटं आली की मगच तू मला आठवणार... इतकंच!
माझं इतकं ऐकून घेतल्यावर बाप्पानं गप्प बसावं ना?
पण म्हणाला... फक्त चतुर्थी टू चतुर्दशी मी तुला आठवतो...
वाटतंय खरं असं मित्रा तूला...
पण तू सुखात असतानाही आठवण काढतोस माझी...
कारण ती सगळी सुख मीच तुझा पत्ता लिहून पाठवतो...
ते तुला समजत नाही... इतकंच!
Wednesday, 19 August 2009
प्याटर्नचा प्याटर्न... म्हंजी 'पुने प्याटर्न'
तुमाला वाटलं, ह्यो गडी आता का ह्ये सांगतुया.. आता कुटं आला ह्यो प्याटर्नचा फ्याटर्न... पण त्याचं कारन असं गड्यांनो का आजच्या पेपरात वाचलं का कोणचातरी 'पुने प्याटर्न' व्हता म्हणं... त्यो मोडला! बातमी वाचली का... तर कायबी कळंना... कन्चा प्याटर्न मोडला ता... (छबीला नापास करनारा प्याटर्न मोडला असता, तर लय् बरं वाटलं असतं...) कायच कळत नव्हतं... त्यात पुनं म्हापालिकेचा कायतरी लिवलेला... आनी ते उद्धव ठाकरे.. त्या कायतरी बोलला व्हता... म्हनल् ही कायतरी राजकारणाची भानगड दिसतिया... मग म्हनलं आमच्या आळीतल्या गणूला इचारू काय ते... त्यो कायतरी सभा-बिभांना जातो....
गण्याला गाटला अन् इचारलं की, ह्यो पुने प्याटर्न काय भानगड हाय ते सांग गड्या... त्यानं सांगितलं, त्ये मला काय जास्त समजलं नाय... समजलं इतकंच...
******************
एका शाळेत चार पोरं असतात... 'रा' आनी 'का' ह्ये दोघं मित्र आनी 'शि' आनी 'भा' ह्ये दोघं मित्र... यकदा गणिताच्या पेप्राला 'रा', 'शि' आनी 'भा' यांनी एकत्र येऊन कापी केली आनी तिघेबी पास झाले. मग 'का' आपल्या ख-या दोस्ताला, म्हंजे 'रा'ला लय चिडवायचा त्या पेप्रानंतर... आता परत परिक्षा आली तर तू कोनासंगट कापी करनार, असं इचारायचा सारका-सारका... पन ती वेळच आली नाय... कारन 'शि' आनी 'भा' या दोगांनी 'रा'ला कापीतून कटापच करून टाकला... मंग 'का' ला आपोआप साथी मिळाला कापी करायला... अनी फुडल्या जास्त अवगड पेप्रात त्यांनी आपापल्या जोडीदारासंग कापी करायचं ठरिवलं...
************************
ह्ये अस्स हाय होय पुने प्याटर्न... आमच्या छबीच्या येळी ह्यो "पुने कापी प्याटर्न" गावला असता तर ती बी पयला वक्ताला पास झाली नसती का?
आशिष चांदोरकर यांची ताजी पोस्ट... As it is...
कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य"...
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!
पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!
आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा नसेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्द्यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.
"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.
शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...
Tuesday, 18 August 2009
पुन्हा क्रिझवर भिंत...?
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहूल द्रवीड वन-डे टीममध्ये परतलाय... सगळ्या मिडीयानं त्याला डोक्यावर घेतलं कारण त्यानं कमबॅक केलंय म्हणून... अन्यथा त्याचा वाईट फॉर्म सुरू असताना त्याला शिव्यांची लाखोली याच मिडीयानं वाहिली ना? पण 'देखल्या देवा दंडवत' अशी आपली नितीच आहे, त्याला कोण काय करणार? राहूल परत आला, हे चांगलं झालं का वाईट, हे आत्ताच कसं सांगता येईल?Monday, 17 August 2009
Who is this "KHAN?"
फोनवर महाराजांचा चिडलेला-पिचलेला आवाज प्रधानजींच्या चाणाक्ष कानांमधून सुटला नाही... पण त्यांनी तसं दाखवलं नाही... ते सहजच चौकशी करत असल्यासारखं म्हणाले, "काय म्हणतोय महाराज तुमचा परदेश दौरा? सगळं आलबेल आहे ना?"
या प्रश्नानं महाराज अधिकच भडकलेल्याचं प्रधानजींना जाणवलं. पण महाराजांच्या पुढल्या वाक्यानं त्यावर शिक्कामोर्तबच केलं... महाराजांचा भडकलेला आवाज म्हणाला, "डोकं फिरल्यासारखं वागू नका... आमच्यावर इथं काय प्रसंग ओढवलाय माहित्ये का... मी आपल्या देशाचा 'किंग...' पण इथं परदेशात आम्हाला कोणी विचारत नाही... आमची तपासणी करतात... सामान चेक करतात, म्हणजे काय? आपल्या देशात आम्ही इतके प्रसिद्ध... लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात. पण इथं आम्हाला कोणीच विचारत नाही... म्हणजे काय?"
महाराजांच्या निर्बुद्धपणाचं प्रधानजींना हसायला आलं... पण ते फक्त चेह-यावर. आवाजात त्यांनी तसं जाणवूही दिलं नाही... (म्हणुनच तर इतकी वर्षं ते प्रधानजी होते) आवाज गंभीर ठेवत प्रधानजी विचारते झाले, "नेमकं काय झालंय ते सांगाल का? तुमच्या आवाजावरून नक्कीच खूप चिडलेले दिसता तुम्ही..."
प्रधानजींचा काळजीचा स्वर ऐकून महाराजांना थोडं बरं वाटलं... मग ते डिटेल सांगते झाले, "आम्ही या देशातल्या नेवार्क विमानतळी उतरलो... आमचं आगत स्वागत करायला कोणी नव्हतंच, पण इथल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला चक्क दोन तास डांबून ठेवलं... आमचं सगळं सामान तपासलं, कोणाला फोनही करू दिला नाही... आम्ही येणार असल्याची खबर तुम्ही दिली नव्हतीत का? तसं असेल तर परत आल्यावर तुम्हाला सुळावर चढवीन मी समजलं ना..."
प्रधानजींना असल्या गोष्टींची सवय होती. महाराज येत असल्याचं लेखी कळवल्याची ऍक्नोलेजमेंट त्यांच्या खिशात होती. त्यामुळे ते निर्धास्त होते. पण महाराजांची 'खेचण्याची' ऐती चालत आलेली संधी ते कशाला सोडतायत... प्रधानजी म्हणाले, "हो महाराज... कळवलं होतं मी तिथल्या महाराजांना आपण जात असल्याचं. त्यावर त्यांचं उत्तरही आलंय... त्यांचं म्हणणं आहे, की आमच्या विनंतीवरून तुम्ही तिथं आलात, तर प्रोटोकॉल-बिटोकॉल ठिक आहे. पण तुम्ही एका खासगी कार्यक्रमासाठी तिथं गेलात. त्यामुळे सामान्य पर्यटकाला ज्या सुरक्षाकवचातून जावं लागतं, तेच तुम्हालाही लागू आहे... म्हणजे असं ते म्हणतात. मला वाटतं त्यांची चुकच झाली..." प्रधानजींनी बॅकफूटवर येत एक फटका लगावला... महाराज विचारात पडल्याचं त्यांना जाणवलंच... "त्यांचा अजून एक मुद्दा आहे. त्यांच्या मते तुम्ही काही आपल्या देशातले खर्रे-खुर्रे किंग नाही... तुम्ही केवळ चलचित्रांच्या क्षेत्रात किंग आहात. मग तुमच्यासाठी प्रोटोकॉल का पाळायचा... त्यांच्या देशाच्या नियमांमध्ये बसत नाही म्हणे ते... ते ख-या किंगला पण सोडत नाहीत... तुम्ही तर 'कठपुतली किंग' आहात, असं लिहिलंय त्यांनी दिलेल्या उत्तरात..."
थोडा वेळ गेल्यावर महाराज म्हणाले, "हं...... ते पण खरंच आहे म्हणा... आता असं करा... तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या... त्यात डिक्लेअर करा, की आमच्या महाराजांचं आडनाव 'खान' असल्यामुळेच त्यांना अडवलं... म्हणजे दोन गोष्टी होतील. एक तर आपल्या आडनावाचे लोक खुष होतील आणि आपल्या पुढल्या चलचित्राची पब्लिसिटी होईल... कशी वाटली आयडिया..."
"झक्कास आयडिया महाराज... काय डोकं लढवलंयत... झक्कासच! म्हणजे आम के आम... गुठलियोंके दाम! एकदम भारी... कसं काय सुचतं तुम्हाला हे.. व्वा.. व्वा..."
"पुरे आता... आम्हाला उगीच हरभ-याच्या झाडावर चढवू नका... फोन ठेवा आणि प्रेस कॉन्फरन्स बोलवा... मी परत येण्यापूर्वी या गोष्टीची पुरेशी चर्चा झाली असली पाहिजे...."
फोन ठेऊन प्रधानजी शांतपणे 'मधुशाले'कडे चालते झाले...
Friday, 14 August 2009
स्वाइन फ्लू आणि पुणे
तशी एक कॉमेंट पडली आहेच, पण माझ्या अनेक 'पुणेकर' मित्रांनी फोन करून किंवा एसएमएस पाठवून मला झापलंय.... कारण एकच... हा इतका 'सिरियस' विषय आहे आणि मी त्याची चेष्टा करतो, म्हणजे काय!!
एक तर मी मुंबईत राहतो... इथं कुठल्या क्षणी काय होईल आणि तुम्हाला घेऊन जायला दूत येतील, याचा भरवसा नसतो... त्यामुळे एकूणच मुंबईकरांची मानसिकता ही 'रेडी फॉर एनिथींग' अशी असते. "स्वाइन फ्लू आलाय का? बरं... बरं... चला कामाला लागा..." असा मुंबईकरांचा ऍटिट्यूड... पुण्यात मात्र परिस्थिती नेमकी या उलट... "पळा... पळा... स्वाइन फ्लू आला... स्वाइन फ्लू आला..." असं म्हणत तमाम पुणेकरांनी रिदा शेखच्या मृत्यूनंतर नायडू रुग्णालयाबाहेर गर्दी केली...
आता माझा जन्मच मुंबईच्या उपनगरातला... दिल्लीचे ४ महिने आणि हैदराबादची ३ वर्ष वगळता उरलेली ३० वर्षं मुंबईत गेली. त्यामुळे मी ठरवलं तरी स्वाइन फ्लूकडे पुणेकरांइतका 'सिरियसली' नाही पाहू शकत... सॉरी बॉस! पण मला या विषयाचं गांभिर्य नाही, असा याचा अर्थ काढायचं कारण नाही... मी मिडियात काम करत असल्यामुळे हा विषय कायमच गांभिर्यानं हाताळतो. त्यात थोडासा बदल म्हणून थोडा कल्पनाविलास केला, तर बिघडलं कुठं?
पुण्यात स्वाइन फ्लू सगळ्यात जास्त पसरलाय हे मान्य... त्याची कारणं काय, हे समजणं कठीण आहे. एक कारण म्हणजे रिदाच्या मृत्यूनंतर नायडू हॉस्पिटलबाहेर लोकांनी केलेली गर्दी आणि त्यातून विषाणूंचा झालेला प्रसार हे असू शकेल (माझ्या एका 'ओरिजनली पुणेकर आता मुंबईकर' मित्राला हा मुद्दा मान्य नाही... तो मित्र प्रतिक्रीया टाकेलच तशी) किंवा पुण्यातलं प्रदुषण हा असू शकेल... किंवा तिथली धड ना थंड-धड ना ऊष्ण अशी हवा हे कारणही असू शकेल. पण पॅनिक होऊन स्वाईन फ्लू कमी होईल असं नाही.... आणि मी किंवा माझ्यासारख्या कोणा सामान्य माणसानं कायम या विषयाकडे गांभिर्यानं पाहिल्यानं तो अटोक्यात येईल, असंही नाही... इतकंच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश....
Tuesday, 11 August 2009
'स्वाईन फ्लू'चा सामना : जेम्स बॉण्ड स्टाईल...
न फ्लूसाठी वापरण्यात येणारा मास हा केवळ ९५ टक्केच विषाणू आडवतो म्हणे... म्हणून मग जेम्सनं हा ऑक्सिजन जनरेटर मास्क लोकांना द्यायचं ठरवलंय. यात बाजुला असलेल्या टाकीत अर्धा लिटर पाणी भरायचं. त्यातला ऑक्सिजन वेगळा करून त्याचा पुरवठा हा मास्क करतो. बाहेरची हवा आजिबात येत नसल्यानं व्हायरस यायचा प्रश्नच नाही. एकदा टाकी फूल केली ती तेवढा ऑक्सिजन २ तास पुरतो. नंतर पुन्हा त्यात बाटलीतलं मिनरल वॉटर भरायचं, की झालं...
जरी असेल तरी हा मास्क अलार्म वाजवतो. तसंच त्याच्या पुढल्या टोकावर लावलेला दिवाही ब्लिंक होतो. त्यामुळे याचा उपयोग मास्क वापरणा-यांबरोबरच आजुबाजुच्यांनाही होऊ शकतो. त्यांच्याकडे मास्क नसेल, तरी त्यांना किमान समजू शकेल, की इथं व्हायरस आहेत.
लावला की हवेत किंवा कुठल्याही वस्तुवर H1N1 हा व्हायरस असेल, तर तिथली हवा गडद दिसते. त्यामुळे व्हायरसचा मोठा साठा असलेली हवा ओळखायला सोपं जातं. तिथं जाणं टाळलं की स्वाईन फ्लू व्हायची शक्यता कमी... या गॉगलमध्ये एक अपग्रेडेड व्हर्जनही आहे. त्यात समोरच्या हवेत व्हायरस किती टक्के आहे, ते गॉगलच्या काचेवर कोप-यात दिसू शकतं. त्यामुळे बाकीच्यांनाही सावध करता येऊ शकतं.
अशा लोकांना हा मास्क फार उपयोगाचा ठरू शकेल. याला इनबिल्ट माईक आणि इयरफोन आहेत. तसंच ब्लू-टुथ कनेक्टिव्हिटी असल्यामुळे वायर जोडायची गरजच नाही.
राभोवती एक अदृष्य चुंबकीय वलय तयार होतं. ते दिसत नाही, पण असतं. व्हायरसला हे वलय तुमच्या आजुबाजुलाही फिरकू देत नाही. तुम्ही सामान्य वेगानं चालत असाल तर तुमच्या शरीरापासून १ फूट, एका जागी स्थीर असाल तर सुमारे सव्वा फूट आणि वाहनातून जात असाल, तर अर्धा फूट हे वलय असतं. त्यामुळे हे सगळ्यात जास्त सुरक्षित मानलं जातं.
कीतून लागण झालेल्या व्यक्तीला गोळी मारायची. गोळी नेम धरून छातीत घालायची... ती गोळी आत शिरते आणि शरिरातले सगळेच्या सगळे H1N1 व्हायरस ठार मारते. त्या माणसाला काही होत नाही. छातीत छोटीशी जखम होते फक्त. अण्टीबायोटिक घेतल्यावर ती २ दिवसांत बरी होते. पण एकदा ही 'गोळी' खाल्ली की, नंतर पुढली ३० वर्षं स्वाईन फ्लूचा धोका अजिबात नसतो... Monday, 10 August 2009
स्वाईन व्हेकेशन...!
विशेषतः पुण्यात 'स्वाईन व्हेकेशन' सुरू आहे. जगभरात स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेपासून सगळे तज्ज्ञ आपल्याला सावध करत होते. पण आपलं सरकारच ज्या गोष्टी सिरियसली घेत नाही, तिथं सामान्यांची काय कथा... आपल्याला जाग येण्यासाठी कुंभकर्णाप्रमाणे रणवाद्द्यांचा गजर करावा लागतो... असंच रणवाद्य वाजलं रिदा शेख या मुलीच्या मृत्यूमुळे... मग आपलं शासन-प्रशासन आणि लोक थोडे जागे झाले... त्यानंतर स्वाईन फ्लूनं मुंबईतही आपला पहिला बळी घेतला... पाचगणीत स्वाईन फ्लूग्रस्त झालेल्यांची संख्या पाव शतकावर पोचली होती. मग नागपूर, नाशिक, नांदेड, रत्नागिरी अशा सगळीकडून रुग्ण सापडल्याच्या बातम्या यायला लागल्या... हा मात्र सगळ्या राज्यासाठीच 'गजर' (इंग्रजित ALARM) ठरला... आणि आताचं चित्रं काय आहे...Saturday, 8 August 2009
झालो आम्ही एक पुन्हा...
मैत्रीची उघडली 'कवाडे...'
'प्रकाश' नाही आला तरीही
कोण करेल आपुले वाकडे...?
जरी हे घेती आणा-भाका...
स्वार्थ सरता होतील यांच्या...
कपाळी आठ्या... वरती खाका...
